शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांकडून फेरीवाला झोनचे चुकीचे नियोजन

By admin | Updated: February 24, 2016 01:01 IST

मुरलीधर जाधव : पुनर्वसन करताना नगरसेवकांना विश्वासात घ्या

कोल्हापूर : शहरात राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी करणारे आयुक्त पहिल्यांदाच पाहतोय, अशा शब्दांत स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांनी मंळवारी आयुक्त पी. शिवशंकर यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. फेरीवाल्यांच्या प्रश्नांवर पदाधिकाऱ्यांनी बैठक बोलाविली असताना आयुक्त बैठकीस येणार नसतील तर आम्ही कोणाकडे तक्रार करायची, अशी विचारणाच उपमहापौर शमा मुल्ला यांनी या बैठकीत केली. राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत शहरात सुरू असलेले फेरीवाल्यांचे पुनर्वसन जर स्थानिक नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन करणार नसाल तर ते कदापि यशस्वी होऊन देणार नाही, असा इशाराच प्रमुख पदाधिकारी, नगरसेवकांनी प्रशासनाला दिला. त्यामुळे प्रशासनाच्या प्रयत्नांना आता आणखी खीळ बसली. फेरीवाल्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी महापौर अश्विनी रामाणे यांनी मंगळवारी सायंकाळी महानगरपालिका ताराराणी सभागृहात प्रमुख पदाधिकारी, नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती. यावेळी आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांना निमंत्रण दिले होते; परंतु आयुक्तांनी या बैठकीला दांडी मारली. काही मोजकेच अधिकारी यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे ज्यांनी शहरातील पर्यायी जागांचा शोध घेऊन पुनर्वसन करण्यात पुढाकार घेतला ते संजय भोसलेही या बैठकीला अनुपस्थित होते. त्यामुळे सर्वच पदाधिकारी, नगरसेवकांनी तीव्र आक्षेप नोंदविला.गेली वर्षभर ही पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू असूनही त्यात नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना विचारात घेतले नाही. परिणामी प्रशासनाचे नियोजन चुकले आहे. शहरात सर्वत्र टीका, विरोध होत असून नगरसेवकांना जबाबदार धरले जाऊ लागले आहे. त्यामुळे यापुढे नियोजन करताना जर नगरसेवकांना विश्वासात घेतले नाही तर ते कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराच या बैठकीत देण्यात आला. प्रशासनाच्या नियोजनावर बैठकीत टीकेची झोड उठविण्यात आली. ज्या भागात चार-चार शाळा आहेत, निवासी परिसर आहे, अशा ठिकाणी फेरीवाल्यांना जागा कशासाठी देता, अशी विचारणा सत्यजित कदम यांनी केली. एकीकडे ‘ना फेरीवाला क्षेत्र’ म्हणून जाहीर करायचे तर दुसरीकडे त्याच ताराबाई रोड व महाद्वार रोडवर विक्रेत्यांना जागा कशी काय दिली जाते, अशी विचारणा ईश्वर परमार यांनी केली. सांगली-मिरज परिसरातील विक्रेते कोल्हापुरात येऊन व्यवसाय करतात, त्यांच्याकडे बायोमेट्रीक कार्ड आहेत का याची तपासणी करावी, अशी मागणी दुर्वास कदम यांनी केली. यावेळी विरोधी पक्षनेते संभाजी जाधव, शारंगधर देशमुख, सुनील पाटील, अजित ठाणेकर, तौफिक मुल्लाणी, मधुकर रामाणे आदींनी चर्चेत भाग घेतला. तक्रार तरी कोणाकडे करायची? आयुक्त पी. शिवशंकर यांनी बैठकीस दांडी मारल्यामुळे उपमहापौर शमा मुल्ला चांगल्याच संतप्त झाल्या होत्या. नागरिक आमच्या दारात येतात. त्यामुळे आम्हाला तोंड द्यावे लागत आहे. जर आयुक्त प्रत्येक वेळी पदाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या बैठकीला गैरहजर राहणार असतील आणि प्रत्येक वेळी असेच होणार असेल तर मग आम्ही तक्रार तरी कोणाकडे करायची, अशी विचारणाच त्यांनी बैठकीत केली.