शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

महागाई विरोधात काँग्रेसची निदर्शने

By admin | Updated: October 21, 2015 21:48 IST

महागाईला आळा घालून जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर कमी करून रास्तभाव दुकानातून जीवनावश्यक पुरवठा करण्यात यावा

इचलकरंजी : जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ करून केंद्र व राज्य सरकार गोरगरिबांवर अन्याय करीत असल्याच्या निषेधार्थ बुधवारी इचलकरंजी शहर काँग्रेस समितीच्यावतीने प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. ही दरवाढ तातडीने मागे घेण्यात यावी आणि तूरडाळ, उडीदडाळ आणि मूगडाळीचे रास्तभाव दुकानातून वितरण करण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ झाल्याने सामान्य नागरिक आणि मध्यमवर्गीयांना दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले आहे. सणांच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना खर्चाचा मेळ घालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. त्यानंतर प्रांत कार्यालयातील शिरस्तेदार अनिल साळुंखे यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात, महागाईला आळा घालून जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर कमी करून रास्तभाव दुकानातून जीवनावश्यक पुरवठा करण्यात यावा, असे नमूद केले आहे.आंदोलनात अशोकराव आरगे, शशांक बावचकर, अहमद मुजावर, रणजित जाधव, अशोकराव सौंदत्तीकर, बाळासाहेब कलागते, तौफिक मुजावर, राजू बोंद्रे, सतीश कोष्टी, नरसिंह पारीक, रत्नप्रभा भागवत, शकुंतला जाधव, आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (वार्ताहर)