शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

२०१९ मध्ये काँग्रेसच सत्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:07 IST

उचगाव : देशात बदलाचे वारे वाहू लागले असून, २०१९ मध्ये राष्टÑीय काँग्रेस पक्षच सत्तेवर असेल. कंजारभाट समाजाच्या उन्नतीसाठी आमदार सतेज पाटील यांनी कार्य केले आहे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.उजळाईवाडी येथे २७ गावांतील कंजारभाट समाजातील व्यक्तींसाठी दिलेल्या पाच एकर जागा स्मशानभूमीचा ...

उचगाव : देशात बदलाचे वारे वाहू लागले असून, २०१९ मध्ये राष्टÑीय काँग्रेस पक्षच सत्तेवर असेल. कंजारभाट समाजाच्या उन्नतीसाठी आमदार सतेज पाटील यांनी कार्य केले आहे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.उजळाईवाडी येथे २७ गावांतील कंजारभाट समाजातील व्यक्तींसाठी दिलेल्या पाच एकर जागा स्मशानभूमीचा लोकार्पण सोहळा सरस्वती मंगल कार्यालय येथे पार पडला. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, सतेज पाटील यांनी एखादा विषय लावून धरला, तर तो तडीस गेल्याशिवाय सोडत नाही. कंजारभाट समाज हा भटकंती करणारा वंचित राहिलेला घटक आहे. त्यांच्या पिढ्यान्पिढ्यांची सोय व्हावी म्हणून सतेज पाटील यांनी स्मशानभूमीसाठी पाच एकर जागेची मागणी केली. त्या जागेला मंजुरी देण्याचे काम आपण केले. काँग्रेसने केलेली विकासकामे आजही लोकांच्या लक्षात आहेत.आमदार सतेज पाटील म्हणाले, पूर्वीच्या काळात कंजारभाट समाजाला पोलीस वेठीस धरायचे, त्यांच्यावर चूक नसताना त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक मिळायची, हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून गृहराज्यमंत्री असताना या समाजाला न्याय देण्याची जबाबदारी पार पाडली. कंजारभाट समाजाची पूर्वीपासूनची दफनभूमीची पाच एकर जागा माजी महसूलमंत्री थोरात यांच्या माध्यमातून मिळवून दिली. हे पुण्याईचे काम काँग्रेसच्या माध्यमातून केल्याने ही जागा लोकार्पण करताना विशेष आनंद आहे.कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती प्रतिमा पाटील, महापौर स्वाती यवलुजे, प्रदीप झांबरे, माजी जि. प. सदस्य शशिकांत खोत, काकासाहेब पाटील, संजय माने, राजू माने, सुभाष माने, बाबूराव हजारे, ग्रा. पं. सदस्य अजय पाटील, अलका कांबळे, मनोज मछले, जयराज भाट, संजय नवले, सावन नवले, विनोद मछले, मोहन मछले , सूरज बागडे, कृष्णा मछले, महेंद्र तमायचे, आदी उपस्थित होते.फक्त भाजपचा सातबारा भरणे सुरूबाळासाहेब थोरात हे महसूलमंत्री असताना त्यांनी आॅनलाइन सातबारा, महसूल विभागाचे क्रांतिकारक निर्णय घेतले. पण आताचे महसूलमंत्री हे फक्त भाजपचा सातबारा भरायचे काम करीत आहेत, अशी टीका पाटील यांनी केली.