शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सहकार चळवळ मोडून काढण्याचा डाव

By admin | Updated: August 20, 2015 23:08 IST

सुनील तटकरे : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर १४ सप्टेंबरपासून ‘जेल भरो’ आंदोलन

कोल्हापूर : राज्यातील भाजपचे सरकार हे शेतकरीविरोधी असून, सहकार चळवळ मोडून काढणे हाच कार्यक्रम घेऊन ते काम करीत आहे, असा घणाघाती आरोप गुरुवारी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. या बहिऱ्या सरकारविरोधात आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.तटकरे म्हणाले, दहा महिन्यांपूर्वी राज्यात परिवर्तन होऊन १५ वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसवर विरोधात बसण्याची वेळ आली आहे. विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर खचून न जाता पुन्हा नव्याने संघटना बांधण्यासाठी आपण राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यात गाव आणि शहरातील पक्षाचे केडर मजबूत करण्याचा प्रयत्न राहणार आहे.राज्यातील भाजप सरकार शेतकरीविरोधी असून, सहकारी चळवळ मोडून काढण्याचा कार्यक्रम घेऊन ते काम करीत आहे. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कार्यक्रम हाती घेऊन आंदोलन करणार आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण येथील शेतीविषयक व सामाजिक प्रश्न वेगवेगळे आहेत. ते समजून घेऊन पुढील दिशा ठरविली जाणार आहे. १४ व १५ सप्टेंबरला उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली या ठिकाणी ‘जेल भरो’ आंदोलन केले जाईल. गेल्या काही वर्षांत भाजपने राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. सरकारने ‘एसीबी’च्या माध्यमातून चौकशीही सुरू केली आहे. त्या चौकशीचे राष्ट्रवादीने स्वागत केले असून, सत्य काय आहे ते समोर येऊ दे, अशी पक्षाची भूमिका आहे. या चौकशीला सर्वच नेते सहकार्य करीत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना पक्षातून निलंबित केले आहे. पक्षाने त्यांना चांगल्या हेतूने मागासवर्गीय महामंडळावर संधी देऊन त्यांच्यावर विश्वास दाखविला. त्याला कदम यांनी छेद दिला. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. पक्ष कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेची भूमिका दुटप्पीसरकारमध्ये राहायचे आणि सरकारविरोधी भूमिका घ्यायची, अशी शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे, अशी टीका तटकरे यांनी केली. हिंमत असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचे धाडस दाखवावे, असे आव्हानही तटकरे यांनी दिले.