शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याबाबत संभ्रमावस्था

By admin | Updated: April 28, 2015 00:28 IST

जिल्हा परिषद शिक्षकांचा प्रश्न : वेगवेगळ्या पत्रांनी पेच

बाहुबली : शैक्षणिक वर्षाच्या शेवटी म्हणजे एप्रिल व मे महिन्यांमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया केली जाते; परंतु गेली तीन-चार वर्षे या बदल्यांच्या प्रक्रियेमध्ये प्रशासन स्तरावर गोंधळ होत आहे. याहीवर्षी तशीच अवस्था प्राथमिक शिक्षण विभागाची आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समितींना सर्वच विभागांतील कर्मचाऱ्यांच्या नियमानुसार बदल्यांचे पत्र दिले. त्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी गैरसोयीतून गेलेल्या शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्याचे पत्र पाठविले. त्यामुळे शिक्षकांसह पंचायत समितीमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेकडील प्राथमिक शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, आदी कर्मचाऱ्यांच्या बदल्या ५ मे ते २५ मेपर्यंत केल्या जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या शिक्षकांची आहे. सन २०११-१२ मध्ये तालुकाबाह्य बदल्या, अतिरिक्त शिक्षक व समायोजन प्रक्रियेमुळे बदल्यांबाबत आवश्यक ती सर्व प्रक्रिया वेळोवेळी पूर्ण करता आली नाही. त्यामुळे अनेक शिक्षक बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच दोन अधिकाऱ्यांच्या पत्रांनी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.नियमानुसार गैरसोय झालेल्या शिक्षकांच्या बदल्या सर्वप्रथम करणे अपेक्षित आहे. त्यानंतर सर्वसाधारण बदल्या होणे गरजेचे आहे. यामध्ये दहा टक्के प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्या अंतर्भूत आहेत; परंतु प्रशासनाने सर्वप्रथम सर्वसाधारण बदल्या व नंतर गैरसोयीने झालेल्या बदल्यांबाबत पंचायत समितींना पत्रे पाठविली आहेत. त्यानुसार माहितीचे संकलनदेखील करून झाले आहे. आता पहिल्यांदा कोणत्या बदल्या होणार याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. (वार्ताहर)राज्य शासनाच्या आॅगस्ट २०१४च्या आदेशानुसार सर्वप्रथम गैरसोयीतून झालेल्या बदल्यांच्या प्रशासकीय बदल्या केल्या जातील. शिवाय सर्वसाधारण बदल्यांबाबतदेखील योग्य ती कार्यवाही नियमित वेळेत करून बदल्या केल्या जातील.- स्मिता गौड,प्राथमिक शिक्षणाधिकारी,जिल्हा परिषद, कोल्हापूर.