शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

संगणक सेवक मानधनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: March 17, 2016 23:44 IST

संग्राम योजना बंद : बेकारीची कुऱ्हाड, ग्रामपंचायतींमधील संगणक सेवा कोलमडली

राहुल मांगुरकर --अर्जुनवाड --कॉँग्रेस सरकारच्या काळात सुरू झालेली संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) ही योजना ३१ डिसेंबरपासून भाजप सरकारने बंद केली आहे. राज्यात २७ हजार संगणक सेवक म्हणून संग्राम योजनेअंतर्गत कार्य करीत होते. त्यांच्यावर जानेवारी २०१६ पासून बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. तसेच आॅक्टोंबर ते डिसेंबर २०१५ या कालावधीतील मानधन न मिळाल्याने आर्थिक आरिष्टात संगणक सेवक सापडला आहे.कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात सन २०११ साली शासनाने राज्यातील ग्रामपंचायती बळकटीकरण करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीस संगणक, स्कॅनर, प्रिंटर, इंटरनेट सुविधा दिल्या होत्या. तसेच संगणक परिचालक नेमून ई-गव्हर्नस बरोबर रोजगाराला चालना दिली होती. यामुळे ग्रामपंचायतीला चांगल्या प्रकारे बळकटीकरण येऊन प्रत्येक गावाची माहिती वेबसाईटद्वारे अद्ययावत करण्याबरोबर सर्वत्र एकसारखे संगणकीयकृत दाखले, जमा खर्च, योजना, आदी कामकाज संगणकाद्वारे चालत होते. जन्म, मृत्यू, घरांची मालमत्ता नोंदणी, आदी कामकाज चालत होते. या योजनेसाठी १३ वा वित्त निधी उपयोगी ठरला होता.मात्र, १३ वा वित्त आयोगाचा हा निधी काही दिवसांपूर्वी संपला, तर काही ग्रामपंचायतीकडे निधी शिल्लक असल्याने त्यांना वारंवार मुदत वाढ देण्यात आली होती. त्यानंतर १४ व्या वित्त आयोगाची स्थापना केली. मात्र, यामध्ये संग्राम योजनेकडे राज्य शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. भाजप सरकारने १४ व्या आयोगाची रक्कम थेट ग्रामपंचायतीला देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये संग्राम योजनेला थारा दिला नसल्याने घरघर लागली आहे. राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमधील संगणक संच धुळखात पडून असून, इंटरनेट बिलही विनाकारण भरावे लागत आहे. संगणक परिचालकावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. आॅक्टोबर ते डिसेंबरचे मानधन थकीतया योजनेत काम केलेल्या संगणक परिचालकांचे माहे आॅक्टोबर १५ ते डिसेंबर १५ चे मानधन आजही थकीत आहे. यासाठी संघटना व परिचालकांनी शासनाकडे मागणी करूनही या योजनेकडे दुर्लक्ष करण्याबरोबरच त्यांच्या थकित मानधनाकडे पाठ फिरविली. तसेच संगणक परिचालकांनी महाआॅनलाईन कंपनीशी संपर्क साधण्याची सूचना कार्यासन अधिकारी अर्चना वालझाडे यांनी दिली. संगणक सेवक आर्थिक आरिष्टातमहाआॅनलाईन कंपनी, टाटा कन्सल्टन्सी व शासनाच्या या गोंधळात संगणक सेवक आर्थिक आरिष्टात सापडला आहे. हाताला काम नाही, मागचे थकीत मानधन मिळत नाही. येथून पुढे काय करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर ‘आ’ वासून उभा आहे.