शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘दुटप्पीं’ना दूर केल्याने काँग्रेसला यश

By admin | Updated: November 5, 2015 00:11 IST

पतंगराव कदम यांचा टोला : महानगरपालिका विजयामुळे काँग्रेसला नवसंजीवनी

कोल्हापूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील सलग पराभवामुळे खचलेल्या काँग्रेसला महापालिकेच्या विजयामुळे नवसंजीवनी मिळाली. त्याचा भविष्यातील राजकारणासाठी नक्कीच लाभ होईल, असे गौरवोद्गार माजी मंत्री व काँग्रेस पक्षाचे निरीक्षक पतंगराव कदम यांनी काँग्रेस समिती कार्यालयात झालेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार समारंभात काढले. या निवडणुकीत ‘आत एक आणि बाहेर दुसरेच’ करणाऱ्या प्रवृत्तीला पक्षाने दूर ठेवल्यामुळेच हे यश मिळाले, अशी खोचक टिपण्णी कदम यांनी आमदार महादेवराव महाडिक यांचे नाव न घेता केली. महापालिका निवडणुकीतील काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा मंगळवारी काँग्रेस कार्यालयात कदम यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी ते बोलत होते.कदम म्हणाले, ‘पश्चिम महाराष्ट्रात जे घडते ते राज्यात घडते आणि जे राज्यात घडते ते संपूर्ण देशात घडते म्हणून भविष्यातील काँग्रेसच्या राजकारणाला नवीन गती, संजीवनी देण्याचे काम कोल्हापूरच्या जनतेने केले. दररोज आढावा घेत गेलो. तिकीट वाटपसुद्धा सर्व संमतीने झाले म्हणूनच पक्षाला मोठे यश मिळाले. आपल्या पक्षात आपल्याच माणसांना पराभूत करणारी प्रवृत्ती असून हीच काँग्रेसची खरी गंमत आहे; परंतु यंदाच्या मनपा निवडणुकीत अशा प्रवृत्तींना बाजूला ठेवले. ज्यांनी ज्यांनी विरोधात काम केले, त्यांची नावे व घटना लेखी कळवा, संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.’मनपा निवडणुकीत काँग्रेसला २३ टक्के मते मिळाली आहेत. ‘अच्छे दिन’च्या भूलथापांतून जनता बाहेर आल्यामुळे काँग्रेसला चांगले यश मिळाले. हे यश एकट्या सतेज पाटील यांचे नाही तर संयुक्तिक आहे, असे सांगत सतेज पाटील यांनी जनतेचा विश्वास संपादन केला. आता तो टिकविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केले. प्रत्येक सहा महिन्यांनी प्रभागात ‘जनता दरबार’ घेऊन कामांचा आढावा घेतला जाईल आणि त्यास मी स्वत: उपस्थित राहीन, असेही कदम यांनी सांगितले. काँग्रेसमधून काही जणांना फोडण्याचा प्रयत्न झाला, पक्षात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कॉँग्रेस जनतेचा अजेंडा घेऊन मतदारांच्या दारात गेला. प्रदेश कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी दिशा दिली म्हणूनच हे यश मिळाले, असे सतेज पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, जयवंतराव आवळे यांची भाषणे झाली. शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी स्वागत केले. सरलाताई पाटील यांनी आभार मानले. समारंभास सुरेश कुराडे, ऋतुराज पाटील, संध्या घोटणे, प्रकाश सातपुते आदी उपस्थित होते.