शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याबाबत संभ्रमावस्था

By admin | Updated: April 28, 2015 00:28 IST

जिल्हा परिषद शिक्षकांचा प्रश्न : वेगवेगळ्या पत्रांनी पेच

बाहुबली : शैक्षणिक वर्षाच्या शेवटी म्हणजे एप्रिल व मे महिन्यांमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया केली जाते; परंतु गेली तीन-चार वर्षे या बदल्यांच्या प्रक्रियेमध्ये प्रशासन स्तरावर गोंधळ होत आहे. याहीवर्षी तशीच अवस्था प्राथमिक शिक्षण विभागाची आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समितींना सर्वच विभागांतील कर्मचाऱ्यांच्या नियमानुसार बदल्यांचे पत्र दिले. त्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी गैरसोयीतून गेलेल्या शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्याचे पत्र पाठविले. त्यामुळे शिक्षकांसह पंचायत समितीमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेकडील प्राथमिक शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, आदी कर्मचाऱ्यांच्या बदल्या ५ मे ते २५ मेपर्यंत केल्या जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या शिक्षकांची आहे. सन २०११-१२ मध्ये तालुकाबाह्य बदल्या, अतिरिक्त शिक्षक व समायोजन प्रक्रियेमुळे बदल्यांबाबत आवश्यक ती सर्व प्रक्रिया वेळोवेळी पूर्ण करता आली नाही. त्यामुळे अनेक शिक्षक बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच दोन अधिकाऱ्यांच्या पत्रांनी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.नियमानुसार गैरसोय झालेल्या शिक्षकांच्या बदल्या सर्वप्रथम करणे अपेक्षित आहे. त्यानंतर सर्वसाधारण बदल्या होणे गरजेचे आहे. यामध्ये दहा टक्के प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्या अंतर्भूत आहेत; परंतु प्रशासनाने सर्वप्रथम सर्वसाधारण बदल्या व नंतर गैरसोयीने झालेल्या बदल्यांबाबत पंचायत समितींना पत्रे पाठविली आहेत. त्यानुसार माहितीचे संकलनदेखील करून झाले आहे. आता पहिल्यांदा कोणत्या बदल्या होणार याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. (वार्ताहर)राज्य शासनाच्या आॅगस्ट २०१४च्या आदेशानुसार सर्वप्रथम गैरसोयीतून झालेल्या बदल्यांच्या प्रशासकीय बदल्या केल्या जातील. शिवाय सर्वसाधारण बदल्यांबाबतदेखील योग्य ती कार्यवाही नियमित वेळेत करून बदल्या केल्या जातील.- स्मिता गौड,प्राथमिक शिक्षणाधिकारी,जिल्हा परिषद, कोल्हापूर.