शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

जिल्हाधिकारी अमित सैनींनी कार्यभार स्वीकारला

By admin | Updated: April 25, 2015 00:44 IST

राजाराम माने यांनी दिल्या सैनी यांना शुभेच्छा

कोल्हापूर : नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. अमित सैनी यांनी शुक्रवारी सायंकाळी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आणि प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली. यावेळी मावळते जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी सैनी यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. अमित सैनी शुक्रवारी कोल्हापुरात पोहोचले. मात्र, राज्यपाल सी. विद्याशंकर राव यांचा दौरा असल्याने मावळते जिल्हाधिकारी राजाराम माने दुपारी साडेतीनपर्यंत त्यांच्या दौऱ्यात होते. त्यामुळे सायंकाळी सव्वापाच वाजता राजाराम माने त्यांच्या कार्यालयात पोहोचले. पाठोपाठ नवे जिल्हाधिकारी डॉ. सैनीही पोहोचले. त्यांनी रितसर कार्यभार स्वीकारल्यानंतर माने कार्यालयातून बाहेर पडले. जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारताच डॉ. सैनी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील कामाचा आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, करवीरचे प्रांत प्रशांत पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) किरण कुलकर्णी, तहसीलदार डॉ. योगेश खरमाटे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संगीता चौगुले, आदी उपस्थित होते. डॉ. अमित सैनी यांनी ९ एप्रिलला कार्यभार स्वीकारला होता. परंतु, निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे सामान्य प्रशासन विभागाने जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतरच कार्यभार स्वीकारावा, असे सांगितल्याने डॉ. सैनी यांना परत जावे लागले होेते. गुरुवारी ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्यानंतर सैनी यांनी कार्यभार स्वीकारला. (प्रतिनिधी)