शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांचे अंदाजपत्रकही पालिकेला डोईजड

By admin | Updated: July 28, 2015 01:05 IST

एलबीटी रद्दचा झटका : शासनाकडून सुमारे ६५० कोटींची अपेक्षा

नाशिक : महाराष्ट्र शासनाकडून येत्या १ आॅगस्टपासून एलबीटी रद्द करण्यासंबंधी सुरू झालेल्या हालचाली आणि दुसरीकडे स्थायी समितीने ३३२.३० कोटी रुपयांची वाढ सुचवत १७९६.९७ कोटी रुपयांपर्यंत प्रारूप अंदाजपत्रक नेऊन ठेवल्याने यापुढील काळात उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ कसा घालायचा, याबाबतचे अवघड गणित नाशिक महापालिकेला सोडवावे लागणार आहे. चालू आर्थिक वर्षात ५० कोटी रुपयांवरील उलाढालीतून महापालिकेच्या झोळीत अवघे २०० ते २२५ कोटी रुपये पडणार असून, अन्य करांच्या माध्यमातून सुमारे ३७० कोटी रुपये प्राप्त होण्याचा अंदाज आहे. पालिकेचा संभाव्य बांधील खर्चच ७८९ कोटी रुपये असल्याने तो स्वत:च्या उत्पन्नातून भागवितानाच मोठी तारांबळ उडण्याची शक्यता आहे. परिणामी, आयुक्तांनी मांडलेले १४३७.६७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रकही महापालिकेला डोईजड ठरण्याची चिन्हे दिसून येत आहेत. महाराष्ट्र शासनाने २४ जुलै रोजी अधिसूचना प्रसिद्ध करत ५० कोटी रुपयांवरील उलाढाल असणाऱ्या व्यावसायिकांसाठीच एलबीटी आकारणीचा निर्णय घेतला असून, त्यावर ३१ जुलैपर्यंत हरकती-सूचना मागविण्यात आल्या आहेत. सर्वसाधारणपणे आॅगस्टपासून ५० कोटींच्या आत वार्षिक उलाढाल असणाऱ्या व्यापारी-व्यावसायिकांना लागू असलेला एलबीटी रद्द होणार आहे आणि शासनाने त्यादृष्टीने तयारीही आरंभली आहे. ५० कोटी रुपयांवरील उलाढालीतून नाशिक महापालिकेच्या खजिन्यात सुमारे २०० ते २२५ कोटी रूपये पडणार आहेत, तर ३२ हजार व्यापाऱ्यांनी केलेली नोंदणी रद्द होऊन महापालिकेला त्यापोटी सुमारे ४५० कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. महापालिकेला एलबीटीच्या माध्यमातून सुमारे ७०० कोटी रुपये उत्पन्न प्राप्त होते. ५० कोटींच्या आतील व्यावसायिकांना एलबीटी रद्द करण्याच्या निर्णयामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होऊन त्याचा अंदाजपत्रकावरही परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी १४३७.३७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. त्यात आयुक्तांनी एलबीटीच्या माध्यमातून ८७६.८३ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरले आहे, तर अन्य करांच्या माध्यमातून ३६७.९२ कोटी रुपये उत्पन्न त्यांनी गृहित धरले आहे. आयुक्तांना एकूण १२४४.७५ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. आयुक्तांच्या या अंदाजपत्रकात आता स्थायी समितीने तब्बल चार महिन्यांच्या विलंबानंतर ३३२.३० कोटी रुपयांची वाढ सुचवित अंदाजपत्रक १७६९.९७ कोटी रुपयांच्या घरात नेऊन ठेवले आहे. आता स्थायीचे अंदाजपत्रक महासभेवर सादर होणार असून, त्यात महासभेकडूनही कोट्यवधींची भर पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसविताना प्रशासनाची मोठी तारांबळ उडणार असून, उत्पन्नावर होणारा परिणाम लक्षात घेता आयुक्तांनीच सादर केलेले अंदाजपत्रक पूर्णत्वाला जाते किंवा नाही, याबाबत साशंकता आहे. (प्रतिनिधी)