शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

गणेशाची सेवा करणारी कोल्हापूरची मंडळी

By admin | Updated: September 1, 2015 00:11 IST

१८ वर्षे सलग सेवा : कोल्हापूर-गणपतीपुळे मार्गावर गाडीतील बिघाड दूर करण्यास तत्पर

कोल्हापूर : एखाद्या आडमार्गावर दुचाकी, चारचाकी बंद पडली, पंक्चर झाली, तर त्या ठिकाणी काही सेवा उपलब्ध नसल्यास किती मोठी अडचण निर्माण होते. त्याचा विचारही न केलेलाच बरा, त्यात अशावेळी एखाद्या गु्रपने मदतीचा हात दिल्यानंतर किती हायसे वाटते, अशी मदत कोल्हापुरातून गणपतीपुळे येथे अंगारकी संकष्टीसाठी जाणाऱ्यांना वाहनधारकांना तेही एकही पैशाची अपेक्षा न ठेवता मोफत सेवा देणाऱ्या अमोल सरनाईक यांच्या गु्रपची गणेश सेवा काही औरच म्हणावी लागेल.१९९६ मध्ये कोल्हापुरातील अमोल सरनाईक हे आपल्या मित्रांसह गणपतीपुळे (रत्नागिरी) येथे अंगारकी संकष्टीला गणेश दर्शनासाठी निघाले होते. जातानाच त्यांची दुचाकी साखरपा ते पालीदरम्यान पंक्चर झाली. यावेळी त्यांनी जाणा-येणाऱ्या वाहनधारकांकडे मदत मागितली, पण कोणीच मदतीचा हात दिला नाही. बिघाड झालेली गाडी त्यांनी ओढत पाली येथे नेली तेथून त्यांनी ती दुरुस्त करून पुढे गणपतीपुळे गाठले व दर्शन घेतले. ही बाब त्यांच्या मनात घर करून बसली. त्यांनी कोल्हापुरात आल्यानंतर त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या मंडळींना आपण अंगारकी संकष्टीला कोल्हापूर ते गणपतीपुळे या मार्गावर कोणाची गाडी बंद पडली अथवा पंक्चर झाली, तर केवळ स्पेअर पार्टचे पैसे घेऊन ती तत्काळ दुरुस्त करून द्यायची, अशी संकल्पना मांडली. त्यानंतर १९९७ मध्ये आलेल्या अंगारकी संकष्टीला त्यांनी या संकल्पनेला प्रत्यक्ष उतरवलेही. पहिल्या वर्षी त्यात काही मोजकीच मंडळी सहभागी झाली. पुढे त्यांचे मित्र उदय चव्हाण, संदीप रसाळे, अमित नलवडे, अभिजित नारे, राजू मुजावर, शंकर केंगार, सचिन भोसले, अभिजित लोहार, उल्हास पाटील, कुणाल भोसले, रमेश बावले, विनायक पाटील, विशाल खटांगळे यांनीही साथ दिली. यंदा तर या मोफत सेवेला १८ वर्षे पूर्ण झाली. आज, मंगळवारी कोल्हापूर ते गणपतीपुळे या मार्गावर कोल्हापूरच्या मंडळींनी दोन मोफत केंद्रे स्थापन केली आहेत. त्यात चाफे गावाजवळ, तर दुसरे केंद्र गणपतीपुळे संस्थानजवळील आपत्ती व्यवस्थापन कक्षाजवळ उभारण्यात आले आहे. या सेवा केंद्राद्वारे दुचाकी, चारचाकी दुरुस्ती , पंक्चर काढणे, बंद पडल्यास टोचण लावून या केंद्रांपर्यंत आणून दुरुस्त करून देणे ही सेवा केली जाते. ‘लोकमत’शी बोलताना अमोल सरनाईक म्हणाले, आपल्या वाट्याला आलेले दु:ख दुसऱ्यांच्या वाट्याला येऊ नये. देवदर्शनासाठी जाताना व तेथून सुरक्षित आपल्या घरी पोहोचावीत, अशी मनात भावना ठेवून आपण मित्रमंडळींसमवेत हे काम मोफत करतो. केवळ त्यात दुरुस्तीसाठी लागणाऱ्या स्पेअरची किंमत घेतली जाते. भाविकांच्या सेवा अर्थात ईश्वर सेवाच मानून आम्ही हे काम करतो.