शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हातकणंगलेतील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना ४० लाखांची भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खोची : गतवर्षी गारपीट व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या हातकणंगले तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ४० लाख रुपयांची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

खोची : गतवर्षी गारपीट व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या हातकणंगले तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ४० लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. या संदर्भात आमदार राजू आवळे यांनी विशेष प्रयत्न शासनदरबारी करीत सतत पाठपुरावा केला. याला यश मिळून शेतकऱ्यांना मोठी नुकसान भरपाई मिळाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक भरपाई हातकणंगले तालुक्याला मिळाली असून, लाटवडे गावासाठी २९ लाख १६ हजार रुपये मंजूर झाले आहेत.

मे महिन्यात प्रचंड गारपिटीचा पाऊस झाला. लाटवडे, सावर्डे गावांतील ऊसशेतीचे अतोनात नुकसान झाले होते. इतर गावांतही केळी, भाजीपाला पिके उद‌्ध्वस्त झाली होती. याची दखल घेत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून आमदार राजू आवळे यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. खासदार धैर्यशील माने यांनीही अधिकाऱ्यांसोबत भेट देऊन पाहणी केली होती. परिसरातील नुकसानग्रस्त भागाचा सर्व्हे करून माहिती वरिष्ठ विभागाला पाठवा, अशा सूचना दिल्या. राजू आवळे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषिमंत्री दादासो भुसे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडेही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. आवळे यांनी नुकसान भरपाई मिळवून देणारच हा शेतकऱ्यांना दिलेला शब्द खरा करून दाखविला आहे.

सुमारे ३०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. यासाठी ७२६ शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होईल. लाटवडे, सावर्डे, नेज, किणी, वाठार तर्फ वडगाव, घुणकी, चावरे, तळसंदे, भादोले येथील शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.

चौकट-

गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यांना मदत होणे ही गरज होती. यासाठी जो पाठपुरावा केला त्याला यश आले आहे. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील(यड्रावकर) यांचे या कामी सहकार्य लाभले.

- राजूबाबा आवळे, आमदार, हातकणंगले विधानसभा