शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी राजारामपुरीत ‘मोफत प्लंबर’ सेवा

By admin | Updated: April 1, 2016 01:32 IST

बाबूराव माने यांचा उपक्रम : कामासाठी दोन प्लंबरांची नियुक्ती

कोल्हापूर : पाणीटंचाईमुळे महाराष्ट्र होरपळत आहे. एक घागर पाण्यासाठी नागरिकांना दाहीदिशा पायपीट करण्याची वेळ आली आहे. पाण्याचे हे महत्त्व लोकांना पटवून देणे आणि वाया जाणाऱ्या थेंब थेंब पाण्याची बचत करण्यासाठी राजारामपुरीमध्ये राहणारे ८१ वर्षीय बाबूराव माने यांनी ‘मोफत प्लंबर’ ही सेवा उपलब्ध करून दिली आहे.शहरातही पाणीटंचाईची परिस्थिती बिकट आहे. थेंब थेंब पाण्याला महत्त्व आले आहे. मात्र, घरामधील नळगळती, पाईपगळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात असते. काही वेळा प्लंबर वेळेत मिळत नसल्याने किंवा धावपळीच्या युगामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याने पाणी वाया जात असते. हीच बाब बाबूराव माने यांच्या लक्षात आली. माने यांनी पाण्याचे मोल व ते काटकसरीने वापरले पाहिजे या उद्देशाने आजपासून राजारामपुरीत मोफत प्लंबिंग सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. असा आहे उपक्रम...हा उपक्रम फक्त राजारामपुरीतील दुसरी ते पंधरावी गल्लीपर्यंत राबविला जाणार आहे. शुक्रवारी या उपक्रमाची सुरुवात दुसरी गल्ली येथील जगदाळे यांच्या बंगल्यापासून होणार आहे. माने यांच्यामार्फत या उपक्रमासाठी दोन प्लंबरची नियुक्ती केली आहे. त्यांच्यामार्फत राजारामपुरीतील घरोघरी जाऊन पाणीगळती थांबविली जाणार आहे. यामध्ये नळ बदलणे, नळदुरुस्ती, किरकोळ गळती काढणे ही सेवा मोफत पुरविली जाणार आहे. नळ किंवा अन्य साहित्य लागल्यास नागरिकांना त्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. संबंधित प्लंबरमार्फत प्रत्येक घरामध्ये जाऊन त्यांच्याकडे पाणीगळती होत आहे किंवा नाही, याची पाहणी करून वहीत नोंदही केली जाणार आहे. या उपक्रमामधून दुकानगाळे, दवाखाने, मॉल यांना वगळण्यात आले आहे. थेंब थेंब पाणी महत्त्वाचे आहे; मात्र नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याने लाखो लिटर पाणी वाया जाते. सेवाभावी वृत्तीने उपक्रम हाती घेतला आहे. नियुक्त केलेले दोन्ही प्लंबर यांना मी ओळखपत्र दिले आहे. ते ओळखपत्र पाहूनच त्यांना घरामध्ये प्रवेश द्यावा. - बाबूराव माने