शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

कॉँग्रेसला पुनर्बांधणीची गरज; कार्यकर्त्यांचा कौल : कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीत अविश्वासच अधिक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:13 IST

वसंत भोसले । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘लोकमत’ने आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणाची मोहीम आखली असून या आठवड्यात ...

वसंत भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘लोकमत’ने आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणाची मोहीम आखली असून या आठवड्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, मनसे आणि वंचित आघाडीच्या राज्यातील २८८ मतदारसंघांतील कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. यामध्ये कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीने लोकसभा निवडणूक आघाडी करून लढविली असली तरी कार्यकर्त्यांचा एकमेकांच्या पक्षांवर विश्वासच राहिलेला नाही. शिवाय भाजपची सत्ता पुन्हा एकदा आली तरी चालेल. मात्र, आपल्या पक्षाची पुनर्बांधणी करण्यावर भर द्यावा, अशी स्पष्ट भावना कॉँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे जाणवते.महाराष्ट्रातील सातही विभागांतील २८८ मतदारसंघांत या मोहिमेपैकी पहिला सर्व्हे काल पूर्ण करण्यात आला. त्यात या पक्षांच्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून त्यांची मते जाणून घेण्यात आली. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी २४० जागांवर आघाडी झाली असून, उर्वरित जागांवर इतर घटक पक्षांशी बोलणी करून आघाडीस अंतिम रूप देण्यात येईल, असे म्हटले असले तरी कॉँग्रेसच्या ६५ टक्के कार्यकर्त्यांना असे वाटते की, भाजपने केंद्रात सत्ता मिळविल्याने विधानसभा निवडणुकीतही वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात कॉँग्रेसचे पानिपत झाले असले तरी कार्यकर्त्यांचे जाळे आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसशी आघाडी केल्याने अनेक जिल्ह्यांत पक्षाची ताकद वाढण्यास मर्यादा आल्या आहेत.शिवसेना-भाजपविरुद्ध महाआघाडीच हवीमहाराष्ट्रात भाजपला शिवसेना पर्याय होऊ शकत नाही, कॉँग्रेसला राष्ट्रवादी कॉँग्रेस पर्याय ठरू शकत नाही, असे मत नोंदविणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यासाठी भाजपला टक्कर देण्यासाठी कॉँग्रेस विचारसरणीच पर्याय असू शकते. याउलट राष्ट्रवादीने काहीवेळा ‘सोयीची भूमिका’ घेतली आहे, अशीही भावना आहे. उपेक्षित, दलित, अल्पसंख्याक आणि हिंदू समाजातील मोठा वर्ग कॉँग्रेसला मानणारा आहे. हा वर्ग दूर जाऊ नये यासाठी भाजपविरोधात थेट भूमिका घेतली पाहिजे. राष्ट्रवादी कॉँग्रेस विश्वासार्ह नाही, या पक्षाशी आघाडी केल्याने अनेक मतदारसंघांतील ताकद संपली आहे. पक्षाच्या वाढीला मर्यादा आल्या आहेत, असे मत व्यक्त करून आता नसेल तरी पुढील निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघांत कॉँग्रेस कार्यकर्त्यांना संधी निर्माण करून देणे योग्य ठरेल, असेही त्यांना वाटते.राष्ट्रवादीचे बहुसंख्य कार्यकर्ते आघाडीच्या बाजूने आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे पाठबळ, त्यांना मानणाºया अनेक समाज घटकांच्या आघाडीमुळे पाठिंबा मिळविणे सोपे जाते, हा अनुभव केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडीच्या वेळी कामी आलेला आहे, असे त्यांचे मत आहे. यासाठी दोन्ही कॉँग्रेसच्या आघाडीसाठी ते अनुकूल मत नोंदवत आहेत, असे दिसते. राष्ट्रवादी कॉँग्रेसची ताकद एका मर्यादेपेक्षा अधिक वाढत नाही, तेथे कॉँग्रेसची मदत गरजेची आहे, अन्यथा राष्ट्रवादी कॉँग्रेस संपुष्टात येईल, असेदेखील बहुसंख्याकांचे मत आहे.मनसे किंवा वंचित विकास आघाडीपैकी कोणाशी आघाडी करावी, या प्रश्नांवर कॉँग्रेस कार्यकर्ते फारसे अनुकूल नाहीत. याउलट मनसे किंवा वंचित विकास आघाडीचे निम्म्याहून अधिक कार्यकर्ते कॉँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी करण्यास अनुकूल आहेत. त्यांच्या मतानुसार, सध्याची भाजपची ताकद पाहता महाराष्ट्रात कोणताही एकच पक्ष त्यांचा पराभव करू शकेल, असे दिसत नसल्याने महाआघाडी करावी. त्यात बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आदी घटक पक्षांनाही सामावून घेण्याची मागणी मनसे आणि वंचित विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.