शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

‘पंचगंगे’ला प्रदूषणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:08 IST

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीतील पाणी प्रदूषित होण्यास सुरुवात झाली आहे. नदीपात्रातील पाण्यावर तेलकट व हिरवट तवंग दिसू लागला ...

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीतील पाणी प्रदूषित होण्यास सुरुवात झाली आहे. नदीपात्रातील पाण्यावर तेलकट व हिरवट तवंग दिसू लागला असून, हिरवट रंग म्हणजे जलपर्णीची बिजे रुजू लागल्याची चिन्हे आहेत. नजीकच्या दोन-तीन आठवड्यांत प्रदूषणाची तीव्रता वाढत जाऊन नदी जलपर्णीमय होईल, असे चित्र आहे.पंचगंगा नदीमत काठावरील शहरांसह ग्रामीण परिसर, तसेच औद्योगिक सांडपाणी मिसळल्यामुळे गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ पंचगंगा ही गटारगंगा झाली आहे. याचा प्रत्यय दरवर्षीच्या उन्हाळ्यात येत असतो. नदीमध्ये असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयांमध्ये पाणी साठविले असता पाण्यात मिसळणाºया दूषित पाण्याची तीव्रता वाढत जाऊन नदीपात्रातील पाणी प्रदूषित होत जाते. याचा परिणाम म्हणून साधारणत: फेब्रुवारी महिन्यापासून नदीतील पाणी काळसर दिसू लागते. यंदा मात्र जानेवारी महिन्यातच नदीतील पाण्यामध्ये तेलकट व हिरवट तवंग दिसत आहे.प्रदूषणमुक्तीसाठी आमदार उल्हास पाटील व कृषीतज्ज्ञ वसंतराव मुळीक यांनी मागील आठवड्यात पंचगंगा नदी संगम ते उगम अशी परिक्रमा केली. त्याच कालावधीमध्ये तेरवाड येथील बंधाºयातील पाण्यात पाणी दूषित झाल्याने काही मासे मृतावस्थेत आढळले होते. आता इचलकरंजी शहराजवळ पाणी काळसर आणि तेलकट दिसू लागले असल्यामुळे याची तीव्रता वाढण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.