शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
4
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
5
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
6
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
7
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
8
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
9
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
10
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
11
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
12
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
13
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
14
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
15
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
16
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
17
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
19
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
20
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

जिल्हाधिकाऱ्यांचे कामकाज पहाटे तीनपर्यंत; फायलींचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:26 IST

समीर देशपांडे-लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सध्या जिल्हाधिकारी कार्यालयातील दिवे पहाटे तीनपर्यंत सुरू ...

समीर देशपांडे-लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : सध्या जिल्हाधिकारी कार्यालयातील दिवे पहाटे तीनपर्यंत सुरू असलेले पाहावयास मिळत आहेत. नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखाराव यांनी कोरोना, महापूर यांमुळे प्रलंबित असलेल्या फायलींचा निपटारा करण्यासाठी रात्रीचा दिवस करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मात्र कुचंबणा होत आहे. एकीकडे त्यांच्या गतिमान कारभाराची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे अनेकदा ते समोरील व्यक्तींचा सन्मान ठेवत नाहीत, अशीही तक्रार आहे.

शुक्रवारी (दि. १३) समाजकल्याण विभागाची ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात आणि ओळखपत्र देण्याबाबतच्या समितीची बैठक सायंकाळी साडेसहा वाजता सुरू झाली. बैठकीमध्ये ऊसतोड कामगारांच्या सामाजिक, आर्थिक, आरोग्यविषयक आणि त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक बाबींवर समग्र चर्चा झाली. ही बैठक रात्री नऊ वाजता संपली. जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीचे इतिवृत्त, आवश्यक तो पत्रव्यवहार, अर्जाचे नमुने आणि तत्सम दस्तऐवज आत्ताच तयार करा, अशा सूचना केल्या. सामाजिक न्याय विभागाचे साहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी निरीक्षक नाईक, सुभाष पवार यांचे सहकार्य घेतले आणि रात्री १० वाजता कागदपत्रे तयार झाली. लोंढे यांनी रात्री दोन वाजता कुठे येऊ अशी व्हॉटस‌्ॲपवरून विचारणा केली. रेखाराव यांनी त्यांना रात्री दोन वाजताच जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावले. कागदपत्रे पाहिली, किरकोळ दुरुस्त्या केल्या आणि पहाटे २ वाजून ५५ मिनिटांनी त्यांनी सह्या केल्या.

दौलत देसाई यांच्या जागी आलेल्या रेखाराव यांनी १३ जुलैला कार्यभार स्वीकारला. त्यानंतर लगेचच जिल्ह्यात महापूर आला. जिल्हाधिकारी कार्यालयच जिल्हा परिषदेत हलवावे लागले. याच दरम्यान त्यांनी रात्री दोन वाजता उजळाईवाडी विमानतळावर धाव घेऊन तेथील पाहणी केली होती. पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबण्यास सुरुवात केली आहे. देसाई हे रजेवर गेल्यानंतर अनेक फायलींवर निर्णय झालेला नव्हता. त्यानंतर तातडीची नाहीत म्हणूनही अनेक प्रकरणांबाबत निर्णय होत नव्हता.

चौकट

हेपण आक्षेपार्हच...!

रेखाराव यांची ही कामाची पद्धती गतिमान असली तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकेरी बोलावणे, माध्यम प्रतिनिधी, छायाचित्रकार यांचा अपमान करणे यांसारख्या त्यांच्या गोष्टी समर्थनीय नाहीत. आपण जसे काम करतो तसेच इतरांनीही करावे, यासाठीचा अतिरेकी अट्टहास धरण्याचीही आता वेगळी चर्चा सुरू आहे.