शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याबाबत संभ्रमावस्था

By admin | Updated: April 28, 2015 00:28 IST

जिल्हा परिषद शिक्षकांचा प्रश्न : वेगवेगळ्या पत्रांनी पेच

बाहुबली : शैक्षणिक वर्षाच्या शेवटी म्हणजे एप्रिल व मे महिन्यांमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया केली जाते; परंतु गेली तीन-चार वर्षे या बदल्यांच्या प्रक्रियेमध्ये प्रशासन स्तरावर गोंधळ होत आहे. याहीवर्षी तशीच अवस्था प्राथमिक शिक्षण विभागाची आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समितींना सर्वच विभागांतील कर्मचाऱ्यांच्या नियमानुसार बदल्यांचे पत्र दिले. त्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी गैरसोयीतून गेलेल्या शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्याचे पत्र पाठविले. त्यामुळे शिक्षकांसह पंचायत समितीमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेकडील प्राथमिक शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, आदी कर्मचाऱ्यांच्या बदल्या ५ मे ते २५ मेपर्यंत केल्या जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या शिक्षकांची आहे. सन २०११-१२ मध्ये तालुकाबाह्य बदल्या, अतिरिक्त शिक्षक व समायोजन प्रक्रियेमुळे बदल्यांबाबत आवश्यक ती सर्व प्रक्रिया वेळोवेळी पूर्ण करता आली नाही. त्यामुळे अनेक शिक्षक बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच दोन अधिकाऱ्यांच्या पत्रांनी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.नियमानुसार गैरसोय झालेल्या शिक्षकांच्या बदल्या सर्वप्रथम करणे अपेक्षित आहे. त्यानंतर सर्वसाधारण बदल्या होणे गरजेचे आहे. यामध्ये दहा टक्के प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्या अंतर्भूत आहेत; परंतु प्रशासनाने सर्वप्रथम सर्वसाधारण बदल्या व नंतर गैरसोयीने झालेल्या बदल्यांबाबत पंचायत समितींना पत्रे पाठविली आहेत. त्यानुसार माहितीचे संकलनदेखील करून झाले आहे. आता पहिल्यांदा कोणत्या बदल्या होणार याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. (वार्ताहर)राज्य शासनाच्या आॅगस्ट २०१४च्या आदेशानुसार सर्वप्रथम गैरसोयीतून झालेल्या बदल्यांच्या प्रशासकीय बदल्या केल्या जातील. शिवाय सर्वसाधारण बदल्यांबाबतदेखील योग्य ती कार्यवाही नियमित वेळेत करून बदल्या केल्या जातील.- स्मिता गौड,प्राथमिक शिक्षणाधिकारी,जिल्हा परिषद, कोल्हापूर.