शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
5
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
6
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
7
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
8
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
9
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
10
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
11
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
12
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
13
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
14
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
15
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
16
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
17
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
18
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
19
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

जोतिबा मंदिराची रंगरंगोटी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:25 IST

दरवर्षी यात्रेपूर्वी ही शिखरे रंगविली जातात. कारण येथील पावसाळी हवामान खराब असते. सतत पावसाची रिपरिप दाट धुके यांचा सामना ...

दरवर्षी यात्रेपूर्वी ही शिखरे रंगविली जातात. कारण येथील पावसाळी हवामान खराब असते. सतत पावसाची रिपरिप दाट धुके यांचा सामना या शिखरांना करावा लागतो. परिणामी पावसाचे पाणी शिखरातून आत मंदिरांमध्ये येते. त्यामुळे दरवर्षी चैत्र यात्रेपूर्वी या शिखरांची रंगरंगोटी केली जाते.

दरवर्षी ही सर्व शिखरे स्वच्छ करून त्यावर रंगरंगोटी करण्याची पारंपरिक पद्धत डोंगरावर आजतागायत सुरू आहे. गेल्या वर्षी मात्र यामध्ये खंड पडला. श्री महादेव श्री चोपडाईदेवी व श्री जोतिबा देव अशा या तीन मंदिरांचा समूह असून, या तिन्ही मंदिरांची शिखरे उंच असून, शिखरावर चढ-उतार करण्याचे काम अवघड आहे. वरती चढताना दोर लावूनच या शिखरांवर चढावे लागते. मोठ्या दोराच्या साह्यानेच ही शिखरे रंगवावी लागतात. पूर्ण काळजीपूर्वक हे काम करावे लागते. उन्हामुळे मंदिरावरील दगड तापतो परिणामी पायाला चटके बसतात. त्यामुळे रंगरंगोटी ही सकाळी लवकर व दुपारनंतर करावी लागते .

दरम्यान, ही शिखरे दरवर्षी स्वच्छ केल्यामुळे त्यास ऑइल पेंट कलर केल्यामुळे त्यास वर्षभर काही होत नाही. रंगरंगोटी केलेली शिखरे ही आकर्षक दिसतात. त्यामुळे मंदिराला शोभा येते. असे रंगकाम करणारे कामगार सांगत होते.

चौकट : जोतिबा डोंगरावर जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत पावसाचे प्रमाण जास्त असते. एप्रिल महिन्यात दिलेला शिखराचा रंग पावसामुळे उडून जातो. वर्षभर रंग टिकून राहत नाही. त्याऐवजी ऑक्टोंबर महिन्यात नवरात्रौत्सवाच्या अगोदर रंगरगोटी केल्यास तो जास्त काळ टिकून राहील. नवरात्रौत्सवापूर्वी ही रंगरंगोटी करावी आशा प्रतिक्रिया नागरिकांतून दिल्या जात आहेत.

फोटो कॅप्सन २६ एप्रिलला जोतिबा चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री जोतिबा मंदिराच्या शिखरांचे रंगरंगोटीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.