शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

सावकरांना काँग्रेस आघाडीचा ‘बाय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:55 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीचा उमेदवारच उभा न करता जनसुराज्य पक्षाचे ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीचा उमेदवारच उभा न करता जनसुराज्य पक्षाचे संस्थापक, माजी मंत्री विनय कोरे यांच्यामागे रसद पुरविण्याच्या हालचाली आघाडीत सुरू आहेत.कोरे महायुतीत असले तरी स्थानिक राजकारणात ते आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्यासोबत राहिले आहेत. त्यात लोकसभा निवडणुकीत कोरे यांनी ‘हातकणंगले’मध्ये भूमिका जाहीर न करता मदत केल्याने त्यांचा पैरा फेडण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी आग्रही आहेत. त्यामुळे काँग्रेस ५, राष्टÑवादी ३ व स्वाभिमानीने १ जागेवर लढावे, अशी प्राथमिक चर्चा झाली आहे. मात्र, ‘स्वाभिमानी’ने ‘हातकणंगले’वर दावा सांगितल्याने काँग्रेसपुढे पेच निर्माण झाला आहे.विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेसचे राज्याचे जागावाटप निश्चित झाले आहे. दोन्ही काँग्रेस प्रत्येकी १२५ जागा लढणार असून, उर्वरित ३८ जागा मित्रपक्षांना देणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील दहा जागांचे वाटपही बऱ्यापैकी पूर्ण झाले असून ‘कोल्हापूर उत्तर’, ‘कोल्हापूर दक्षिण’, ‘करवीर’, ‘हातकणंगले’, ‘इचलकरंजी’ या जागा काँग्रेसला मिळणार आहेत. ‘कागल’, ‘चंदगड’, ‘राधानगरी-भुदरगड’ या राष्टÑवादीला, तर ‘शिरोळ’ स्वाभिमानी पक्षाला सोडण्यात येणार आहेत. ‘शाहूवाडी’तून काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे सभापती अमरसिंह पाटील यांनी मागणी केली आहे; पण जिल्हा बँक, गोकुळ, बाजार समितीसह स्थानिक राजकारणात माजी मंत्री विनय कोरे हे दोन्ही काँग्रेससोबत राहिले आहेत. अटीतटीच्या विधानपरिषद निवडणुकीत कोरे यांनी आमदार सतेज पाटील यांच्या मागे ताकद लावली होती, तर मावसभाऊ आमदार सत्यजित पाटील हे महादेवराव महाडिक यांच्यासोबत राहिल्याचा राग आमदार पाटील यांच्या मनात आहे. स्थानिक राजकारणात त्यांची महाडिक विरोधातच भूमिका असल्याने आमदार मुश्रीफ व आमदार पाटील यांचे पाठबळ राहणार आहे. त्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीत असतानाही कोरे यांनी ‘हातकणंगले’मध्ये आपली भूमिका जाहीर केली नव्हती; पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणाला मदत केली, हे जगजाहीर आहे. त्यामुळेच लोकसभेचा पैरा फेडण्यासाठी राजू शेट्टी दोन्ही काँग्रेसशी सहमती दर्शवतील, अशी चर्चा आहे.‘स्वाभिमानी’ने हातकणंगलेवर दावा सांगितला आहे; पण येथून काँग्रेसतर्फे राजू जयवंतराव आवळे हे इच्छुक आहेत. त्यांनी लढण्याची पूर्ण तयारी केल्याने आघाडीसमोर पेच निर्माण झाला आहे. राजू शेट्टी हे मराठवाड्याच्या दौºयावर आहेत, ते शुक्रवारी (दि. २०) कोल्हापुरात येत आहेत. त्यानंतरच ‘हातकणंगले’चा पेच सुटणार आहे.