शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

तक्रारी, तरीही अंगणवाडी ताईंना मोबाईलच कामाचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:18 IST

नसिम सनदी-लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि हाताळणीसंदर्भात काही तांत्रिक अडचणी असल्या, तरी कोल्हापुरातील अंगणवाडी ताईंना ...

नसिम सनदी-लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि हाताळणीसंदर्भात काही तांत्रिक अडचणी असल्या, तरी कोल्हापुरातील अंगणवाडी ताईंना मोबाईलच सर्वाधिक कामाचा ठरत असल्याचे दिसत आहे. कामेही झटपट होत असल्याने मोबाईल हा अंगणवाड्यांसाठी आता अविभाज्य घटक बनला आहे.

अंगणवाड्यांच्या कामात गती आणि पारदर्शकता यावी, या हेतूने दोन वर्षांपूर्वी राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडी सेविकांना मोफत मोबाईल दिले. दरवर्षाला १६०० रुपयांची रक्कम इंटरनेटसाठी डाटा पॅक मारण्यासाठीही आगाऊ खात्यावर जमा करण्याची तरतूद केली.

अंगणवाडी सेविकांना रोजच्या रोज २५ प्रकारची रजिस्टर भरावी लागतात. ती हातानेच भरली जात होती. आता हे सर्व काम मोबाईलवर होत आहे. रजिस्टरवर नाेंदीसाठी जितका वेळ लागत होता, त्यापेक्षा कमी वेळ मोबाईलवर माहिती भरताना लागतो. शिवाय जेव्हा गरज वाटेल तेव्हा एका क्लिकवर ही माहिती उपलब्ध होत असल्याने अंगणवाडी ताईंचे काम सोपे झाले आहे.

लॉकडाऊन काळात तर मोबाईलच्या या उपक्रमाची खूपच मदत झाली. एकट्या कोल्हापूर जिल्हा परिषदेने आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ३ हजार ९९४ अंगणवाड्या व्हॉटस‌्-ॲप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र जोडल्या. त्यातही अंगणवाडी सेविका, स्तनदा माता, गरोदर माता, बालकांचे पालक असे वेगवेगळे दहा हजार ग्रुप तयार केले. या माध्यमातून आकार अभ्यासक्रमासह प्रबोधनही केले. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे गेली दहा महिने अंगणवाड्या बंद असल्या, तरी शिक्षण सुरूच राहिले आहे.

१) पॉईंटर्स

जिल्ह्यातील अंगणवाडी - ३९९४

अंगणवाडी सेविका - ३९९४

मोबाईल वाटप - ३९९४

२) मोबाईलवरून ही कामे करावी लागतात

अंगणवाडीत येणाऱ्या बालकांची हजेरी, वजन, उंची, पोषण, आहार यांच्या नोंदी ठेवणे, गरोदर, स्तनदा महिलांना आहार व औषधासह आरोग्याचे मार्गदर्शन, गृहभेटीद्वारे व्हिडीओ दाखवून प्रबोधन करणे.

३) अडचणी काय?

बालकांना शिकविण्यापासून ते त्यांना आहार देणे, किशोरी, गराेदर, स्तनदा माता यांच्या सर्व नोंदी मोबाईलवरच कराव्या लागत असल्याने बऱ्याचवेळेला मोबाईल हॅंग होण्याचे, बंद होण्याचेही प्रकार घडतात. कधी नेटवर्कचा हा प्रश्न येतो. सर्वात महत्त्वाची अडचण आहे, ती ज्येष्ठ सेविकांची. त्यांना मोबाईल हाताळणे अवघड जात असल्याने त्यांना इतरांच्या मदतीवर विसंबून रहावे लागते. याचा परिणाम दैनंदिन कामावर होतो, असे निरीक्षण सेविका असलेल्या आशा पाटील यांनी नाेंदवले.

४) महिला व बालकल्याण विभाग अधिकारी कोट

मोबाईलद्वारे अंगणवाडीचे सर्व कामकाज चालविण्याचा सर्वात चांगला प्रतिसाद कोल्हापुरातून मिळत आहे. मोबाईल बंद पडला, हरवला, तर पर्यायी मोबाईलची उपलब्धता करून देण्यासाठी स्वतंत्र कक्षही स्थापन केला आहे. या व्यवस्थेमुळे कामे जलद होत आहेत.

सोमनाथ रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद