शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण

By admin | Updated: June 18, 2015 00:40 IST

वैभववाडी-कोल्हापूर मार्ग : अहवाल दोन दिवसात कोकण रेल्वे महामंडळाला सादर होणार

वैभववाडी : वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम अवघ्या सव्वा महिन्यात पूर्ण झाले असून मुंबईतील जे. पी. इंजिनिअरिंग कंपनी येत्या दोन दिवसात सर्वेक्षण अहवाल कोकण रेल्वे महामंडळाला सादर करणार आहे. सुमारे १०० किलोमीटरच्या नियोजित रेल्वेमार्गात ५ बोगदे, चार स्थानके आणि तीन ते चार मोठे पूल उभारले जाण्याची शक्यता आहे. तालुक्यातील ७ गावातून रेल्वेमार्गाचा सर्व्हे गेला असून या मार्गात एखादे स्थानक तालुक्यात होण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे.वैभववाडी कोल्हापूर रेल्वेमार्गाच्या कित्येक वर्षांच्या मागणीला सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाल्यानंतर गती मिळाली असून त्यांच्या सूचनेनुसार कोकण रेल्वे महामंडळाने या मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम मुंबईतील जे. पी. इंजिनिअरिंग कंपनीला दिले. या कंपनीने ४ मे रोजी वैभववाडी स्थानकातून रेल्वेमार्गाच्या सर्व्हेला प्रारंभ केला होता. डोंगरदऱ्यांच्या जंगलभागातून कंपनीच्या १० ते १५ कर्मचाऱ्यांनी गुगल मॅपच्या आधारे अत्याधुनिक यंत्राद्वारे खडतर परिश्रम घेऊन सुमारे ४२ दिवसांत हा सर्व्हे पूर्ण केला आहे. आता शासन स्तरावर त्याला मंजुरीची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)...असा आहे सर्व्हेजे. पी. इंजिनिअरिंग कंपनीने केलेल्या वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या सर्व्हेची प्राथमिक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यानुसार १०० किलोमीटर अंतराचा हा मार्ग असणार आहे. वैभववाडी रोड (नापणे) रेल्वे स्थानकातून सुरु झालेला रेल्वे मार्गाचा सर्व्हे सोनाळी, कुसूर, उंबर्डे, मांगवली, उपळे, मौदे, सैतवडे, भूतलवाडी, खोकुर्ले, कळे कोपार्डे, भुये, कसबा बावडा रेल्वेगुड्स मार्केट यार्ड असा करण्यात आला आहे.बोगदे, पूल आणि स्थानकहीडोंगरदऱ्यांतील जंगलमय प्रदेशातून पूर्ण झालेल्या सर्व्हेनुसार १०० किलोमीटरच्या रेल्वे मार्गात पाच बोगदे, चार मोठे पूल आणि किमान चार स्थानके उभारावी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यातील एखादे स्थानक वैभववाडी तालुक्यात असेल असेही संकेत मिळाले आहेत. हा सर्व्हे तालुक्यातील ७ गावातून गेला आहे. रेल्वेमंत्रालयाने तो स्वीकारल्यास तालुक्याचे भाग्य फळफळणार आहे.बंदरेही जोडली जाण्याची शक्यताजे. पी. इंजिनिअरिंग कंपनी सर्वेक्षणाचा अहवाल येत्या दोन दिवसात कोकण रेल्वे महामंडळाला सादर करणार असून रेल्वे मंत्रालय त्यावर अंतिम निर्णय घेणार आहे. या सर्व्हेनुसार कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडण्यासाठी हाच सर्वोत्तम रेल्वेमार्ग ठरणार आहे.भविष्यात रेल्वेने बंदरे जोडली जावून कोकणचा हापूस, मत्स्य व्यवसायाला सुवर्णकाळ येण्यास मदत होणार आहे.