शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

पोलिसांनी मारहाण केल्याची तावडेची न्यायालयात तक्रार

By admin | Updated: September 4, 2016 01:20 IST

पानसरे हत्या प्रकरण : पुन्हा वैद्यकीय तपासणी; पाच दिवसांची पोलिस कोठडी

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेतलेला हिंदू जनजागरण समितीचा डॉ. वीरेंद्र तावडे याला शनिवारी सत्र न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. पाटील यांनी गुरुवार (दि. ८) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तावडे याने पोलिसांनी आपणाला बुटांच्या लाथांनी छातीवर, पोटावर, गालावर, डोक्यात व डाव्या पायावर मारहाण केल्याने छातीत दुखत आहे. रात्रभर उलट्यांचा त्रास होत असल्याची तक्रार केली. त्यावर न्यायाधीश पाटील यांनी आरोपी तावडे याची तत्काळ सीपीआर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून जिल्हा शल्यचिकित्सकांचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी दुसऱ्यांदा तावडेची ‘सीपीआर’मध्ये तपासणी करून अहवाल सादर केला. त्यानंतर न्यायाधीशांनी पोलिस कोठडीचे आदेश दिले. डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी ‘सीबीआय’ने अटक केलेल्या डॉ. तावडे याचे ‘कोल्हापूर कनेक्शन’ तपासात पुढे आले आहे. पानसरे हत्येप्रकरणी ‘एसआयटी’ने त्याचा शुक्रवारी (दि. २) येरवडा कारागृहातून ताबा घेतला. त्यानंतर त्याला कोल्हापुरात आणले. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर त्याला हजर केले. सुरुवातीस न्यायाधीशांनी तावडेला पोलिसांविरोधात तुमची काही तक्रार आहे का? अशी विचारणा केली. त्यावर तावडेने पोलिसांनी मला शुक्रवारी रात्री खूप मारहाण केली. मला उच्च रक्तदाब, मधुमेह व डोकेदुखीचा त्रास असून औषधे सुरू आहेत, याची कल्पना पोलिसांना देऊनही तपास अधिकारी सुहेल शर्मा, अमृत देशमुख यांनी बुटांच्या लाथांनी छातीवर, पोटावर, गालावर, डोक्यात व डाव्या पायावर मारहाण केल्याने छातीत दुखत आहे, रात्रभर उलट्यांचा त्रास होत आहे. माझ्याबाबतीत काही गंभीर पुरावे त्यांच्या हाती लागले आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. त्याबाबतीत माझ्याकडे त्यांनी सखोल चौकशी करावी; परंतु माझ्या वयाचा व शारीरिक व्याधींचा विचार करून मारहाण करू नये, त्यासाठी आपण मदत करावी, अशी माझी प्रार्थना आहे. यावेळी न्यायाधीशांनी तावडेला ‘मारहाणीचे वळ दाखवू शकता काय?’ अशी विचारणा केली. त्यावेळी त्याचे वकील अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी ‘पोलिस खूप हुशार आहेत. मारहाणीचे वळ उठणार नाहीत, अशा पद्धतीने ते मारहाण करतात.’ असे सांगितले. तावडेने डाव्या पायावरील पॅँटवर बुटाचा वळ असल्याचे दाखविले. सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी पोलिसांनी आरोपीचा ताबा घेतल्यानंतर त्या रात्री ‘सीपीआर’मध्ये वैद्यकीय तपासणी केली आहे. तो पोलिसांवर खोटे आरोप करीत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर न्यायालयाने वैद्यकीय अहवालाची मागणी केली. सीपीआर प्रशासनाकडून अहवाल न घेतल्याने तो हजर करण्यासाठी तासाभराची वेळ द्यावी, अशी विनंती तपास अधिकारी शर्मा यांनी केली. त्यानंतर शर्मा यांनी चौकशीकामी तावडेला चौदा दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती न्यायालयास केली. त्यावर आरोपीचे वकील अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी आक्षेप घेत पानसरे खूनप्रकरणी समीर गायकवाड याला अटक केली होती. त्याच्या चौकशीमध्ये तावडेवर संशय आला नाही. ‘सीबीआय’ने दाभोलकर खूनप्रकरणी तावडेला अटक केली. त्यानंतर हे पानसरे खुनाच्या चौकशीसाठी त्याच्या पोलिस कोठडीची मागणी करीत आहेत. या तपास यंत्रणेकडे कसलाही पुरावा नाही. तावडे याचा पानसरे खून प्रकरणात काही संबंध नाही; त्यामुळे त्याला पोलिस कोठडी देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सांगितले. पोलिस कोठडीच्या मुद्द्यावर दोन्ही वकिलांत जोरदार खडाजंगी झाली. तपास अधिकारी शर्मा यांनीही तावडेला पोलिस कोठडी मिळणे तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे न्यायालयासमोर विशद केले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून अखेर न्यायाधीश पाटील यांनी तावडेच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निर्णय दिला जाईल, असे स्पष्ट करीत पोलिसांना तपासणीचे आदेश दिले. त्यानंतर दुसऱ्यांदा तावडेची ‘सीपीआर’मध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ती सुरू असताना न्यायालयीन कामकाजाची वेळ संपली असतानाही न्यायालय पोलिसांच्या अहवालाची प्रतीक्षा करीत थांबले. सुमारे दोन तासांनी पोलिस तावडेसह वैद्यकीय अहवाल घेऊन न्यायालयात आले. अहवाल पाहून त्यांनी तपासकामी तावडेला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. -------------------------७५ दिवसांनी साक्षात्कार होतो का? ‘सीबीआय’ने १ जून २०१६ रोजी सकाळी साडेआठ वाजता न्यायालयाच्या परवानगीने पनवेल येथील डॉ. तावडेच्या घरी छापा टाकला. देशभरातील गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या ‘सीबीआय’ यंत्रणेच्या हाती डायरी, नोटबुक, दोन फोन व त्यांचे कव्हर लागले. याव्यतिरिक्त काहीच सापडले नाही. त्यानंतर १० जूनपर्यंत बेलापूर (मुंबई) येथील कार्यालयात रोज चौकशी करून त्यादिवशी त्याला अटक केली. त्यानंतर दहा दिवसांची कोठडी मिळाली. या चौकशीमध्ये ‘सीबीआय’च्या हाती काहीच लागले नाही. त्यानंतर २० जूनला ‘एसआयटी’ने त्याचा ताबा मागितला. त्यास पुण्याच्या न्यायालयाने मंजुरी दिली. त्यानंतर ७५ दिवसांनी तावडेचा ताबा घेण्यासंबंधी ‘एसआयटी’ला साक्षात्कार होतो का? यापूर्वी त्यांनी का घेतले नाही, असा मुद्दा अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला.