शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण होणार नवीन पोलिस महासंचालक?; सदानंद दाते यांच्या नावाची चर्चा, केंद्राकडे नावे पाठवली
2
अनंतच्या अनैतिक संबंधाची खात्री झाल्याने ‘ती’  खचली; एकदा अचानक आई वडील घरी पोहचले, तेव्हा...
3
‘टीईटी’चा पेपर ३ लाखांत, शिक्षकांची टोळीच जेरबंद; कोल्हापुरात शिक्षकी पेशाला काळीमा
4
बिना ड्रायव्हरच्या कारपेक्षा त्याची टेक्नॉलॉजी भारतासाठी महत्त्वाची; इस्रायली उद्योगपतींशी चर्चा
5
पाक खोटे बोलतोय...फ्रान्सने केला पर्दाफाश; जगाकडूनही खावी लागली चपराक, काय केला खोटा दावा?
6
कमळावर जाे उभा त्याला मतदान करा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वबळाचे संकेत?
7
मुंबईत तब्बल ११ लाख दुबार नावे आढळली; मतदार याद्यांमध्ये प्रचंड घाेळ, BMC कडे तक्रारींचा पाऊस
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेसला पुनर्बांधणीची गरज; कार्यकर्त्यांचा कौल : कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीत अविश्वासच अधिक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:13 IST

वसंत भोसले । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘लोकमत’ने आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणाची मोहीम आखली असून या आठवड्यात ...

वसंत भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘लोकमत’ने आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणाची मोहीम आखली असून या आठवड्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, मनसे आणि वंचित आघाडीच्या राज्यातील २८८ मतदारसंघांतील कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. यामध्ये कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीने लोकसभा निवडणूक आघाडी करून लढविली असली तरी कार्यकर्त्यांचा एकमेकांच्या पक्षांवर विश्वासच राहिलेला नाही. शिवाय भाजपची सत्ता पुन्हा एकदा आली तरी चालेल. मात्र, आपल्या पक्षाची पुनर्बांधणी करण्यावर भर द्यावा, अशी स्पष्ट भावना कॉँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे जाणवते.महाराष्ट्रातील सातही विभागांतील २८८ मतदारसंघांत या मोहिमेपैकी पहिला सर्व्हे काल पूर्ण करण्यात आला. त्यात या पक्षांच्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून त्यांची मते जाणून घेण्यात आली. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी २४० जागांवर आघाडी झाली असून, उर्वरित जागांवर इतर घटक पक्षांशी बोलणी करून आघाडीस अंतिम रूप देण्यात येईल, असे म्हटले असले तरी कॉँग्रेसच्या ६५ टक्के कार्यकर्त्यांना असे वाटते की, भाजपने केंद्रात सत्ता मिळविल्याने विधानसभा निवडणुकीतही वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात कॉँग्रेसचे पानिपत झाले असले तरी कार्यकर्त्यांचे जाळे आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसशी आघाडी केल्याने अनेक जिल्ह्यांत पक्षाची ताकद वाढण्यास मर्यादा आल्या आहेत.शिवसेना-भाजपविरुद्ध महाआघाडीच हवीमहाराष्ट्रात भाजपला शिवसेना पर्याय होऊ शकत नाही, कॉँग्रेसला राष्ट्रवादी कॉँग्रेस पर्याय ठरू शकत नाही, असे मत नोंदविणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यासाठी भाजपला टक्कर देण्यासाठी कॉँग्रेस विचारसरणीच पर्याय असू शकते. याउलट राष्ट्रवादीने काहीवेळा ‘सोयीची भूमिका’ घेतली आहे, अशीही भावना आहे. उपेक्षित, दलित, अल्पसंख्याक आणि हिंदू समाजातील मोठा वर्ग कॉँग्रेसला मानणारा आहे. हा वर्ग दूर जाऊ नये यासाठी भाजपविरोधात थेट भूमिका घेतली पाहिजे. राष्ट्रवादी कॉँग्रेस विश्वासार्ह नाही, या पक्षाशी आघाडी केल्याने अनेक मतदारसंघांतील ताकद संपली आहे. पक्षाच्या वाढीला मर्यादा आल्या आहेत, असे मत व्यक्त करून आता नसेल तरी पुढील निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघांत कॉँग्रेस कार्यकर्त्यांना संधी निर्माण करून देणे योग्य ठरेल, असेही त्यांना वाटते.राष्ट्रवादीचे बहुसंख्य कार्यकर्ते आघाडीच्या बाजूने आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे पाठबळ, त्यांना मानणाºया अनेक समाज घटकांच्या आघाडीमुळे पाठिंबा मिळविणे सोपे जाते, हा अनुभव केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडीच्या वेळी कामी आलेला आहे, असे त्यांचे मत आहे. यासाठी दोन्ही कॉँग्रेसच्या आघाडीसाठी ते अनुकूल मत नोंदवत आहेत, असे दिसते. राष्ट्रवादी कॉँग्रेसची ताकद एका मर्यादेपेक्षा अधिक वाढत नाही, तेथे कॉँग्रेसची मदत गरजेची आहे, अन्यथा राष्ट्रवादी कॉँग्रेस संपुष्टात येईल, असेदेखील बहुसंख्याकांचे मत आहे.मनसे किंवा वंचित विकास आघाडीपैकी कोणाशी आघाडी करावी, या प्रश्नांवर कॉँग्रेस कार्यकर्ते फारसे अनुकूल नाहीत. याउलट मनसे किंवा वंचित विकास आघाडीचे निम्म्याहून अधिक कार्यकर्ते कॉँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी करण्यास अनुकूल आहेत. त्यांच्या मतानुसार, सध्याची भाजपची ताकद पाहता महाराष्ट्रात कोणताही एकच पक्ष त्यांचा पराभव करू शकेल, असे दिसत नसल्याने महाआघाडी करावी. त्यात बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आदी घटक पक्षांनाही सामावून घेण्याची मागणी मनसे आणि वंचित विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.