शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

जिल्ह्यातील ‘जलयुक्त’ची १७४ कामे पूर्ण

By admin | Updated: March 20, 2017 00:54 IST

२१ पैकी सहा कोटी खर्च : वनतळे, मातीनाला, शेततळ्यांचे काम प्रगतिपथावर

राजाराम लोंढे -- कोल्हापूर --राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ४७८ कामांपैकी १७४ कामे पूर्ण झाली आहेत. या वर्षी या कामांसाठी २१ कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्यापैकी आतापर्यंत सहा कोटी पाच लाख रुपये खर्च झाले असून, उर्वरित कामे येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्यासाठी कृषी विभागाने हालचाली गतिमान केल्या आहेत. ‘जलयुक्त शिवार’च्या माध्यमातून गेली अनेक वर्षे राज्यात काम सुरू असले तरी गेल्या वर्षी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात हे काम प्रभावीपणे राबविण्यात आले. सांगली, सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांत हे काम मोठ्या प्रमाणात झाले. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या वर्षी ‘जलयुक्त’ची कामे प्रभावीपणे राबविण्यात आली. ‘पाणीदार’ जिल्हा असल्याने कोल्हापुरातील गावांना ‘जलयुक्त’चे निकष अडचणीचे ठरत आहेत. तरीही गेल्या वर्षी या कार्यक्रमात ६९ गावांचा समावेश झाला होता. या गावांसाठी ३० कोटींचा आराखडा तयार करण्यात येऊन त्याच्या माध्यमातून वनतळी, मजगी, मातीनाला बंधारे, सिमेंट बंधारे, शेततळी, आदींची कामे पूर्ण करण्यात आली. त्याचा परिणामही यावर्षी दिसून येत आहे. दुष्काळानंतर जोरदार पाऊस झाल्याने ‘जलयुक्त’ची कामे शंभर टक्के यशस्वी झाली. पावसाचे पाणी या कामातून मुरविण्यात कृषी विभागाला यश आले. जिल्ह्याची पाणीपातळी दोन ते अडीच फुटांनी वाढण्यात ‘जलयुक्त’चे मोठे योगदान आहे. या वर्षासाठी निकषांत गावे कमी बसली. २० गावांसाठी २१ कोटी मंजूर झाले आहेत. आतापर्यंत ४७८ पैकी १७४ कामे पूर्ण झाली आहेत. यासाठी सहा कोटी पाच लाख रुपये निधी खर्ची पडला आहे. आगामी दोन महिन्यांत उर्वरित कामे पूर्ण करण्याचे कृषी विभागाने नियोजन केले आहे. ‘जलयुक्त’च्या कामांना गती आली असून, लवकरात लवकर कामे पूर्ण करण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. - बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारीहे आहेत निकषमागील दोन-तीन वर्षे पाणीटंचाई व टॅँकरने पाणीपुरवठा.‘एकात्मिक पाणलोट’मध्ये धरलेली गावे५० टक्के पाणलोटचे कामे पूर्णलोकसहभागातून काम करण्यास उत्सुक गावे.