शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

‘पुजारी हटाओ’साठीच्या समितीस वैधानिकता नाही

By admin | Updated: June 29, 2017 01:14 IST

‘पुजारी हटाओ’साठीच्या समितीस वैधानिकता नाही

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव आंदोलनाच्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या समितीला वैधानिक दर्जा देण्यास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी स्पष्ट नकार दिला. तुम्हीच समिती नेमा आणि लोकमानस समजून घेऊन तुम्हीच वस्तुनिष्ठ अहवाल द्या, अशा शब्दांत दादांनी सर्वपक्षीय अंबाबाई भक्त समितीच्या कार्यकर्त्यांना सांगीतले. तीन महिन्यांनी समितीने आपल्या अहवालाद्वारे केलेल्या सूचना व दिलेला सल्ला म्हणजे निर्णय नसून, निर्णय घेण्याचे अधिकार हे राज्याच्या विधि व न्याय खात्याला असतील, असा खुलासाही पालकमंत्र्यांनी यावेळी केला. पालकमंत्र्यांच्या या निवेदनाने कृती समितीचे सदस्य काहीसे नाराज झाले. अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्याचा तसेच तीन महिन्यांत या समितीने अहवाल द्यावा, असा निर्णय पालकमंत्री पाटील यांनी घोषित केला होता. त्यास अनुसरून बुधवारी सर्वपक्षीय कृती समितीचे कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यास गेले होते. त्या ठिकाणी पालकमंत्रीच कृती समितीच्या कार्यकर्त्यांना भेटले. आपण नेमलेल्या समितीवरील सदस्यांची नावे निश्चित करावीत आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने काम सुरू करावे, त्याचबरोबर या समितीला वैधानिक दर्जा द्यावा, अशी मागणी दिलीप देसाई यांनी केली. समितीला वैधानिक दर्जा दिला तरच समितीचे म्हणणे उच्च न्यायालयात टिकू शकेल, अन्यथा त्याला अर्थ राहणार नाही, असेही देसाई यांनी निदर्शनास आणून दिले. मात्र, पालकमंत्री पाटील यांनी ही मागणी थेट फेटाळून लावली. पुजारी हटावबाबतचा निर्णय ही समिती घेणार नाही, तर निर्णय विधि व न्याय खाते घेणार आहे. समितीने फक्त सल्ला देण्याचे काम करायचे आहे. जनमानस काय आहे ते समजून घ्यावे. पगारी पुजारी ठेवायचे झाल्यास कोणाला प्राधान्य द्यायचे, निकष काय असावेत, परंपरागत पद्धतीस नेमके काय बदल केले पाहिजेत, यासंबंधीच्या सूचना समितीने द्याव्यात, असे पालकमंत्री म्हणाले.सीसीटीव्ही कॅमेरे बसवा अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात सीसीटीव्ही बसवावेत, अशी आमची मागणी आहे. सीसीटीव्ही बसवायला गेल्यावर तेथे वादाचा प्रसंग घडला. आम्हाला संघर्ष करायचा नाही; पण तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश द्यावेत, अशी सूचना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली.