शहरं
Join us  
Trending Stories
1
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
2
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
3
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
4
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
5
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
6
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
7
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
8
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
9
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
10
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
11
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
12
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
13
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
14
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
15
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
16
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
17
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
18
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
19
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
20
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर

अडीच लाख मूर्ती, पाचशे टन निर्माल्याचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:30 IST

कोल्हापूर : सहा वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ उपक्रमाने आता ...

कोल्हापूर : सहा वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ उपक्रमाने आता गावागावांतून चांगलेच बळ मिळू लागले आहे. आपलेच जलस्त्रोत आता सुरक्षित ठेवले पाहिजेत याची जाणीव झालेल्या ग्रामस्थांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे यंदा २ लाख ४२ हजार १९१ मूर्ती संकलन तर सुमारे ५०० टन निर्माल्य संकलन झाले. २९०८ मूर्तींचे घरीच विर्सजन करण्यात आले.

पंचगंगा प्रदूषणमुक्ती तसेच जिल्ह्यातील जलस्त्रोत प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या हेतूने २०१५ पासून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून यावर्षी ही जिल्ह्यातील सर्व गावांनी यामध्ये सहभाग घेऊन उपक्रम यशस्वी केला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी या उपक्रमामध्ये सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले होते. ग्रामस्थांचा जास्तीत जास्त सक्रिय सहभाग घेण्यासाठी जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्य तसेच तालुक्यातील सर्व सभापती यांना आवाहनपत्र देण्यात आली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी यासाठी बाराही तालुक्यात मुख्यालयातील विभागप्रमुखांची नेमणूक केली होती. पाणी आणि स्वच्छता विभागाच्यावतीने प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे यांनी उपक्रमाचे नियोजन केले.

चौकट

तालुकावार मूर्ती संकलन

आजरा १४,५०२, भुदरगड २१,०९०, च्ंदगड १२,०४७, गडहिंग्लज २१, ५७५, गगनबावडा १,८८५, हातकणंगले २३,७२९, कागल २८,७२८,करवीर ४७,४६०,पन्हाळा २४,४२९, राधानगरी १६,१७३, शाहूवाडी १६,१७३, शिरोळ १३,४५८

चौकट

कोल्हापूर जिल्हा परिषदेने सुरू केलेला हा पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रम आता चांगला रूजला आहे. एखादी भूमिका पटल्यानंतर ग्रामस्थांनी दिलेला हा प्रतिसाद नक्कीच उत्साह वाढवणारा आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि अधिकारी, कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत.

संजयसिंह चव्हाण

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर

१५०९२०२१ कोल राहूल पाटील

जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांनी सडोली खालसा येथे काहिलीत मूर्ती विसर्जन केले.

१५०९२०२१ कोल संजयसिंह चव्हाण

मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी टोप येथे काहिलीत गणेशमूर्तीचे विसर्जन केले.