शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: बस… आता थांबा, नामुष्की टाळायची असेल तर आंदोलन संपवा, सरकारला सहकार्य करा; जरांगेंना कुणाचा सल्ला?
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
5
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
6
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
7
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
8
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
9
"ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
10
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
15
अनवाणी चालत बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला सलमान खान, पळत पळतच कारजवळ आला अन्...
16
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
17
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
18
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
19
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
20
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

सोईच्या राजकारणाने कार्यकर्ते संभ्रमावस्थेत

By admin | Updated: May 6, 2016 01:11 IST

उत्तूर-मडिलगे गट : काँगे्रस, राष्ट्रवादी व शिवसेनेतील नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे पक्षनिष्ठेला तडा; मनधरणीसाठी नेत्यांचे प्रयत्न

रवींद्र येसादे --उत्तूर --आजरा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत नेत्यांच्या सोईच्या राजकारणामुळे काँगे्रस, राष्ट्रवादी व शिवसेनेतील नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत असल्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पं. समिती निवडणुकांत जबर फटका राजकीय पक्षांना बसणार आहे. कार्यकर्त्यांची उत्तूर-मडिलगे गटात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.उत्तूर-मडिलगे गटातून अशोक चराटी यांच्या महाआघाडीने उमेदवारी जाहीर करून कार्यकर्त्यांना बुचकळ्यात टाकले आहे. राष्ट्रवादीचे कारखान्याचे संचालक मारुती घोरपडे यांनी महाआघाडीतून उमेदवारी घेतली आहे. आमदार मुश्रीफ यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली होती; मात्र आमदारांकडून प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे उमेदवारी घेतली. मात्र, त्यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीच्या गोटात चलबिचल निर्माण झाली असून, तीच अवस्था मडिलगे येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते के. व्ही. येसणे यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी महाआघाडीची उमेदवारी घेतली.येसणे हे चराटी यांच्याबरोबर, तर शिंपी यांच्या गटातून राष्ट्रवादी, काँगे्रस आघाडीतून उपसभापती दीपक देसाई, माजी सभापती भिकाजी गुरव, माजी संचालक जाधव हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. राष्ट्रवादी काँगे्रस आघाडीकडून उमेदवारांचे नाव गुलदस्त्यात ठेवले आहे.उत्तूर गटातून महाआघाडीतून विश्वनाथ करंबळी, महिला गटातून नर्मदा सावेकर यांची नावे जाहीर झाल्याने प्रचार सुरू केला आहे. रवींद्र आपटे यांच्या मार्गदर्शनातून कारभार सुरू आहे. राष्ट्रवादी व काँगे्रसमधून वसंतराव धुरे यांचे नाव निश्चित आहे. उर्वरित जागेसाठी जि. प. सदस्य उमेश आपटे, त्यांच्या पत्नी वैशाली आपटे, जि. प. माजी सदस्य काशीनाथ तेली यापैकी दोघांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत आमदार मुश्रीफ यांनी तेली यांना शब्द दिला होता म्हणे? अशी चर्चा कार्यकर्त्यांत आहे.ही निवडणूक पक्षनिष्ठेला तडा जाणारी आहे. याचे पडसाद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर होणार आहेत. गतवेळच्या पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न महाआघाडीतील विश्वनाथ करंबळी यांच्याकडून केला जाणार आहे. मागील जि. प. निवडणुकीत राष्ट्रवादीच्या काही मंडळींनी उमेश आपटे यांना मदत केली होती. तीच पुनरावृत्ती करण्याच्या दृष्टीने महाआघाडी प्रयत्न करणार आहे; मात्र उमेश आपटे यांनाच राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने महाआघाडीही पेचात आहे. राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रसमध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने फुटीचे वातावरण निर्माण झाले आहे. आम्ही महाआघाडीतून उमेदवारी घेतली असली तरी आमदार मुश्रीफ यांचे आम्हाला वावडे नाही, अशी भूमिकाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांतून केली जात आहे. त्यामुळे आम्ही पक्षातून बाजूला गेलो असे नव्हे, असेही सांगितले जाते.काँगे्रसमध्येही तीच अवस्था आहे. पी. एन. पाटील यांना मानणारा रवींद्र आपटे यांचा गट आहे, तर आमदार सतेज पाटील यांना मानणारा गट आजरा तालुक्यात आहे. काँगे्रस नेमकी कुणाची पी. एन, सतेज पाटील की महादेवराव महाडिक यांची अशी अवस्था ही काँगे्रसच्या गोटातील कार्यकर्त्यांची झाली आहे. महाआघाडीचे उमेदवार ठरले असले तरी काँगे्रस-राष्ट्रवादी उमेदवारी माघारीपर्यंत ताणले जाणार आहेत. उत्तूर-मडिलगे गटातून राष्ट्रवादीचे चंद्रकांत गोरुले, गोविंद सावंत, महादेव पाटील, शिरीष देसाई यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.जिल्हा बँकेच्या ठरावावेळी राष्ट्रवादीचे ठराव चराटी यांच्याकडे गेले होते. त्या मंडळीशी संघर्ष सुरू आहे. आमदार मुश्रीफ नेमकी कोणती भूमिका घेणार की, सोयीचे राजकारण करणार यामुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत असून, जनता दलाचे सदानंद व्हनबट्टे, भाजप सरचिटणीस श्रीपती यादव हे महाआघाडीबरोबर राहणार आहेत.