शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

साहित्य संमेलनातून वैचारिक संवाद

By admin | Updated: December 31, 2014 00:10 IST

रमेश इंगवले : शिरढोण येथे ‘संवाद’ साहित्य संमेलन उत्साहात; ग्रंथदिंडीने सुरुवात

कुरुंदवाड : जगामध्ये वैज्ञानिक प्रगती झाली, मात्र एकमेकांतील संवाद संपुष्टात आला. कॉम्प्युटरवर बसून मुलांना जगाची ओळख झाली. मात्र बालपणातील खेळणे, हसणे, बागडणेच हरवून बसत आहेत. मुलांच्या मनावर चांगले संस्कार घडविण्यासाठी गावागावांमध्ये, असे साहित्य संमेलन भरवून वैचारिक संवाद घडविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रमेश इंगवले यांनी केले. शिरढोण (ता. शिरोळ) येथे शिरढोण साहित्य परिषद व कविता सागर साहित्य अकादमी जयसिंगपूर यांच्यावतीने आयोजित ‘संवाद’ साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून इंगवले बोलत होते.शिरढोण गावामध्ये प्रथमच भरविलेल्या या साहित्य संमेलनास ग्रामस्थ व साहित्यिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी जि. प. सदस्य विकास कांबळे यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे पूजन व ग्राम प्रदक्षिणा करण्यात आली. चैतन्य शिक्षण समूहाचे संस्थापक दशरथ काळे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी डी. डी. कुडाळकर, राजश्री पाटील यांची भाषणे झाली.दुपारी राष्ट्र सेवा दलाचे महामंत्री बाबासो नदाफ यांचे व्याख्यान झाले. यावेळी सुनील आसवले यांचे कथाकथन झाले. सायंकाळच्या सत्रात निमंत्रितांसह ग्रामीण भागातील नवकवींचे कवी संमेलन झाले. यावेळी शशिकांत मुद्दापुरे, डी. डी. कुडाळकर, कृष्णात बसागरे, पाटलोबा पाटील, मनोहर भोसले, डॉ. उमेश कळेकर, संजय सुतार, विष्णू वासुदेव, आदींनी कवितेतून रसिकांची मने जिंकली. संयोजन समिती अध्यक्ष विश्वास बालिघाटे यांनी स्वागत केले.