शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण

By admin | Updated: June 18, 2015 00:40 IST

वैभववाडी-कोल्हापूर मार्ग : अहवाल दोन दिवसात कोकण रेल्वे महामंडळाला सादर होणार

वैभववाडी : वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम अवघ्या सव्वा महिन्यात पूर्ण झाले असून मुंबईतील जे. पी. इंजिनिअरिंग कंपनी येत्या दोन दिवसात सर्वेक्षण अहवाल कोकण रेल्वे महामंडळाला सादर करणार आहे. सुमारे १०० किलोमीटरच्या नियोजित रेल्वेमार्गात ५ बोगदे, चार स्थानके आणि तीन ते चार मोठे पूल उभारले जाण्याची शक्यता आहे. तालुक्यातील ७ गावातून रेल्वेमार्गाचा सर्व्हे गेला असून या मार्गात एखादे स्थानक तालुक्यात होण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे.वैभववाडी कोल्हापूर रेल्वेमार्गाच्या कित्येक वर्षांच्या मागणीला सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाल्यानंतर गती मिळाली असून त्यांच्या सूचनेनुसार कोकण रेल्वे महामंडळाने या मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम मुंबईतील जे. पी. इंजिनिअरिंग कंपनीला दिले. या कंपनीने ४ मे रोजी वैभववाडी स्थानकातून रेल्वेमार्गाच्या सर्व्हेला प्रारंभ केला होता. डोंगरदऱ्यांच्या जंगलभागातून कंपनीच्या १० ते १५ कर्मचाऱ्यांनी गुगल मॅपच्या आधारे अत्याधुनिक यंत्राद्वारे खडतर परिश्रम घेऊन सुमारे ४२ दिवसांत हा सर्व्हे पूर्ण केला आहे. आता शासन स्तरावर त्याला मंजुरीची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)...असा आहे सर्व्हेजे. पी. इंजिनिअरिंग कंपनीने केलेल्या वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या सर्व्हेची प्राथमिक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यानुसार १०० किलोमीटर अंतराचा हा मार्ग असणार आहे. वैभववाडी रोड (नापणे) रेल्वे स्थानकातून सुरु झालेला रेल्वे मार्गाचा सर्व्हे सोनाळी, कुसूर, उंबर्डे, मांगवली, उपळे, मौदे, सैतवडे, भूतलवाडी, खोकुर्ले, कळे कोपार्डे, भुये, कसबा बावडा रेल्वेगुड्स मार्केट यार्ड असा करण्यात आला आहे.बोगदे, पूल आणि स्थानकहीडोंगरदऱ्यांतील जंगलमय प्रदेशातून पूर्ण झालेल्या सर्व्हेनुसार १०० किलोमीटरच्या रेल्वे मार्गात पाच बोगदे, चार मोठे पूल आणि किमान चार स्थानके उभारावी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यातील एखादे स्थानक वैभववाडी तालुक्यात असेल असेही संकेत मिळाले आहेत. हा सर्व्हे तालुक्यातील ७ गावातून गेला आहे. रेल्वेमंत्रालयाने तो स्वीकारल्यास तालुक्याचे भाग्य फळफळणार आहे.बंदरेही जोडली जाण्याची शक्यताजे. पी. इंजिनिअरिंग कंपनी सर्वेक्षणाचा अहवाल येत्या दोन दिवसात कोकण रेल्वे महामंडळाला सादर करणार असून रेल्वे मंत्रालय त्यावर अंतिम निर्णय घेणार आहे. या सर्व्हेनुसार कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडण्यासाठी हाच सर्वोत्तम रेल्वेमार्ग ठरणार आहे.भविष्यात रेल्वेने बंदरे जोडली जावून कोकणचा हापूस, मत्स्य व्यवसायाला सुवर्णकाळ येण्यास मदत होणार आहे.