शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

मानवतेसाठी चले चलो

By admin | Updated: May 19, 2015 00:22 IST

आशा पदयात्रेचे आगमन : आज दसरा चौकातून फेरीस सुरुवात

कोल्हापूर : देशात शांतता आणि जातीय सलोखा नांदण्यासाठी ‘मानव एकता मिशन’तर्फे ‘आशा पदयात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. आशा पदयात्रेची कोल्हापूर शहरातील सुरुवात आज, मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता दसरा चौकातून होणार आहे. या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही पदयात्रा श्री अंबाबाई मंदिराकडे मार्गस्थ होणार आहे. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता करवीरपीठात सत्संग कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती या पदयात्रेचे प्रमुख श्री. एम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर शहरात आशा पदयात्रेचे आमगन सोमवारी झाले. शिवाजी विद्यापीठ रोडवरून सायबर चौकामार्गे ही पदयात्रा शाहू स्मारक भवनात आली. या ठिकाणी या यात्रेतील सहभागींचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी शाहू स्मारक भवन येथे संवाद साधताना एम. बोलत होते. एम. म्हणाले, कोल्हापूर हे सर्वधर्मभावाचे केंद्र आहे. राजर्षी शाहू महाराजांनी येथे विविध जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी बांधलेली वसतिगृहे, येथील जैन मठ आणि मशिदी या सर्वधर्मभावाची साक्ष देतात. त्यामुळे महाराष्ट्रातील पदयात्रेची सुरुवात कोल्हापुरातून सुरू करताना आनंद होत आहे. आशा पदयात्रेचा प्रारंभ १२ जानेवारी २०१५ ला कन्याकुमारी येथून माजी केंद्रीय मंत्री डॉ. करण सिंग यांच्या हस्ते झाला. कन्याकुमारी ते काश्मीर हा या पदयात्रेचा मार्ग आहे. यामध्ये सुमारे १५० जण सहभागी झाले आहेत. आतापर्यंत ही पदयात्रा २२०० किलोमीटरचा प्रवास करत महाराष्ट्रात शनिवारी (दि. १६) पोहोचली आहे. आंतरधर्मीय ऐक्य, महिला सबलीकरण , आरोग्य आणि शिक्षण व युवकांचा विकासाचा जागर करत ही यात्रा काश्मीरपर्यंत पोहोचणार आहे. यावेळी आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसचे डॉ. चंद्रकांत पांडव, कर्नाटकच्या माजी अतिरिक्त मुख्य सचिव तारा सिंग, माजी पोलीस महासंचालक अजयकुमार सिंग , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, मानव एकता मिशनचे महाराष्ट्र राज्य समन्वयक दीपक खडके उपस्थित होते. ( प्रतिनिधी )शहरात भव्य स्वागत आशा पदयात्रेचे शिवाजी विद्यापीठ रोड येथे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर ही यात्रा सायबर चौकामार्गे शाहू स्मारक भवनात आली. या ठिकाणी झालेल्या स्वागताच्या कार्यक्रमात करवीरपीठाचे शंकराचार्य जगद्गुरू विद्यानृसिंह भारती, जैन मठाचे लक्ष्मीसेन महाराज यांनी आशा पदयात्रेला शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी पदयात्रेदरम्यान विविध राज्यांतून येत असताना, तेथील सांस्कृतिक विविधता आणि यात्रेचे स्वागत दाखवणारा स्लाईड शो दाखविण्यात आला.