शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
3
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
4
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
5
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
7
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
8
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
9
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
10
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
11
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
12
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
13
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
15
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
17
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
18
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
19
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
20
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?

कात्यायनी मंदिराची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:24 IST

अमर पाटील कळंबा : जगातील नवदुर्गांपैकी मानाची सहावी नवदुर्गा अशी ख्याती असणाऱ्या श्री कात्यायनी देवीच्या मंदिर परिसरातील नैसर्गिक व ...

अमर पाटील

कळंबा : जगातील नवदुर्गांपैकी मानाची सहावी नवदुर्गा अशी ख्याती असणाऱ्या श्री कात्यायनी देवीच्या मंदिर परिसरातील नैसर्गिक व प्राचीन वस्तूंची प्रचंड दुरवस्था झाली आहे. देखभाल, दुरुस्तीसह प्राचीन वास्तूंचे जतन करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत नसल्याने, काळाच्या ओघात हा प्राचीन ठेवा लुप्त होणार की काय, अशी भीती आता भाविकांमधून व्यक्त होत आहे.

जयंती आणि गोमती नद्यांचे उगमस्थान येथे असून प्राचीन हेमाडपंथी विस्तीर्ण मंदिर, बारमाही वाहणारे तीन नैसर्गिक पाण्याचे कुंड, शेकडो वर्षांपूर्वीचे गर्द सावली देणारे महाकाय वृक्ष या साऱ्यांची मोठी दुरवस्था झाली आहे.

बालिंगा गावचे ग्रामदैवत असणारे प्राचीन काळातील अकराव्या शतकात बांधण्यात आलेले हेमाडपंथी स्वरूपातील श्री कात्यायनी देवीचे मंदिर शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर वसले असून मंदिरास स्थानिक नागरिकांसह परराज्यातील भाविक वर्षभर भेट देत असतात.

मात्र, मंदिर परिसरातील परशुराम मंदिराची प्रचंड दुरवस्था झाली असून मंदिराच्या भिंती जीर्ण होऊन सुटू लागल्या आहेत. मंदिर कधी कोसळेल हे सांगता येत नाही. मंदिरातील नैसर्गिक कुंडाची मोठी पडझड झाली आहे. श्री कात्यायनी देवीचे मंदिर ते परशुराम कुंडाकडे जाणाऱ्या जयंती नदीच्या मार्गावर उभारण्यात आलेल्या लहान पुलाची दुरवस्था झाली आहे. श्री कात्यायनी देवीच्या मंदिरापुढील नैसर्गिक कुंडाच्या दगडी पायऱ्या, लोखंडी संरक्षक कठडे यांची पडझड झाल्याने दुरुस्ती गरजेची बनली आहे. मंदिराच्या पिछाडीस उगम पावणाऱ्या जयंती, गोमती नद्यांच्या पात्रांचे रुंदीकरण करून गाळ काढण्यासाठी प्रयत्न झालेच नाहीत. त्यामुळे या नद्या आहेत की नाले, हे उमजत नाही. या नद्या पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे असून यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. आजमितीला शासकीय निधीतून सुशोभिकरण सुरू असले तरी, यातून प्राचीन ठेवा संवर्धित व्हावा यासाठी फारसे लक्ष दिले गेले नाही.

चौकट:

सुशोभिकरण करताना भान का राहिले नाही

दोन कोटींच्या सुशोभिकरणाच्या उपलब्ध निधीतून मंदिराच्या पिछाडीवर भक्तनिवास, स्नानगृहे, शौचालय उभारण्यात आली असून त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. भविष्यात यातील पाणी झिरपून मंदिरासमोरील कुंडात येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे शोषखड्डे काढून अथवा स्वतंत्र पाईपलाईन टाकून हे सांडपाणी परिसराबाहेर नेणे गरजेचे आहे.

फोटो : ०८ कात्यायनी मंदिर

श्री कात्यायनी देवीच्या मंदिर परिसरातील जयंती नदीच्या पात्रावरील लोखंडी पुलाची दुरवस्था झाली आहे.