शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

‘दुटप्पीं’ना दूर केल्याने काँग्रेसला यश

By admin | Updated: November 5, 2015 00:11 IST

पतंगराव कदम यांचा टोला : महानगरपालिका विजयामुळे काँग्रेसला नवसंजीवनी

कोल्हापूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील सलग पराभवामुळे खचलेल्या काँग्रेसला महापालिकेच्या विजयामुळे नवसंजीवनी मिळाली. त्याचा भविष्यातील राजकारणासाठी नक्कीच लाभ होईल, असे गौरवोद्गार माजी मंत्री व काँग्रेस पक्षाचे निरीक्षक पतंगराव कदम यांनी काँग्रेस समिती कार्यालयात झालेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार समारंभात काढले. या निवडणुकीत ‘आत एक आणि बाहेर दुसरेच’ करणाऱ्या प्रवृत्तीला पक्षाने दूर ठेवल्यामुळेच हे यश मिळाले, अशी खोचक टिपण्णी कदम यांनी आमदार महादेवराव महाडिक यांचे नाव न घेता केली. महापालिका निवडणुकीतील काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा मंगळवारी काँग्रेस कार्यालयात कदम यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी ते बोलत होते.कदम म्हणाले, ‘पश्चिम महाराष्ट्रात जे घडते ते राज्यात घडते आणि जे राज्यात घडते ते संपूर्ण देशात घडते म्हणून भविष्यातील काँग्रेसच्या राजकारणाला नवीन गती, संजीवनी देण्याचे काम कोल्हापूरच्या जनतेने केले. दररोज आढावा घेत गेलो. तिकीट वाटपसुद्धा सर्व संमतीने झाले म्हणूनच पक्षाला मोठे यश मिळाले. आपल्या पक्षात आपल्याच माणसांना पराभूत करणारी प्रवृत्ती असून हीच काँग्रेसची खरी गंमत आहे; परंतु यंदाच्या मनपा निवडणुकीत अशा प्रवृत्तींना बाजूला ठेवले. ज्यांनी ज्यांनी विरोधात काम केले, त्यांची नावे व घटना लेखी कळवा, संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.’मनपा निवडणुकीत काँग्रेसला २३ टक्के मते मिळाली आहेत. ‘अच्छे दिन’च्या भूलथापांतून जनता बाहेर आल्यामुळे काँग्रेसला चांगले यश मिळाले. हे यश एकट्या सतेज पाटील यांचे नाही तर संयुक्तिक आहे, असे सांगत सतेज पाटील यांनी जनतेचा विश्वास संपादन केला. आता तो टिकविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केले. प्रत्येक सहा महिन्यांनी प्रभागात ‘जनता दरबार’ घेऊन कामांचा आढावा घेतला जाईल आणि त्यास मी स्वत: उपस्थित राहीन, असेही कदम यांनी सांगितले. काँग्रेसमधून काही जणांना फोडण्याचा प्रयत्न झाला, पक्षात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कॉँग्रेस जनतेचा अजेंडा घेऊन मतदारांच्या दारात गेला. प्रदेश कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी दिशा दिली म्हणूनच हे यश मिळाले, असे सतेज पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, जयवंतराव आवळे यांची भाषणे झाली. शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी स्वागत केले. सरलाताई पाटील यांनी आभार मानले. समारंभास सुरेश कुराडे, ऋतुराज पाटील, संध्या घोटणे, प्रकाश सातपुते आदी उपस्थित होते.