शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

जिल्हाधिकाऱ्यांचे कामकाज पहाटे तीनपर्यंत; फायलींचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:26 IST

समीर देशपांडे-लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सध्या जिल्हाधिकारी कार्यालयातील दिवे पहाटे तीनपर्यंत सुरू ...

समीर देशपांडे-लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : सध्या जिल्हाधिकारी कार्यालयातील दिवे पहाटे तीनपर्यंत सुरू असलेले पाहावयास मिळत आहेत. नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखाराव यांनी कोरोना, महापूर यांमुळे प्रलंबित असलेल्या फायलींचा निपटारा करण्यासाठी रात्रीचा दिवस करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मात्र कुचंबणा होत आहे. एकीकडे त्यांच्या गतिमान कारभाराची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे अनेकदा ते समोरील व्यक्तींचा सन्मान ठेवत नाहीत, अशीही तक्रार आहे.

शुक्रवारी (दि. १३) समाजकल्याण विभागाची ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात आणि ओळखपत्र देण्याबाबतच्या समितीची बैठक सायंकाळी साडेसहा वाजता सुरू झाली. बैठकीमध्ये ऊसतोड कामगारांच्या सामाजिक, आर्थिक, आरोग्यविषयक आणि त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक बाबींवर समग्र चर्चा झाली. ही बैठक रात्री नऊ वाजता संपली. जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीचे इतिवृत्त, आवश्यक तो पत्रव्यवहार, अर्जाचे नमुने आणि तत्सम दस्तऐवज आत्ताच तयार करा, अशा सूचना केल्या. सामाजिक न्याय विभागाचे साहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी निरीक्षक नाईक, सुभाष पवार यांचे सहकार्य घेतले आणि रात्री १० वाजता कागदपत्रे तयार झाली. लोंढे यांनी रात्री दोन वाजता कुठे येऊ अशी व्हॉटस‌्ॲपवरून विचारणा केली. रेखाराव यांनी त्यांना रात्री दोन वाजताच जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावले. कागदपत्रे पाहिली, किरकोळ दुरुस्त्या केल्या आणि पहाटे २ वाजून ५५ मिनिटांनी त्यांनी सह्या केल्या.

दौलत देसाई यांच्या जागी आलेल्या रेखाराव यांनी १३ जुलैला कार्यभार स्वीकारला. त्यानंतर लगेचच जिल्ह्यात महापूर आला. जिल्हाधिकारी कार्यालयच जिल्हा परिषदेत हलवावे लागले. याच दरम्यान त्यांनी रात्री दोन वाजता उजळाईवाडी विमानतळावर धाव घेऊन तेथील पाहणी केली होती. पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबण्यास सुरुवात केली आहे. देसाई हे रजेवर गेल्यानंतर अनेक फायलींवर निर्णय झालेला नव्हता. त्यानंतर तातडीची नाहीत म्हणूनही अनेक प्रकरणांबाबत निर्णय होत नव्हता.

चौकट

हेपण आक्षेपार्हच...!

रेखाराव यांची ही कामाची पद्धती गतिमान असली तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकेरी बोलावणे, माध्यम प्रतिनिधी, छायाचित्रकार यांचा अपमान करणे यांसारख्या त्यांच्या गोष्टी समर्थनीय नाहीत. आपण जसे काम करतो तसेच इतरांनीही करावे, यासाठीचा अतिरेकी अट्टहास धरण्याचीही आता वेगळी चर्चा सुरू आहे.