शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

कॉँग्रेस-राष्ट्रवादीची रयत आघाडीशी गट्टी

By admin | Updated: March 14, 2017 00:02 IST

शेट्टी, मोहनराव, विशाल पाटील, महाडिक यांच्यात चर्चा

सांगली : रयत विकास आघाडीला सोबत घेऊन जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्याची खेळी यशस्वी करण्याच्या दिशेने कॉँग्रेस नेत्यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, राहुल महाडिक यांच्यात बोलणी झाली. याबाबतचा तपशील नेत्यांनी जाहीर केला नसला, तरी रयत आघाडीचा कॉँग्रेसला हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेच्या ६० पैकी २५ जागा जिंकून भाजप सत्तेच्या जवळ आहे, तर कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे दोघांचे मिळून २४ संख्याबळ आहे. रयत विकास आघाडीकडे चार, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस आघाडीकडे एक सदस्य आहे. शिवसेनेचे तीन आणि अजितराव घोरपडे गटाचे दोन सदस्य निवडून आले आहेत. निकालानंतर कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येण्याचे ठरवले असून, आघाड्यांच्या मदतीने भाजपला सत्तेपासून दूर करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. कॉँग्रेसचे माजी मंत्री आ. पतंगराव कदम आणि त्यांचे बंधू आ. मोहनराव कदम यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी सर्वप्रथम राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून एकत्र येण्याचे ठरवले. नंतर इतरांशी बोलणी सुरू केली. रयत आघाडीच्या नेत्यांसोबत पतंगराव आणि मोहनराव कदम, सत्यजित देशमुख यांच्यात चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. शुक्रवारी माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि मोहनराव कदम यांची बैठक झाली.सोमवारी खा. शेट्टी, मोहनराव कदम, विशाल पाटील आणि रयत आघाडीचे राहुल महाडिक यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. भाजपच्या सरकारमधील राज्यमंत्री आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना बाजूला करून खा. शेट्टी यांनी यापूर्वीच काँग्रेसला हिरवा कंदील दाखवला आहे. रयत आघाडीतील महाडिक, नायकवडी आणि सी. बी. पाटील गटाचे मन वळवण्याचेही प्रयत्न अंतिम टप्प्यात आले आहेत. सोमवारच्या चर्चेनंतर नेमका काय निर्णय झाला, याबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. येत्या २१ तारखेस जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड होणार आहे. एकीकडे काँग्रेसचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे भाजपनेही जोरदार हालचाली केल्या आहेत. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी खा. संजयकाका पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याकरवी मोर्चेबांधणी केली आहे. सदाभाऊ खोत यांनीही पुढाकार घेतला आहे.सदाभाऊंना बाजूला करून निर्णय शक्यसदाभाऊ खोत यांचा कल भाजपच्या दिशेने असला, तरी त्यांचा एकही सदस्य रयत विकास आघाडीत नाही. त्यातच राजू शेट्टी आणि त्यांच्यातील दुरावा वाढत चालला आहे. रविवारी दोघेही नेते इस्लामपुरात जिल्हा परिषद सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात एकत्र होते, मात्र त्यांच्यातील अबोला कायम होता. खा. शेट्टी भाजपच्या विरोधात बोलत आहेत. आघाडीतील इतर नेत्यांवरही शेट्टींच्याच मताचा प्रभाव दिसत आहे. अनेक कार्यकममांत डावलल्याने महाडिक गटाचा खोत यांच्यावर राग आहे. त्यामुळे आता खोत यांना बाजूला करून रयत आघाडीचे नेते निर्णय घेतील, असे सांगितले जाते.शिवसेनाही दुखावलीआठवड्यापूर्वी भाजपने शिवसेनेशिवाय सत्ता स्थापनेचा दावा करून त्यांना दुखावले. त्यावर शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी नाराजी व्यक्त करताच जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी सारवासारव केली. मात्र, दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत शंका उपस्थित होत आहे. भाजपपासून दुखावलेल्या नाराजांना जवळ करून कॉँग्रेसने धक्कातंत्राची तयारी केली आहे. चार जागा हातात असलेल्या रयत विकास आघाडीचा पाठिंबा मिळाला, तर संख्याबळाचे उद्दिष्ट गाठण्यास दोन्ही कॉँग्रेसला अडचण राहणार नाही.