शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

सुशिक्षितांच्याच निवडणुकीत गोंधळ

By admin | Updated: June 21, 2014 00:42 IST

निष्क्रिय प्रशासन : उदासीनता, गाफीलपणा, बेजबाबदारपणा नडला

कोल्हापूर : लोकशाही प्रक्रियेत सर्वांनी मतदान करावे, असे अभिप्रेत आहे. परंतु उदासीनता, गाफीलपणा आणि प्रशासनाचा बेजबाबदारपणा यांचा मिलाफ झाल्यावर एखाद्या निवडणुकीचा कसा बोजवारा उडतो, याचा प्रत्यय आज, शुक्रवारी झालेल्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत आला. चक्क सुशिक्षितांच्या निवडणुकीतील हा गोंधळ केवळ मतदारांनाच नाही, तर येथील जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवायला लावणारा ठरला. खरं तर ही निवडणूक सुशिक्षित मतदारांची होती. परंतु या निवडणुकीत प्रचंड गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. या गोंधळाला उमेदवार, मतदार आणि जिल्हा निवडणूक प्रशासन जबाबदार असल्याचेही स्पष्ट झाले. मतदान करणाऱ्यांपेक्षा मतदान न करणाऱ्यांचीच संख्या मोठी होती. या सगळ्या संतापजनक गोंधळाबद्दल भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष महेश जाधव यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच राज्य निवडणूक आयोगाकडेही तक्रार नोंदविली आहे. कोल्हापूर शहरातील १७ शाळांतील ५३ मतदान केंद्रांवरील मतदानास आज सकाळी आठ वाजता सुरुवात झाली आणि प्रशासनाकडून झालेल्या गडबडीची चाहूल लागायला सुरुवात झाली. उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीकडून देण्यात आलेल्या मतदार ओळखपत्रांनुसार मतदार त्या त्या मतदान केंद्रांवर जायला लागले त्यावेळी कोणाची नावे आहेत आणि कोणाची नावे नाहीत, हे कळायला लागले. उमेदवारांना देण्यात आलेल्या यादीत ज्या मतदाराचे नाव आहे, त्याचे नाव केंद्र अध्यक्षांकडील यादीतून गायब होते. अशा अनेक घटना निदर्शनास यायला लागल्या. त्यामुळे मतदारांमध्ये चलबिचलता निर्माण झाली. पदवीधर मतदारसंघात शहरातील २५ ते ३० मतदान केंद्रांत तर २०० ते ४०० मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याचे आढळून आले. अनेक मतदारांना यादीतील गोंधळामुळे एका मतदान केंद्रावरून दुसऱ्या केंद्रावर असे हेलपाटे मारावे लागले. तीन ते चार ठिकाणच्या केंद्रांवर जाऊनही नावे यादीत न सापडल्यामुळे मतदारांना मतदान करता आले नाही. शहरात मतदाराच्या घरापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावरील मतदान केंद्रावरील यादीत नावे असल्याने अनेकांना बरीच पायपीट करावी लागली. या गोंधळामुळे उमेदवार व त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढली. गेल्या महिन्यापासून जोरदार तयारी केली असतानाही ऐनवेळी यंत्रणेतील गोंधळामुळे मतदानाची टक्केवारी घटल्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी स्पष्टपणे जाणवत होती. शिक्षक मतदारसंघातही असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. अनेक अर्ज अपूर्ण राहिल्याने त्यांची नावे यादीत आली नाहीत. अनेक शिक्षकांनी आपले फोटो न दिल्यामुळे त्यांची नावे वगळली गेली. विद्यापीठ हायस्कूलमधील तीन केंद्रांवर सुमारे ४७० शिक्षक मतदारांची नावे वगळल्याचे सांगण्यात आले. मोठ्या हौसेने मतदानाला येणारे शिक्षक यादीत नाव नसल्याने मतदान करता न आल्याने निराश होऊन परत गेले. (प्रतिनिधी)