शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

कात्यायनी मंदिराची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:24 IST

अमर पाटील कळंबा : जगातील नवदुर्गांपैकी मानाची सहावी नवदुर्गा अशी ख्याती असणाऱ्या श्री कात्यायनी देवीच्या मंदिर परिसरातील नैसर्गिक व ...

अमर पाटील

कळंबा : जगातील नवदुर्गांपैकी मानाची सहावी नवदुर्गा अशी ख्याती असणाऱ्या श्री कात्यायनी देवीच्या मंदिर परिसरातील नैसर्गिक व प्राचीन वस्तूंची प्रचंड दुरवस्था झाली आहे. देखभाल, दुरुस्तीसह प्राचीन वास्तूंचे जतन करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत नसल्याने, काळाच्या ओघात हा प्राचीन ठेवा लुप्त होणार की काय, अशी भीती आता भाविकांमधून व्यक्त होत आहे.

जयंती आणि गोमती नद्यांचे उगमस्थान येथे असून प्राचीन हेमाडपंथी विस्तीर्ण मंदिर, बारमाही वाहणारे तीन नैसर्गिक पाण्याचे कुंड, शेकडो वर्षांपूर्वीचे गर्द सावली देणारे महाकाय वृक्ष या साऱ्यांची मोठी दुरवस्था झाली आहे.

बालिंगा गावचे ग्रामदैवत असणारे प्राचीन काळातील अकराव्या शतकात बांधण्यात आलेले हेमाडपंथी स्वरूपातील श्री कात्यायनी देवीचे मंदिर शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर वसले असून मंदिरास स्थानिक नागरिकांसह परराज्यातील भाविक वर्षभर भेट देत असतात.

मात्र, मंदिर परिसरातील परशुराम मंदिराची प्रचंड दुरवस्था झाली असून मंदिराच्या भिंती जीर्ण होऊन सुटू लागल्या आहेत. मंदिर कधी कोसळेल हे सांगता येत नाही. मंदिरातील नैसर्गिक कुंडाची मोठी पडझड झाली आहे. श्री कात्यायनी देवीचे मंदिर ते परशुराम कुंडाकडे जाणाऱ्या जयंती नदीच्या मार्गावर उभारण्यात आलेल्या लहान पुलाची दुरवस्था झाली आहे. श्री कात्यायनी देवीच्या मंदिरापुढील नैसर्गिक कुंडाच्या दगडी पायऱ्या, लोखंडी संरक्षक कठडे यांची पडझड झाल्याने दुरुस्ती गरजेची बनली आहे. मंदिराच्या पिछाडीस उगम पावणाऱ्या जयंती, गोमती नद्यांच्या पात्रांचे रुंदीकरण करून गाळ काढण्यासाठी प्रयत्न झालेच नाहीत. त्यामुळे या नद्या आहेत की नाले, हे उमजत नाही. या नद्या पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे असून यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. आजमितीला शासकीय निधीतून सुशोभिकरण सुरू असले तरी, यातून प्राचीन ठेवा संवर्धित व्हावा यासाठी फारसे लक्ष दिले गेले नाही.

चौकट:

सुशोभिकरण करताना भान का राहिले नाही

दोन कोटींच्या सुशोभिकरणाच्या उपलब्ध निधीतून मंदिराच्या पिछाडीवर भक्तनिवास, स्नानगृहे, शौचालय उभारण्यात आली असून त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. भविष्यात यातील पाणी झिरपून मंदिरासमोरील कुंडात येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे शोषखड्डे काढून अथवा स्वतंत्र पाईपलाईन टाकून हे सांडपाणी परिसराबाहेर नेणे गरजेचे आहे.

फोटो : ०८ कात्यायनी मंदिर

श्री कात्यायनी देवीच्या मंदिर परिसरातील जयंती नदीच्या पात्रावरील लोखंडी पुलाची दुरवस्था झाली आहे.