शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

तीन हजार संस्थांचे लेखापरीक्षण पूर्ण

By admin | Updated: August 10, 2016 01:10 IST

उर्वरित संस्थांचे लेखापरीक्षण महिन्याअखेर करण्याचे लेखापरीक्षकांना आदेश

कोल्हापूर : जिल्ह्यातील ६११० पैकी तीन हजार सहकारी संस्थांचे (दुग्ध सोडून) २०१५-१६ या आर्थिक वर्षातील लेखापरीक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित संस्थांचे महिन्या अखेर लेखापरीक्षण पूर्ण करण्याचे आदेश लेखापरीक्षकांना देण्यात आले आहेत. अद्याप लेखापरीक्षण न झालेल्या संस्थांमध्ये औद्योगिक संस्थांचा भरणा अधिक आहे. सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण आॅक्टोबरअखेर करणे बंधनकारक केले असून, त्याचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी जिल्ह्णातील लेखापरीक्षकांची बैठक आयोजित केली होती. विभागीय सहनिबंधक धनंजय डोईफोडे, विभागीय सहनिबंधक (लेखापरीक्षण) तुषार काकडे, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब यादव यांच्यासह तालुका लेखापरीक्षक, उपनिबंधक उपस्थित होते. यामध्ये ४२५ हून अधिक लेखापरीक्षक व लेखापरीक्षण संस्था सहभागी झाल्या होत्या. जुलैअखेर तीन हजारांहून अधिक संस्थांचे लेखापरीक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित संस्थांचे आॅगस्टअखेर पूर्ण करण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले. २०१४-१५ या आर्थिक वर्षात ४४०० संस्थांना दोषदुरुस्ती अहवाल पाठविण्यास सांगितले होते. त्यापैकी २६०० संस्थांचे अहवाल प्राप्त झाले असून, उर्वरित संस्थांचे दोषदुरुस्ती अहवाल तत्काळ पाठविण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. लेखापरीक्षण व दोषदुरुस्ती अहवालाचा आढावा १३ सप्टेंबरला घेण्यात येणार असून, यामध्ये हयगय करणाऱ्या लेखापरीक्षकांवर कडक कारवाई केली जाईल, असे बाळासाहेब यादव यांनी सांगितले. ‘महासहकार’च्या आॅनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून नवीन नोंदणी, लेखापरीक्षण अहवाल, दोषदुरुस्ती अहवाल, संस्थांनी केलेले ठराव पाठविण्याचे आदेशही यादव यांनी दिले. लेखापरीक्षकांचेही आॅनलाईन वाटपसंस्थांना लेखापरीक्षक निवडण्याची मुभा असली तरी त्यांच्यासह सर्वच संस्थांचे लेखापरीक्षकांचे वाटप आॅनलाईन करणार आहे. त्यामुळे ज्या लेखापरीक्षकांना संस्था मिळालेल्या नाहीत, त्यांनाही संधी मिळणार असल्याचे यादव यांनी सांगितले. राज्यात टॉपच राहूलेखापरीक्षणात कोल्हापूर जिल्हा नेहमीच आघाडीवर राहिला आहे. आतापर्यंत निम्म्या संस्थांचे लेखापरीक्षण झाले असून उर्वरित महिनाअखेर पूर्ण कोल्हापूर टॉपलाच राहील, असा विश्वास बाळासाहेब यादव यांनी व्यक्त केला.