शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

तक्रारी, तरीही अंगणवाडी ताईंना मोबाईलच कामाचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:18 IST

नसिम सनदी-लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि हाताळणीसंदर्भात काही तांत्रिक अडचणी असल्या, तरी कोल्हापुरातील अंगणवाडी ताईंना ...

नसिम सनदी-लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि हाताळणीसंदर्भात काही तांत्रिक अडचणी असल्या, तरी कोल्हापुरातील अंगणवाडी ताईंना मोबाईलच सर्वाधिक कामाचा ठरत असल्याचे दिसत आहे. कामेही झटपट होत असल्याने मोबाईल हा अंगणवाड्यांसाठी आता अविभाज्य घटक बनला आहे.

अंगणवाड्यांच्या कामात गती आणि पारदर्शकता यावी, या हेतूने दोन वर्षांपूर्वी राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडी सेविकांना मोफत मोबाईल दिले. दरवर्षाला १६०० रुपयांची रक्कम इंटरनेटसाठी डाटा पॅक मारण्यासाठीही आगाऊ खात्यावर जमा करण्याची तरतूद केली.

अंगणवाडी सेविकांना रोजच्या रोज २५ प्रकारची रजिस्टर भरावी लागतात. ती हातानेच भरली जात होती. आता हे सर्व काम मोबाईलवर होत आहे. रजिस्टरवर नाेंदीसाठी जितका वेळ लागत होता, त्यापेक्षा कमी वेळ मोबाईलवर माहिती भरताना लागतो. शिवाय जेव्हा गरज वाटेल तेव्हा एका क्लिकवर ही माहिती उपलब्ध होत असल्याने अंगणवाडी ताईंचे काम सोपे झाले आहे.

लॉकडाऊन काळात तर मोबाईलच्या या उपक्रमाची खूपच मदत झाली. एकट्या कोल्हापूर जिल्हा परिषदेने आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ३ हजार ९९४ अंगणवाड्या व्हॉटस‌्-ॲप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र जोडल्या. त्यातही अंगणवाडी सेविका, स्तनदा माता, गरोदर माता, बालकांचे पालक असे वेगवेगळे दहा हजार ग्रुप तयार केले. या माध्यमातून आकार अभ्यासक्रमासह प्रबोधनही केले. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे गेली दहा महिने अंगणवाड्या बंद असल्या, तरी शिक्षण सुरूच राहिले आहे.

१) पॉईंटर्स

जिल्ह्यातील अंगणवाडी - ३९९४

अंगणवाडी सेविका - ३९९४

मोबाईल वाटप - ३९९४

२) मोबाईलवरून ही कामे करावी लागतात

अंगणवाडीत येणाऱ्या बालकांची हजेरी, वजन, उंची, पोषण, आहार यांच्या नोंदी ठेवणे, गरोदर, स्तनदा महिलांना आहार व औषधासह आरोग्याचे मार्गदर्शन, गृहभेटीद्वारे व्हिडीओ दाखवून प्रबोधन करणे.

३) अडचणी काय?

बालकांना शिकविण्यापासून ते त्यांना आहार देणे, किशोरी, गराेदर, स्तनदा माता यांच्या सर्व नोंदी मोबाईलवरच कराव्या लागत असल्याने बऱ्याचवेळेला मोबाईल हॅंग होण्याचे, बंद होण्याचेही प्रकार घडतात. कधी नेटवर्कचा हा प्रश्न येतो. सर्वात महत्त्वाची अडचण आहे, ती ज्येष्ठ सेविकांची. त्यांना मोबाईल हाताळणे अवघड जात असल्याने त्यांना इतरांच्या मदतीवर विसंबून रहावे लागते. याचा परिणाम दैनंदिन कामावर होतो, असे निरीक्षण सेविका असलेल्या आशा पाटील यांनी नाेंदवले.

४) महिला व बालकल्याण विभाग अधिकारी कोट

मोबाईलद्वारे अंगणवाडीचे सर्व कामकाज चालविण्याचा सर्वात चांगला प्रतिसाद कोल्हापुरातून मिळत आहे. मोबाईल बंद पडला, हरवला, तर पर्यायी मोबाईलची उपलब्धता करून देण्यासाठी स्वतंत्र कक्षही स्थापन केला आहे. या व्यवस्थेमुळे कामे जलद होत आहेत.

सोमनाथ रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद