औंध : गळीत हंगाम सुरू झाल्यापासून कारखान्याच्या जवळच्या पसिरातील ऊस वाहतूक करण्यासाठी बैलगाडी वापरली जात आहे. या गाडीला ट्रॅक्टरची चाके बसविली जातात. या गाड्यांमध्ये सुमारे दोन-तीन टन ऊस नेण्याची क्षमता असते; परंतु ऊस भरल्यानंतर वाहतूक करताना उतारावर वेग कमी करण्यासाठी बैलगाडीला पाच-सहा व्यक्ति लोंबकळत ब्रेक लावण्याचा प्रयत्न करतात. ही पद्धत जीवघेणी ठरू शकते? याची मात्र कुणालाही पर्वा नाही.तोडलेला ऊस बैलगाडीमध्ये भरून कारखान्याकडे नेताना एका बैलगाडी सोबत पाच ते सहा व्यक्त प्रवास करीत असतात. बैलगाडी जेंव्हा सपाटीला असते तेंव्हा कोणताही धोका नसतो; मात्र उताराला वेग मर्यादित व्हावा, यासाठी पाच-सहा व्यक्तिंना बैलगाडीला लोंबकळून वेगावर नियंत्रण आणावे लागते. मात्र ही कसतर जिवघेणी ठरु शकते.उताराबरोबरच बैलांना चढ चढतानासुद्धा फार जिकिरीचे होते. अशावेळी बैलगाडीला पूर्ण ताकतीने ढकलावे लागते. या चढ-उताराऱ्या खेळात बैलांबरोबच संबंधीत शेतकऱ्यांची मात्र परवड होताना दिसते. मात्र याकडे कोणीच लक्ष देत नाही. (वार्ताहर)... याला जबाबदार कोण?अचानक उतारावर बैलजोडीवर संपूर्ण भार येत असतो व कधी-कधी बैल घसरून पडण्याच्या घटनाही घडत असतात; परंतु ही कसरत अत्यंत धोकादायक आहे. एखाद्या वेळेस काही अनर्थ घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्नही हे दृश्य बघणाऱ्यांच्या मनात येत असेल.
चला...सहा-सहा जण लोंबकळा!
By admin | Updated: December 16, 2014 00:04 IST