शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

कोल्हापूूर-सूर्यवंशीच्या तयारीने रंगत

By admin | Updated: September 15, 2014 00:50 IST

तरुणांमध्ये निर्माण केलेली क्रेझ पाहता दोन्ही प्रस्थापितांना ते घाम फोडणार, हे निश्चित आहे

राजाराम लोंढे-- कोल्हापूूर .. करवीर मतदारसंघातील तिरंगी लढत निश्चित झाली असून जनसुराज्य-शेकापचे राजेंद्र सूर्यवंशी यांची उमेदवारी कोणाच्या पथ्यावर पडते, याची चर्चा जरी मतदार संघात असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादीचे ताणलेले संबंध, सूर्यवंशी यांनी तरुणांमध्ये निर्माण केलेली क्रेझ पाहता दोन्ही प्रस्थापितांना ते घाम फोडणार, हे निश्चित आहे. गेल्यावेळी नरके व पाटील यांच्यातच खरी लढत झाली. संपतराव पवार तिसऱ्या क्रमांकावर राहीले. नरके यांनी निवडणुकीपूर्वी तीन वर्षे मतदारसंघांत ठेवलेला राबता, त्यांची कोरी असलेली पाटी व शेवटच्या टप्प्यात त्यांनी टाकलेले फासे यशस्वी झाल्याने ते विजयापर्यंत पोहोचू शकले. पाच वर्षांत समीकरणे बदलत गेली असून जनसुराज्य-शेकाप आघाडीने राजेंद्र सूर्यवंशी यांना रिंगणात उरतवले आहे. त्यांनी गेली दोन वर्षे मतदारसंघ पिंजून काढला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेससह काँग्र्रेस व शिवसेनेतील नाराज गट आपल्याकडे खेचण्यासाठी त्यांनी व्यूहरचना केली आहे. आमदार विनय कोरे यांनी त्यांच्यासाठी ताकद लावली असली तरी पाच वर्षांत त्यांचे बहुतांशी कार्यकर्ते बाजूला गेल्याने गगनबावडा, पन्हाळ्यात किती पाठबळ मिळते यावरच येथील मताधिक्य राहणार आहे. आमदार नरके यांनीही ‘गाव तिथे विकासकाम’ पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. २०५ कोटींची विकासकामे केल्या दावा करत मतदारांशी थेट संपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. लोकसभेला त्यांनी एकाकी झुंज देत संजय मंडलिक यांना ८६ हजार मतदान दिले, हे विसरता येणार नाही. हे जरी खरे असले तरी ही निवडणूक त्यांना तितकीशी सोपीही नाही. ‘कुंभी’ कारखान्याचे राजकारण, पाच वर्षांत या ना त्या कारणाने नाराजांची संख्याही वाढली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांची भूमिका व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष के. एस. चौगले यांची संभाव्य बंडखोरी आमदार नरके यांची डोकेदुखी ठरणार आहे. गेल्या निवडणुकीतील चुका सुधारत पी. एन. पाटील यांनी मतदारसंघात राबता ठेवला आहे. पन्हाळा, गगनबावड्यात स्वत:चे गट निर्माण करत जुन्या करवीरमध्ये काही पॅचवर्क केले आहे. गेल्यावेळेला गगनबावडा तालुका, परिते व सडोली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघांत चांगले मताधिक्य मिळाले होते. पण यावेळी गगनबावड्यासह जुन्या सांगरुळमधील परिस्थिती काहीशी वेगळी आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘भोगावती’ च्या माध्यमातून राष्ट्रवादीला अंगावर घेतल्याने पाटील यांच्यासमोरील अडचणी वाढू शकतात. के. एस. चौगले व ‘मनसे’चे अमित पाटील यांनीही तयारी सुरू केली आहे. चौगले यांनी गाठीभेटी सुरू केल्या आहेत. एकंदरीत सूर्यवंशी यांच्या उमेदवारीचा आपणालाच फायदा होणार, असा दावा पाटील व नरके गटाच्यावतीने होत आहे पण सूर्यवंशी यांनी घेतलेली मेहनत व आखलेले आडाखे पाहता पाटील व नरके यांना विजयी तितकासा सोपाही नाही. पन्हाळा-करवीरचे राजकारण उफाळणारगेल्यावेळी पन्हाळा तालुक्यातून पी. एन. पाटील यांना मतदान झाले नसून तालुक्यातील म्हणून नरके यांच्या पाठीशी पन्हाळ्यातील मतदार राहिल्याचा उघड आरोप काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत. त्याची चर्चाही जोरात सुरू असून शेवटच्या टप्प्यात पन्हाळा-करवीर हा प्रचार जोरात राहण्याची शक्यता आहे. ‘पी. एन.’ यांचा मेळाव्यावर, तर नरके-सूर्यवंशी यांचा थेट संपर्कावर भर शिवसेनांतर्गत कुरघोडी नरकेंची डोकेदुखी ठरणार २००९चे मताधिक्यमतदार संघचंद्रदीप नरकेपी. एन. पाटीलजुना सांगरूळ--१६,५४६जुना करवीर १२,८०८-पन्हाळा१२,८९३-गगनबावडा-३,३४२