शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मुश्रीफ-घाटगे यांच्यातच झुंज

By admin | Updated: October 2, 2014 00:37 IST

कागलला नऊ उमेदवार रिंगणात : परशुराम तावरे कोणाची मते खाणार?

जहॉँगीर शेख -कागल -- विधानसभा मतदारसंघात यावेळी नवरंगी निवडणूक होत असून, अर्धा डझन अधिकृत पक्षांचे उमेदवार पहिल्यांदाच या मतदारसंघात निवडणूक लढवीत आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे संजय घाटगे या दोन उमेदवारांमध्येच प्रमुख लढत असली, तरी भाजपचा मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार जिल्हा परिषद सदस्य परशुराम तावरे किती मते घेतात आणि ती कोणाला मारक ठरतात, याची उत्सुकताच आहे. हसन मुश्रीफ-संजय घाटगे यांची लढत होणार हे लोकसभा निवडणुकीच्यावेळीच स्पष्ट झाले होते. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तारखेआधी दोन दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात भूंकप होऊन आघाडी, युतीमध्ये घटस्फोट झाले. पक्षापेक्षा गटाच्याच राजकारणाला महत्त्व देणाऱ्या या मतदारसंघात युती तुटली, आघाडी फुटली याचे मोठे परिणाम होण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र, हसन मुश्रीफ आणि संजय घाटगेंना इतर पक्षांचे उमेदवार कोण असावेत याची मात्र काळजी होती. राष्ट्रीय कॉँग्रेसचे संतान बारदेस्कर (गडहिंग्लज) हे या काळजीवाहू राजकारणाचेच संदर्भ आहेत. कारण जि. प.चे माजी अध्यक्ष मनोज आपटे, राष्ट्रीय कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरेशराव कुऱ्हाडे असे दिग्गज उमेदवार असताना पक्षाने उमेदवारी बारदेस्कर यांना दिली आहे, तर संजय घाटगे गटातून राष्ट्रीय कॉँग्रेसच्या तिकिटावर जिल्हा परिषद सदस्य झालेले परशुराम तावरे हे देखील राष्ट्रीय कॉँग्रेसकडून इच्छुक होते. मात्र, तिकीट मिळत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी बाबा देसार्इंचा हात पकडून थेट भाजपचेच दार ठोठावले आणि तिकीटही आणले. भाजपच्या महायुतीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, आर. पी. आय. (आठवले गट), रासप या मित्रपक्षांचा समावेश आहे. पाच वर्षांपूर्वी संजय घाटगे हे शेतकरी संघटनेचे उमेदवार होते. परशुराम तावरे यांनी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली. आता ही महायुती तिसरा पर्याय या मतदारसंघात ठरणार की, कोणाच्या तरी पराभवाचे कारण ठरणार, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. कारण या पक्षांची लहान-लहान असेनात, पण मतांची पाकिटे मतदारसंघात आहेत. कै. बाबासाहेब कुपेकर यांचे बंधू बाळासाहेब कुपेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली होती. कारण कुपेकर घराण्यातील उमेदवारीचा फटका मुश्रीफांना बसणार होता. त्यांच्या माघारीने हा धोका तूर्त तरी टळला आहे. बाकी बसपा, ‘मनसे’चे अनुक्रमे सुदाम कांबळे, अजित मोडेकर यांच्यासह तीन अपक्ष काही मतांचे मानकरी असले, तरी ती मतेही एखाद्या उमेदवाराचे राजकीय गणित बिघडवू शकतात. या बेरजेच्या आणि वजाबाकीच्या राजकारणामुळेच इतर उमेदवारांना महत्त्व आले आहे. मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते असल्याने जिल्ह्याच्या राजकारणात घेतलेल्या काही निर्णयांचे पडसाद या मतदारसंघात उमटले. बाळासाहेब कुपेकर यांचा उमेदवारी अर्ज यातून भरला गेला, तर कॉँग्रेसचा उमेदवारही फारसा चर्चेतील निवडला गेला नाही. एकूणच राष्ट्रवादी-शिवसेना उमेदवारांत येथे प्रमुख लढत असली, तरी जिल्ह्याच्या राजकारणाचेच संदर्भ महत्त्वाचे मानल्याचे स्पष्ट झाले. कागल एकूण मतदार ३,0१,१४५ नावपक्षहसन मुश्रीफ राष्ट्रवादीसंजय घाटगे शिवसेनापरशुराम तावरेभाजपसंतान बारदेस्करकाँग्रेसअजित मोडेकरमनसेसुदाम कांबळे बसपाअमर शिंदेअपक्षदयानंद कांबळेअपक्षश्रीपती कांबळे अपक्ष