शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

आयुक्तांकडून फेरीवाला झोनचे चुकीचे नियोजन

By admin | Updated: February 24, 2016 01:01 IST

मुरलीधर जाधव : पुनर्वसन करताना नगरसेवकांना विश्वासात घ्या

कोल्हापूर : शहरात राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी करणारे आयुक्त पहिल्यांदाच पाहतोय, अशा शब्दांत स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांनी मंळवारी आयुक्त पी. शिवशंकर यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. फेरीवाल्यांच्या प्रश्नांवर पदाधिकाऱ्यांनी बैठक बोलाविली असताना आयुक्त बैठकीस येणार नसतील तर आम्ही कोणाकडे तक्रार करायची, अशी विचारणाच उपमहापौर शमा मुल्ला यांनी या बैठकीत केली. राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत शहरात सुरू असलेले फेरीवाल्यांचे पुनर्वसन जर स्थानिक नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन करणार नसाल तर ते कदापि यशस्वी होऊन देणार नाही, असा इशाराच प्रमुख पदाधिकारी, नगरसेवकांनी प्रशासनाला दिला. त्यामुळे प्रशासनाच्या प्रयत्नांना आता आणखी खीळ बसली. फेरीवाल्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी महापौर अश्विनी रामाणे यांनी मंगळवारी सायंकाळी महानगरपालिका ताराराणी सभागृहात प्रमुख पदाधिकारी, नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती. यावेळी आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांना निमंत्रण दिले होते; परंतु आयुक्तांनी या बैठकीला दांडी मारली. काही मोजकेच अधिकारी यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे ज्यांनी शहरातील पर्यायी जागांचा शोध घेऊन पुनर्वसन करण्यात पुढाकार घेतला ते संजय भोसलेही या बैठकीला अनुपस्थित होते. त्यामुळे सर्वच पदाधिकारी, नगरसेवकांनी तीव्र आक्षेप नोंदविला.गेली वर्षभर ही पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू असूनही त्यात नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना विचारात घेतले नाही. परिणामी प्रशासनाचे नियोजन चुकले आहे. शहरात सर्वत्र टीका, विरोध होत असून नगरसेवकांना जबाबदार धरले जाऊ लागले आहे. त्यामुळे यापुढे नियोजन करताना जर नगरसेवकांना विश्वासात घेतले नाही तर ते कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराच या बैठकीत देण्यात आला. प्रशासनाच्या नियोजनावर बैठकीत टीकेची झोड उठविण्यात आली. ज्या भागात चार-चार शाळा आहेत, निवासी परिसर आहे, अशा ठिकाणी फेरीवाल्यांना जागा कशासाठी देता, अशी विचारणा सत्यजित कदम यांनी केली. एकीकडे ‘ना फेरीवाला क्षेत्र’ म्हणून जाहीर करायचे तर दुसरीकडे त्याच ताराबाई रोड व महाद्वार रोडवर विक्रेत्यांना जागा कशी काय दिली जाते, अशी विचारणा ईश्वर परमार यांनी केली. सांगली-मिरज परिसरातील विक्रेते कोल्हापुरात येऊन व्यवसाय करतात, त्यांच्याकडे बायोमेट्रीक कार्ड आहेत का याची तपासणी करावी, अशी मागणी दुर्वास कदम यांनी केली. यावेळी विरोधी पक्षनेते संभाजी जाधव, शारंगधर देशमुख, सुनील पाटील, अजित ठाणेकर, तौफिक मुल्लाणी, मधुकर रामाणे आदींनी चर्चेत भाग घेतला. तक्रार तरी कोणाकडे करायची? आयुक्त पी. शिवशंकर यांनी बैठकीस दांडी मारल्यामुळे उपमहापौर शमा मुल्ला चांगल्याच संतप्त झाल्या होत्या. नागरिक आमच्या दारात येतात. त्यामुळे आम्हाला तोंड द्यावे लागत आहे. जर आयुक्त प्रत्येक वेळी पदाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या बैठकीला गैरहजर राहणार असतील आणि प्रत्येक वेळी असेच होणार असेल तर मग आम्ही तक्रार तरी कोणाकडे करायची, अशी विचारणाच त्यांनी बैठकीत केली.