शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
4
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
5
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
6
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
7
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
8
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
9
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
10
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
11
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
12
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
13
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
14
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
15
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
16
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
17
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
18
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
19
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
20
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 

आयुक्तांकडून फेरीवाला झोनचे चुकीचे नियोजन

By admin | Updated: February 24, 2016 01:01 IST

मुरलीधर जाधव : पुनर्वसन करताना नगरसेवकांना विश्वासात घ्या

कोल्हापूर : शहरात राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी करणारे आयुक्त पहिल्यांदाच पाहतोय, अशा शब्दांत स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांनी मंळवारी आयुक्त पी. शिवशंकर यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. फेरीवाल्यांच्या प्रश्नांवर पदाधिकाऱ्यांनी बैठक बोलाविली असताना आयुक्त बैठकीस येणार नसतील तर आम्ही कोणाकडे तक्रार करायची, अशी विचारणाच उपमहापौर शमा मुल्ला यांनी या बैठकीत केली. राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत शहरात सुरू असलेले फेरीवाल्यांचे पुनर्वसन जर स्थानिक नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन करणार नसाल तर ते कदापि यशस्वी होऊन देणार नाही, असा इशाराच प्रमुख पदाधिकारी, नगरसेवकांनी प्रशासनाला दिला. त्यामुळे प्रशासनाच्या प्रयत्नांना आता आणखी खीळ बसली. फेरीवाल्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी महापौर अश्विनी रामाणे यांनी मंगळवारी सायंकाळी महानगरपालिका ताराराणी सभागृहात प्रमुख पदाधिकारी, नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती. यावेळी आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांना निमंत्रण दिले होते; परंतु आयुक्तांनी या बैठकीला दांडी मारली. काही मोजकेच अधिकारी यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे ज्यांनी शहरातील पर्यायी जागांचा शोध घेऊन पुनर्वसन करण्यात पुढाकार घेतला ते संजय भोसलेही या बैठकीला अनुपस्थित होते. त्यामुळे सर्वच पदाधिकारी, नगरसेवकांनी तीव्र आक्षेप नोंदविला.गेली वर्षभर ही पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू असूनही त्यात नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना विचारात घेतले नाही. परिणामी प्रशासनाचे नियोजन चुकले आहे. शहरात सर्वत्र टीका, विरोध होत असून नगरसेवकांना जबाबदार धरले जाऊ लागले आहे. त्यामुळे यापुढे नियोजन करताना जर नगरसेवकांना विश्वासात घेतले नाही तर ते कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराच या बैठकीत देण्यात आला. प्रशासनाच्या नियोजनावर बैठकीत टीकेची झोड उठविण्यात आली. ज्या भागात चार-चार शाळा आहेत, निवासी परिसर आहे, अशा ठिकाणी फेरीवाल्यांना जागा कशासाठी देता, अशी विचारणा सत्यजित कदम यांनी केली. एकीकडे ‘ना फेरीवाला क्षेत्र’ म्हणून जाहीर करायचे तर दुसरीकडे त्याच ताराबाई रोड व महाद्वार रोडवर विक्रेत्यांना जागा कशी काय दिली जाते, अशी विचारणा ईश्वर परमार यांनी केली. सांगली-मिरज परिसरातील विक्रेते कोल्हापुरात येऊन व्यवसाय करतात, त्यांच्याकडे बायोमेट्रीक कार्ड आहेत का याची तपासणी करावी, अशी मागणी दुर्वास कदम यांनी केली. यावेळी विरोधी पक्षनेते संभाजी जाधव, शारंगधर देशमुख, सुनील पाटील, अजित ठाणेकर, तौफिक मुल्लाणी, मधुकर रामाणे आदींनी चर्चेत भाग घेतला. तक्रार तरी कोणाकडे करायची? आयुक्त पी. शिवशंकर यांनी बैठकीस दांडी मारल्यामुळे उपमहापौर शमा मुल्ला चांगल्याच संतप्त झाल्या होत्या. नागरिक आमच्या दारात येतात. त्यामुळे आम्हाला तोंड द्यावे लागत आहे. जर आयुक्त प्रत्येक वेळी पदाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या बैठकीला गैरहजर राहणार असतील आणि प्रत्येक वेळी असेच होणार असेल तर मग आम्ही तक्रार तरी कोणाकडे करायची, अशी विचारणाच त्यांनी बैठकीत केली.