शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
3
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
4
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
5
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
6
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
7
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
8
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
9
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
10
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
11
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
12
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
13
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
15
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
16
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
17
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
18
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
19
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
20
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?

आघाडीमुळे जिल्ह्यातील काँग्रेसची घडी विस्कटली

By admin | Updated: July 31, 2014 00:46 IST

दिग्गज नेते शिवसेनेत : जिल्हा बॅँक, ‘गोकुळ’ निवडणुकीत अडचणी वाढणार

राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूरलोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत आघाडी होणार असल्याने जिल्ह्यात कॉँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षांत मोठ्या मेहनतीने जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी बांधलेली कॉँग्रेस नेत्यांची मोट विस्कटण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आगामी जिल्हा बॅँक, ‘गोकुळ’सह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कॉँग्रेससमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर प्रत्येक तालुक्यात लक्ष केंद्रित करीत नेतेमंडळींनी कॉँग्रेसचा गट मजबूत केला होता. विशेषत: कागल, चंदगड, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, हातकणंगले या तालुक्यांत त्यांनी विशेष लक्ष देत सर्व नेत्यांना एकत्र बांधण्याचे काम केले.राधानगरी-भुदरगडमध्ये बजरंग देसाई, दिनकरराव जाधव, प्रकाश आबिटकर, विजयसिंह मोरे, अरुण डोंगळे या सर्व नेत्यांना एकत्रित आणले. येथे ‘गोकुळ,’ जिल्हा परिषदेमधील पद व विधानसभा यांची वाटणी करून ही जागा सुरक्षित केली होती. चंदगडमध्ये भरमूअण्णा पाटील व नरसिंगराव पाटील यांना एकत्र आणत राष्ट्रवादीला रोखले. येथेही याच सूत्राप्रमाणे विधानसभेचा उमेदवार ठरला होता. शाहूवाडीमध्ये सत्यजित पाटील व कर्णसिंह गायकवाड यांचे मनोमिलन केले. येथे कर्णसिंह गायकवाड गटाला ‘गोकुळ’ देऊन सत्यजित पाटील यांना कॉँग्रेसमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू होता. हातकणंगलेमध्ये जयवंतराव आवळे, प्रकाश आवाडे, महादेवराव महाडिक हे नेते एकत्र आले. त्याचा परिणाम जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दिसला. कॉँग्रेसने तब्बल ३१ जागा जिंकत ‘स्वाभिमानी’च्या साथीने सत्ता प्रस्थापित केली. यामध्ये याच तालुक्याचे योगदान मोठे होते. तालुकांतर्गत नेत्यांचे मतभेद असले तरी त्यांना एकत्रित बांधण्याचे कौशल्य नेत्यांनी दाखवले होते. पक्षाची बांधलेली मोट विस्कटू नये, यासाठी आघाडीच्या फॉर्म्युल्याप्रमाणे कोल्हापूरची जागा कॉँग्रेसलाच मिळावी, यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. ही जागा कॉँग्रेसला मिळाली असती तर खासदार सदाशिवराव मंडलिक बाहेर पडले नसते; पण राष्ट्रवादीने स्वत: बेरजेचे राजकारण करीत कॉँग्रेसमध्ये वजाबाकी केली. विधानसभा निवडणुकीतही आघाडीवरच चर्चा सुरू असल्याने अस्वस्थ कॉँग्रेसचे नेते शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. मतदारसंघ काँग्रेसला मिळणार नसल्याने प्रकाश आबिटकर, संजय घाटगे यांनी शिवसेनेची वाट धरली आहे. त्यांच्यापाठोपाठ नरसिंग पाटील हेही अस्वस्थ आहेत. गेली पाच वर्षे मनाने कॉँग्रेससोबत असलेले सत्यजित पाटील यांनी शिवसेनेची वाट धरली आहे. याचा मोठा फटका कॉँग्रेसला बसणार आहे. राष्ट्रवादीसोबत आघाडी जरी केली, तरी आगामी काळात सहकारी संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही कॉँग्रेसच एकमेकांच्या विरोधात असणार आहेत. हे नेते बाहेर गेल्याने कॉँग्रेससमोरील अडचणी वाढणार आहेत.