शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

संगणक सेवक मानधनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: March 17, 2016 23:44 IST

संग्राम योजना बंद : बेकारीची कुऱ्हाड, ग्रामपंचायतींमधील संगणक सेवा कोलमडली

राहुल मांगुरकर --अर्जुनवाड --कॉँग्रेस सरकारच्या काळात सुरू झालेली संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) ही योजना ३१ डिसेंबरपासून भाजप सरकारने बंद केली आहे. राज्यात २७ हजार संगणक सेवक म्हणून संग्राम योजनेअंतर्गत कार्य करीत होते. त्यांच्यावर जानेवारी २०१६ पासून बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. तसेच आॅक्टोंबर ते डिसेंबर २०१५ या कालावधीतील मानधन न मिळाल्याने आर्थिक आरिष्टात संगणक सेवक सापडला आहे.कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात सन २०११ साली शासनाने राज्यातील ग्रामपंचायती बळकटीकरण करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीस संगणक, स्कॅनर, प्रिंटर, इंटरनेट सुविधा दिल्या होत्या. तसेच संगणक परिचालक नेमून ई-गव्हर्नस बरोबर रोजगाराला चालना दिली होती. यामुळे ग्रामपंचायतीला चांगल्या प्रकारे बळकटीकरण येऊन प्रत्येक गावाची माहिती वेबसाईटद्वारे अद्ययावत करण्याबरोबर सर्वत्र एकसारखे संगणकीयकृत दाखले, जमा खर्च, योजना, आदी कामकाज संगणकाद्वारे चालत होते. जन्म, मृत्यू, घरांची मालमत्ता नोंदणी, आदी कामकाज चालत होते. या योजनेसाठी १३ वा वित्त निधी उपयोगी ठरला होता.मात्र, १३ वा वित्त आयोगाचा हा निधी काही दिवसांपूर्वी संपला, तर काही ग्रामपंचायतीकडे निधी शिल्लक असल्याने त्यांना वारंवार मुदत वाढ देण्यात आली होती. त्यानंतर १४ व्या वित्त आयोगाची स्थापना केली. मात्र, यामध्ये संग्राम योजनेकडे राज्य शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. भाजप सरकारने १४ व्या आयोगाची रक्कम थेट ग्रामपंचायतीला देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये संग्राम योजनेला थारा दिला नसल्याने घरघर लागली आहे. राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमधील संगणक संच धुळखात पडून असून, इंटरनेट बिलही विनाकारण भरावे लागत आहे. संगणक परिचालकावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. आॅक्टोबर ते डिसेंबरचे मानधन थकीतया योजनेत काम केलेल्या संगणक परिचालकांचे माहे आॅक्टोबर १५ ते डिसेंबर १५ चे मानधन आजही थकीत आहे. यासाठी संघटना व परिचालकांनी शासनाकडे मागणी करूनही या योजनेकडे दुर्लक्ष करण्याबरोबरच त्यांच्या थकित मानधनाकडे पाठ फिरविली. तसेच संगणक परिचालकांनी महाआॅनलाईन कंपनीशी संपर्क साधण्याची सूचना कार्यासन अधिकारी अर्चना वालझाडे यांनी दिली. संगणक सेवक आर्थिक आरिष्टातमहाआॅनलाईन कंपनी, टाटा कन्सल्टन्सी व शासनाच्या या गोंधळात संगणक सेवक आर्थिक आरिष्टात सापडला आहे. हाताला काम नाही, मागचे थकीत मानधन मिळत नाही. येथून पुढे काय करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर ‘आ’ वासून उभा आहे.