शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

कात्यायनी मंदिराची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:24 IST

अमर पाटील कळंबा : जगातील नवदुर्गांपैकी मानाची सहावी नवदुर्गा अशी ख्याती असणाऱ्या श्री कात्यायनी देवीच्या मंदिर परिसरातील नैसर्गिक व ...

अमर पाटील

कळंबा : जगातील नवदुर्गांपैकी मानाची सहावी नवदुर्गा अशी ख्याती असणाऱ्या श्री कात्यायनी देवीच्या मंदिर परिसरातील नैसर्गिक व प्राचीन वस्तूंची प्रचंड दुरवस्था झाली आहे. देखभाल, दुरुस्तीसह प्राचीन वास्तूंचे जतन करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत नसल्याने, काळाच्या ओघात हा प्राचीन ठेवा लुप्त होणार की काय, अशी भीती आता भाविकांमधून व्यक्त होत आहे.

जयंती आणि गोमती नद्यांचे उगमस्थान येथे असून प्राचीन हेमाडपंथी विस्तीर्ण मंदिर, बारमाही वाहणारे तीन नैसर्गिक पाण्याचे कुंड, शेकडो वर्षांपूर्वीचे गर्द सावली देणारे महाकाय वृक्ष या साऱ्यांची मोठी दुरवस्था झाली आहे.

बालिंगा गावचे ग्रामदैवत असणारे प्राचीन काळातील अकराव्या शतकात बांधण्यात आलेले हेमाडपंथी स्वरूपातील श्री कात्यायनी देवीचे मंदिर शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर वसले असून मंदिरास स्थानिक नागरिकांसह परराज्यातील भाविक वर्षभर भेट देत असतात.

मात्र, मंदिर परिसरातील परशुराम मंदिराची प्रचंड दुरवस्था झाली असून मंदिराच्या भिंती जीर्ण होऊन सुटू लागल्या आहेत. मंदिर कधी कोसळेल हे सांगता येत नाही. मंदिरातील नैसर्गिक कुंडाची मोठी पडझड झाली आहे. श्री कात्यायनी देवीचे मंदिर ते परशुराम कुंडाकडे जाणाऱ्या जयंती नदीच्या मार्गावर उभारण्यात आलेल्या लहान पुलाची दुरवस्था झाली आहे. श्री कात्यायनी देवीच्या मंदिरापुढील नैसर्गिक कुंडाच्या दगडी पायऱ्या, लोखंडी संरक्षक कठडे यांची पडझड झाल्याने दुरुस्ती गरजेची बनली आहे. मंदिराच्या पिछाडीस उगम पावणाऱ्या जयंती, गोमती नद्यांच्या पात्रांचे रुंदीकरण करून गाळ काढण्यासाठी प्रयत्न झालेच नाहीत. त्यामुळे या नद्या आहेत की नाले, हे उमजत नाही. या नद्या पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे असून यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. आजमितीला शासकीय निधीतून सुशोभिकरण सुरू असले तरी, यातून प्राचीन ठेवा संवर्धित व्हावा यासाठी फारसे लक्ष दिले गेले नाही.

चौकट:

सुशोभिकरण करताना भान का राहिले नाही

दोन कोटींच्या सुशोभिकरणाच्या उपलब्ध निधीतून मंदिराच्या पिछाडीवर भक्तनिवास, स्नानगृहे, शौचालय उभारण्यात आली असून त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. भविष्यात यातील पाणी झिरपून मंदिरासमोरील कुंडात येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे शोषखड्डे काढून अथवा स्वतंत्र पाईपलाईन टाकून हे सांडपाणी परिसराबाहेर नेणे गरजेचे आहे.

फोटो : ०८ कात्यायनी मंदिर

श्री कात्यायनी देवीच्या मंदिर परिसरातील जयंती नदीच्या पात्रावरील लोखंडी पुलाची दुरवस्था झाली आहे.