शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

मानवतेसाठी चले चलो

By admin | Updated: May 19, 2015 00:22 IST

आशा पदयात्रेचे आगमन : आज दसरा चौकातून फेरीस सुरुवात

कोल्हापूर : देशात शांतता आणि जातीय सलोखा नांदण्यासाठी ‘मानव एकता मिशन’तर्फे ‘आशा पदयात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. आशा पदयात्रेची कोल्हापूर शहरातील सुरुवात आज, मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता दसरा चौकातून होणार आहे. या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही पदयात्रा श्री अंबाबाई मंदिराकडे मार्गस्थ होणार आहे. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता करवीरपीठात सत्संग कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती या पदयात्रेचे प्रमुख श्री. एम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर शहरात आशा पदयात्रेचे आमगन सोमवारी झाले. शिवाजी विद्यापीठ रोडवरून सायबर चौकामार्गे ही पदयात्रा शाहू स्मारक भवनात आली. या ठिकाणी या यात्रेतील सहभागींचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी शाहू स्मारक भवन येथे संवाद साधताना एम. बोलत होते. एम. म्हणाले, कोल्हापूर हे सर्वधर्मभावाचे केंद्र आहे. राजर्षी शाहू महाराजांनी येथे विविध जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी बांधलेली वसतिगृहे, येथील जैन मठ आणि मशिदी या सर्वधर्मभावाची साक्ष देतात. त्यामुळे महाराष्ट्रातील पदयात्रेची सुरुवात कोल्हापुरातून सुरू करताना आनंद होत आहे. आशा पदयात्रेचा प्रारंभ १२ जानेवारी २०१५ ला कन्याकुमारी येथून माजी केंद्रीय मंत्री डॉ. करण सिंग यांच्या हस्ते झाला. कन्याकुमारी ते काश्मीर हा या पदयात्रेचा मार्ग आहे. यामध्ये सुमारे १५० जण सहभागी झाले आहेत. आतापर्यंत ही पदयात्रा २२०० किलोमीटरचा प्रवास करत महाराष्ट्रात शनिवारी (दि. १६) पोहोचली आहे. आंतरधर्मीय ऐक्य, महिला सबलीकरण , आरोग्य आणि शिक्षण व युवकांचा विकासाचा जागर करत ही यात्रा काश्मीरपर्यंत पोहोचणार आहे. यावेळी आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसचे डॉ. चंद्रकांत पांडव, कर्नाटकच्या माजी अतिरिक्त मुख्य सचिव तारा सिंग, माजी पोलीस महासंचालक अजयकुमार सिंग , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, मानव एकता मिशनचे महाराष्ट्र राज्य समन्वयक दीपक खडके उपस्थित होते. ( प्रतिनिधी )शहरात भव्य स्वागत आशा पदयात्रेचे शिवाजी विद्यापीठ रोड येथे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर ही यात्रा सायबर चौकामार्गे शाहू स्मारक भवनात आली. या ठिकाणी झालेल्या स्वागताच्या कार्यक्रमात करवीरपीठाचे शंकराचार्य जगद्गुरू विद्यानृसिंह भारती, जैन मठाचे लक्ष्मीसेन महाराज यांनी आशा पदयात्रेला शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी पदयात्रेदरम्यान विविध राज्यांतून येत असताना, तेथील सांस्कृतिक विविधता आणि यात्रेचे स्वागत दाखवणारा स्लाईड शो दाखविण्यात आला.