शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

परराज्यातील मजूर निघाल्याने फौंड्री, बांधकाम क्षेत्रावर चिंतेचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:22 IST

कोल्हापूर : सध्या बंद असलेला रोजगार आणि वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोल्हापुरात असणारे परराज्यातील मजूर आपआपल्या गावी निघाले आहेत. ...

कोल्हापूर : सध्या बंद असलेला रोजगार आणि वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोल्हापुरात असणारे परराज्यातील मजूर आपआपल्या गावी निघाले आहेत. ते गेल्यानंतर परत येण्यास दीड-दोन महिने जातात. त्याचा परिणाम म्हणजे उद्योगचक्राची गती मंदावणार आहे. त्यामुळे या मजुरांच्या जाण्यामुळे जिल्ह्यातील फौंड्री, बांधकाम क्षेत्रावर चिंतेचे सावट पसरले आहे. त्यांना थांबविण्यासाठी राज्य शासनाने गेल्या वर्षीप्रमाणे उद्योग, बांधकाम क्षेत्रातील काम सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी उद्योजक, बांधकाम व्यावसायिकांतून होत आहे.

शिवाजी उद्यमनगर, शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले, आदी औद्योगिक वसाहतींमधील फौंड्री उद्योगातील मोल्डिंग, फेटलिंग अशा कामांमध्ये आणि जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रात बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान राज्यातील मजूर कार्यरत आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे मे महिन्यात हे परराज्यांतील मजूर कोल्हापूरमधून निघून गेले होते. उद्योग, बांधकाम सुरू करण्यास परवानगी मिळाली, तरी त्यांना आपआपल्या गावातून येण्यास दीड ते दोन महिने लागले. त्यामुळे कामे असूनही उद्योग चक्राची गती मंदावली होती. त्यावर काही उद्योजकांनी या मजुरांना विमानाने कोल्हापूरला आणले. काहींनी स्थानिक कामगारांचा आधार घेतला. गेल्या वर्षी बसलेल्या कोरोनाच्या फटक्यातून उद्योग आता पूर्वपदावर आले आहेत. अशा स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भावामुळे पुन्हा संचारबंदी लागू झाल्याने आणि शासनाच्या अटींनुसार उद्योग सुरू ठेवणे शक्य होत नसल्याने बहुतांश फौंड्री, बांधकाम प्रकल्पांचे काम थांबले आहे. त्यामुळे रोजगार नसल्याने आणि पुढे किती दिवस तो बंद राहणार हे समजत नसल्याने परराज्यांतील कामगार आपआपल्या गावी निघाले आहेत.

उद्योजक, बांधकाम व्यावसायिक काय म्हणतात?

परराज्यातील या मजुरांची जेवण, राहण्याची व्यवस्था काही उद्योजकांना करणे शक्य आहे. मात्र, रोजगार सुरू नसेल, तर हे कामगार थांबत नाहीत. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे उद्योग सुरू करण्यास परवानगी द्यावी. अथवा या मुदतीनंतर उद्योग सुरू होतील असे तरी शासनाने जाहीर करावे.

-राजू पाटील, माजी अध्यक्ष, स्मॅॅक.

फौंड्रीमध्ये परराज्यांतील कामगारांचे प्रमाण हे २५ टक्के आहे. कुटुंबासह असलेले काही मजूर थांबले आहेत. हे मजूर त्यांच्या गावी गेल्यास फौंड्रीसह एकूण उद्योगक्षेत्रातील कामावर त्याचा परिणाम होणार आहे. त्याचा शासनाने विचार करावा.

-सुमित चौगुले, अध्यक्ष, आयआयएफ.

जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रात ८० टक्के परराज्यातील कामगार आहेत. ते नोंदणीकृत कामगार नसल्याने त्यांना शासनाची मदतही मिळणार नाही. त्यामुळे रोजगार, मदत मिळत नसल्याने ते आपल्या गावी रवाना होत आहेत. ते परत येण्यास दीड-दोन महिने लागतात. त्याचा बांधकाम क्षेत्रावर परिणाम होणार आहे. शासनाने गेल्यावर्षीप्रमाणे बांधकाम सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी.

-विद्यानंद बेडेकर, अध्यक्ष, क्रिडाई कोल्हापूर.