शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मानवतेसाठी चले चलो

By admin | Updated: May 19, 2015 00:22 IST

आशा पदयात्रेचे आगमन : आज दसरा चौकातून फेरीस सुरुवात

कोल्हापूर : देशात शांतता आणि जातीय सलोखा नांदण्यासाठी ‘मानव एकता मिशन’तर्फे ‘आशा पदयात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. आशा पदयात्रेची कोल्हापूर शहरातील सुरुवात आज, मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता दसरा चौकातून होणार आहे. या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही पदयात्रा श्री अंबाबाई मंदिराकडे मार्गस्थ होणार आहे. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता करवीरपीठात सत्संग कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती या पदयात्रेचे प्रमुख श्री. एम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर शहरात आशा पदयात्रेचे आमगन सोमवारी झाले. शिवाजी विद्यापीठ रोडवरून सायबर चौकामार्गे ही पदयात्रा शाहू स्मारक भवनात आली. या ठिकाणी या यात्रेतील सहभागींचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी शाहू स्मारक भवन येथे संवाद साधताना एम. बोलत होते. एम. म्हणाले, कोल्हापूर हे सर्वधर्मभावाचे केंद्र आहे. राजर्षी शाहू महाराजांनी येथे विविध जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी बांधलेली वसतिगृहे, येथील जैन मठ आणि मशिदी या सर्वधर्मभावाची साक्ष देतात. त्यामुळे महाराष्ट्रातील पदयात्रेची सुरुवात कोल्हापुरातून सुरू करताना आनंद होत आहे. आशा पदयात्रेचा प्रारंभ १२ जानेवारी २०१५ ला कन्याकुमारी येथून माजी केंद्रीय मंत्री डॉ. करण सिंग यांच्या हस्ते झाला. कन्याकुमारी ते काश्मीर हा या पदयात्रेचा मार्ग आहे. यामध्ये सुमारे १५० जण सहभागी झाले आहेत. आतापर्यंत ही पदयात्रा २२०० किलोमीटरचा प्रवास करत महाराष्ट्रात शनिवारी (दि. १६) पोहोचली आहे. आंतरधर्मीय ऐक्य, महिला सबलीकरण , आरोग्य आणि शिक्षण व युवकांचा विकासाचा जागर करत ही यात्रा काश्मीरपर्यंत पोहोचणार आहे. यावेळी आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसचे डॉ. चंद्रकांत पांडव, कर्नाटकच्या माजी अतिरिक्त मुख्य सचिव तारा सिंग, माजी पोलीस महासंचालक अजयकुमार सिंग , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, मानव एकता मिशनचे महाराष्ट्र राज्य समन्वयक दीपक खडके उपस्थित होते. ( प्रतिनिधी )शहरात भव्य स्वागत आशा पदयात्रेचे शिवाजी विद्यापीठ रोड येथे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर ही यात्रा सायबर चौकामार्गे शाहू स्मारक भवनात आली. या ठिकाणी झालेल्या स्वागताच्या कार्यक्रमात करवीरपीठाचे शंकराचार्य जगद्गुरू विद्यानृसिंह भारती, जैन मठाचे लक्ष्मीसेन महाराज यांनी आशा पदयात्रेला शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी पदयात्रेदरम्यान विविध राज्यांतून येत असताना, तेथील सांस्कृतिक विविधता आणि यात्रेचे स्वागत दाखवणारा स्लाईड शो दाखविण्यात आला.