शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पालकमंत्र्यांच्या वक्तव्याने काँग्रेस गोटात धास्ती

By admin | Updated: November 5, 2015 00:45 IST

सर्वसामान्य जनतेतही उत्सुकता : 'अंडरकरंटस्'वर काँग्रेसचे लक्ष

कोल्हापूर : महानगरपालिकेत प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करावे, असा कौल कोल्हापूरकरांनी दिल्यानंतर आणि कॉँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाल्यानंतरही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘महापौर हा भारतीय जनता पक्षाचाच होईल,’ असा गौप्यस्फोट केल्यामुळे काँग्रेसच्या गोटात धास्ती पसरली आहे. ‘राजकारणात चमत्कार घडत असतात,’ असे सूचक वक्तव्य पालकमंत्र्यांनी केल्यामुळे त्यामध्ये कोणते ‘अंडर करंटस्’ आहेत का; यावरही काँग्रेसकडून बारीक लक्ष ठेवले जात आहे. महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक २७ जागा जिंकून सत्तेचा प्रमुख दावेदार होण्याचा मान मिळविला. राष्ट्रवादीने १५ जागा मिळविल्या. त्यामुळे काँग्रेसचा महापौर होण्यात कसलीच अडचण होणार नाही, हे स्पष्ट झाले. त्यापाठोपाठ भाजप व ताराराणी युतीने ३२ (१३ + १९) जागा मिळवून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. प्रबळ विरोधी पक्ष म्हणून भाजप व ताराराणी आघाडीने महापालिकेत आपली जबाबदारी पार पाडावी, असाच मतदारांचा कौल आहे; परंतु सत्ता मिळविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वेगळ्या पद्धतीने हालचाली सुरू केल्याने ‘दुधात मिठाचा खडा’ नको म्हणून कॉँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी मंगळवारी घाईगडबडीने राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करून आघाडी करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारच्या बैठकीत महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती या पदांच्या संदर्भातील निर्णय झाले आहेत, अन्य पदांच्या बाबतीत निर्णय व्हायचे आहेत. त्यावर चर्चा करण्याचे जाणीवपूर्वक टाळण्यात आले. कॉँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होताच पालकमंत्री पाटील यांनी चोवीस तासांपूर्वीचे आपले वक्तव्य बदलून ‘राजकारणात चमत्कार घडत असतात, १६ तारखेला आमचाच महापौर होईल,’असे वक्तव्य केले. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात पुन्हा धडकी भरली आहे.प्रत्यक्षात कागदावरचे संख्याबळ पाहता भाजपला आपला महापौर करणे केवळ अशक्य आहे तरीही पालकमंत्र्यांनी आत्मविश्वासाने चमत्काराची भाषा केली. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात धास्ती निर्माण झाली असून या वक्तव्यांत काही संदर्भ जोडले जात आहेत का, याची शहानिशा केली जात आहे. ‘साबरमती ते बारामती’ असा एक संदर्भ शिवसेनेने पुढे आणला होता, त्यात काही तथ्थ आहे का? राज्य तसेच देशपातळीवरील राजकारणाचे पडसाद काही उमटणार आहेत का हेही तपासून पाहिले जात आहे. भाजपची जास्त भिस्त राष्ट्रवादीवर असली तरी भविष्यकाळात भाजप आणि राष्ट्रवादी अशी युती होणे अशक्य कोटीतील गोष्ट आहे. (प्रतिनिधी)