शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

इयत्ता पाचवी, आठवीच्या प्रवेशाबाबत संभ्रमावस्था

By admin | Updated: May 14, 2015 00:30 IST

पालकांना आर्थिक भुर्दंड : दोन वेगवेगळ्या परिपत्रकांमुळे पालक, संस्थाचालक, मुख्याध्यापकांचा गोंधळ

अतुल आंबी - इचलकरंजी -येथील शिक्षण मंडळ व प्राथमिक शाळांत पाचवी व आठवीचे वर्ग सुरू करण्यावरून निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेमुळे पालक, शाळांचे संस्थाचालक व मुख्याध्यापक यांचा चांगलाच गोंधळ उडाला आहे. या गोंधळामुळे पाचवी व आठवीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मात्र चांगलाच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.राज्य शासनाने प्राथमिक शिक्षण आठवीपर्यंतचे करून ज्याठिकाणी पहिली ते चौथी प्राथमिक शाळा आहे, तेथे नैसर्गिक वाढ म्हणून पाचवी व ज्याठिकाणी सातवीपर्यंतची प्राथमिक शाळा आहे, तेथे आठवीपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले. मात्र, यामध्ये पहिली ते चौथीसाठी एक किलोमीटर परिसरात, दुसरी पाचवीची शाळा असू नये, तसेच सातवीपर्यंतच्या शाळांना तीन किलोमीटर अंतरात आठवीची शाळा असू नये, अशी अटही घातली आहे. या अटीमुळे शहरातील ८५ टक्के शाळा या नियमबाह्य ठरतात. मात्र, १५ दिवसांपूर्वी येथील शिक्षण मंडळाच्यावतीने परिपत्रक काढून शहरातील सर्व प्राथमिक शाळांना पाचवी व आठवी वाढविण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करून शिक्षण मंडळ कार्यालयात देण्यासंदर्भात सूचना दिल्या. त्यानुसार मुख्याध्यापक व संस्थाचालकांनी धावपळ करून कागदपत्रांची जुळवाजुळव करून प्रस्ताव सादर केले.प्रस्ताव सादर केल्यामुळे आता पाचवी व आठवीचे वर्ग आपल्याच शाळेत सुरू होणार, असे वाटून चौथी व सातवी पास झालेल्या विद्यार्थ्यांचे दाखले संस्थेने ठेवून घेतले. काही शाळांमध्ये शिक्षण मंडळाकडून प्राप्त झालेले परिपत्रक नोटीस बोर्डावर लावून पुढील वर्ग सुरू करत असल्याची माहितीही लावण्यात आली होती. मात्र, ८ मे रोजी निकालादिवशी दुपारी बारानंतर शिक्षण मंडळाचे दुसरे परिपत्रक आले. त्यामध्ये पुढील शासन निर्णय येईपर्यंत वर्ग सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही करू नये, असे कळविण्यात आले. निकाल वाटून झाल्यानंतर असे परिपत्रक हातात मिळाल्याने मुख्याध्यापक व संस्थाचालकांची भंबेरी उडाली. काही शाळांमध्ये तातडीची बैठक घेऊन याबाबत शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली. अधिकाऱ्यांनी वरिष्ठांसोबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले. मात्र, पुढील वर्ग सुरू करण्यासंदर्भात कोणता निर्णय घ्यावा, याबाबत संभ्रमावस्था मात्र कायम राहिली.आमच्याकडून कोणताही आदेश नाही : स्मिता गौडयासंदर्भात जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी स्मिता गौड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, आमच्या कार्यालयाकडून कोणत्याही शाळेला नियमबाह्य पाचवी अथवा आठवीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात सूचना अथवा प्रस्तावाची मागणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित शाळांनी पालकांना दाखले द्यावेत. तर पाचवी व आठवीचे प्रवेश स्वीकारणाऱ्या शाळांनी रीतसर नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, असे म्हटले आहे.सात हजारांपासून सुरुवात?पाचवी व आठवीमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्रतेनुसार यादीत नाव आल्यास सात हजार रुपयांपासून डोनेशन मागणीची सुरुवात केली जाते. यादीमध्ये नाव न आलेल्यांकडून दुप्पट, तिप्पट डोनेशनची मागणी केली जात आहे. अचानकपणे उडालेल्या गोंधळामुळे पालकांनाही नेमकी तक्रार करायची कुणाकडे? असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.