शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

उपसा बंदीमुळे मोटारपंपांना सक्तीची विश्रांती

By admin | Updated: January 13, 2016 01:13 IST

पाणी जपून वापरावे लागणार : वीस वर्षांनंतर प्रथमच भोगावती नदीतून पाणी उपसा बंदी, नदीपात्र अनेक ठिकाणी कोरडे

संजय पारकर - राधानगरीशेतीसाठी पाहिजे तेव्हा व मुबलक पाणी मिळत असल्यामुळे निर्धास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना २० वर्षांनंतर प्रथमच भोगावती नदीतून पाणी उपसाबंदीला सामोरे जावे लागत आहे. पाटबंधारे विभागाने पाणी उपसा व बंदी कालावधीचे वेळापत्रक जाहीर करून त्याची अंमलबजावणी सरू केली आहे. त्यामुळे नदीवरील मोटारपंपाना सक्तीची विश्रांती मिळाली आहे. नदीत पाणी सोडण्याचे प्रमाणही कमी केल्याने काही ठिकाणी नदी कोरडी पडली आहे.निसर्गाची कृपा, शाहू महाराजांनी बांधलेले धरण यामुळे राधानगरी ते कोल्हापूरपर्यंत भोगावती नदीकाठ समृद्ध झाला. पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले, साखर कारखान्यांसह उद्योगधंदे झाले. १९५४ पासून राधानगरी धरणातून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर जसजसा पाण्यचा वापर वाढला तसा दरवर्षी एप्रिल-मेमध्ये पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला. १९८० च्या दशकात त्याची तीव्रता वाढली. याकाळात या नदीवर पाणी उपसण्याचे वेळापत्रक होते. त्या काळात डिझेलची इंजिन होती. पाटबंधारे विभाग त्यावर सील करीत असे. या काळात धरणातील उपलब्ध पाणी व इचलकरंजीपर्यंतची मागणी याचा मेळ घालताना यंत्रणेची मोठी धावपळ होत होती. धरणातून पाणी सोडणे बंद असलेल्या काळात नदी पूर्णपणे कोरडी पडलेली असायची तेव्हा नदीत खड्डे काढून पिण्यासाठी व जनावरांच्या पाण्याची सोय करावी लागत होती. मार्च १९९७ मध्ये काळम्मावाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून गैबी बोगद्याद्वारे भोगावती नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे भोगावती नदीकाठावर पाणी पुरविण्याचा राधानगरी धरणावरील ताण पूर्णपणे कमी झाला. तेव्हापासून ही नदी अपवाद वगळता बाराही महिने दुथडी भरून वाहत होती. परिणामी, येथे पाणी उपस्यावर कसलेही निर्बंध नव्हते. बेसुमार पाणी उपसण्याची सवय लागल्यामुळे आताची पाणी उपसा बंदी लोकांच्या पचनी पडणे अवघड जात आहे.मात्र, निसर्गाचे बदलेले स्वरूप पहाता यापुढील काळात पावसाचे प्रमाण कमी होण्याचा धोका असल्याने पाणी वापराबाबत लोकांनी जागरूक होणे काळाची गरज बनली आहे. पाणीटंचाईमुळे कारखान्यांनी उसाची उचल त्वरित करावीसावरवाडी : दुष्काळामुळे ऊस पिकाच्या उत्पादनात घट जाणवू लागली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नदीपात्रातील पाणी उपसाबंदी जाहीर झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस पिकाचे नुकसान होणार आहे. साखर कारखान्यांनी चालू ऊस गळीत हंगामातील उसाची लवकर उचल करावी, अशी मागणी ‘गोकुळ’चे संचालक सत्यजित पाटील (कसबा बीड) यांनी केली आहे.यंदा उसाच्या उत्पादनाबरोबर उन्हाळी हंगामातील पिकांना पाणी वेळेवर मिळणार नाही. त्यामुळे ऊस पिकांचे नुकसान होणार आहे. जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांनी ऊस गाळप क्षमता वाढविली असून, लाभ क्षेत्रातील उसाची उचल त्वरित करणे गरजेचे आहे. उसाच्या वजनातील घट टाळण्यासाठी उसाची उचल त्वरित करण्याची मागणी करून पाटील यांनी म्हटले आहे की, ऊस पिकांना पाणी वेळेत मिळणार नाही. त्यामुळे ऊस लागणी क्षेत्रातील पिकांच्या उत्पादनात घट जाणवत आहे.साखर कारखान्यांचा सध्याचा गाळप हंगाम उसाच्या तोडण्या मंद गतीने सुरू असल्यामुळे लांबण्याची शक्यता आहे. एकीकडे उसाची उचल वेळेत होणार नाही, तर दुसरीकडे पिकांना पाणी मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसणार आहे. (वार्ताहर)