शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

परराज्यातील मजूर निघाल्याने फौंड्री, बांधकाम क्षेत्रावर चिंतेचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:22 IST

कोल्हापूर : सध्या बंद असलेला रोजगार आणि वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोल्हापुरात असणारे परराज्यातील मजूर आपआपल्या गावी निघाले आहेत. ...

कोल्हापूर : सध्या बंद असलेला रोजगार आणि वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोल्हापुरात असणारे परराज्यातील मजूर आपआपल्या गावी निघाले आहेत. ते गेल्यानंतर परत येण्यास दीड-दोन महिने जातात. त्याचा परिणाम म्हणजे उद्योगचक्राची गती मंदावणार आहे. त्यामुळे या मजुरांच्या जाण्यामुळे जिल्ह्यातील फौंड्री, बांधकाम क्षेत्रावर चिंतेचे सावट पसरले आहे. त्यांना थांबविण्यासाठी राज्य शासनाने गेल्या वर्षीप्रमाणे उद्योग, बांधकाम क्षेत्रातील काम सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी उद्योजक, बांधकाम व्यावसायिकांतून होत आहे.

शिवाजी उद्यमनगर, शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले, आदी औद्योगिक वसाहतींमधील फौंड्री उद्योगातील मोल्डिंग, फेटलिंग अशा कामांमध्ये आणि जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रात बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान राज्यातील मजूर कार्यरत आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे मे महिन्यात हे परराज्यांतील मजूर कोल्हापूरमधून निघून गेले होते. उद्योग, बांधकाम सुरू करण्यास परवानगी मिळाली, तरी त्यांना आपआपल्या गावातून येण्यास दीड ते दोन महिने लागले. त्यामुळे कामे असूनही उद्योग चक्राची गती मंदावली होती. त्यावर काही उद्योजकांनी या मजुरांना विमानाने कोल्हापूरला आणले. काहींनी स्थानिक कामगारांचा आधार घेतला. गेल्या वर्षी बसलेल्या कोरोनाच्या फटक्यातून उद्योग आता पूर्वपदावर आले आहेत. अशा स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भावामुळे पुन्हा संचारबंदी लागू झाल्याने आणि शासनाच्या अटींनुसार उद्योग सुरू ठेवणे शक्य होत नसल्याने बहुतांश फौंड्री, बांधकाम प्रकल्पांचे काम थांबले आहे. त्यामुळे रोजगार नसल्याने आणि पुढे किती दिवस तो बंद राहणार हे समजत नसल्याने परराज्यांतील कामगार आपआपल्या गावी निघाले आहेत.

उद्योजक, बांधकाम व्यावसायिक काय म्हणतात?

परराज्यातील या मजुरांची जेवण, राहण्याची व्यवस्था काही उद्योजकांना करणे शक्य आहे. मात्र, रोजगार सुरू नसेल, तर हे कामगार थांबत नाहीत. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे उद्योग सुरू करण्यास परवानगी द्यावी. अथवा या मुदतीनंतर उद्योग सुरू होतील असे तरी शासनाने जाहीर करावे.

-राजू पाटील, माजी अध्यक्ष, स्मॅॅक.

फौंड्रीमध्ये परराज्यांतील कामगारांचे प्रमाण हे २५ टक्के आहे. कुटुंबासह असलेले काही मजूर थांबले आहेत. हे मजूर त्यांच्या गावी गेल्यास फौंड्रीसह एकूण उद्योगक्षेत्रातील कामावर त्याचा परिणाम होणार आहे. त्याचा शासनाने विचार करावा.

-सुमित चौगुले, अध्यक्ष, आयआयएफ.

जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रात ८० टक्के परराज्यातील कामगार आहेत. ते नोंदणीकृत कामगार नसल्याने त्यांना शासनाची मदतही मिळणार नाही. त्यामुळे रोजगार, मदत मिळत नसल्याने ते आपल्या गावी रवाना होत आहेत. ते परत येण्यास दीड-दोन महिने लागतात. त्याचा बांधकाम क्षेत्रावर परिणाम होणार आहे. शासनाने गेल्यावर्षीप्रमाणे बांधकाम सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी.

-विद्यानंद बेडेकर, अध्यक्ष, क्रिडाई कोल्हापूर.