शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बंदोबस्तात साखर कारखान्यांचे गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 01:06 IST

कोल्हापूर : ‘एफआरपी’चे तुकडे पाडल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, त्यांनी कारखान्यांची शेती कार्यालये लक्ष्य केली आहेत. या ...

कोल्हापूर : ‘एफआरपी’चे तुकडे पाडल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, त्यांनी कारखान्यांची शेती कार्यालये लक्ष्य केली आहेत. या कार्यालयांची फोडाफोडी सुरू असल्याने, कारखान्यांनी पोलीस बंदोबस्तात गाळप सुरू केल्याने कारखान्यांना पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.साखरेचे दर आणि देय एफआरपी यांचा ताळमेळ बसत नाही. त्यात सरकारने मदतीसाठी हात वर केल्याने शुक्रवार (दि. ११) पासून कारखानदारांनी प्रतिटन २३०० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यास सुरुवात केली. त्यानंतर एकरकमी ‘एफआरपी’साठी आग्रही असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आणि आंदोलनाने पेट घेतला. संघटनेने शनिवारी दिवसभर शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील विविध कारखान्यांच्या शेती कार्यालयांची तोडफोड व पेटवापेटवी सुरू केली. आंदोलन अधिक तीव्र करण्याचा संघटनेने इशारा दिल्याने रविवारी साखर कारखान्यांनी पोलीस बंदोबस्ताची ाागणी केली. त्यानुसार जिथे ‘स्वाभिमानी’चे प्रभावक्षेत्र आहे, तेथील कारखान्यांवर रविवारी सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक, दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पाच पोलीस उपअधीक्षक व कारखाना कार्यक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी ‘स्वाभिमानी’च्या आंदोलनावर लक्ष ठेवून आहेत. वायरलेसच्या माध्यमातून पोलीस यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले आहेत. पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील हे पोलीस कर्मचाºयांसह आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दालमिया शुगर्स येथे बंदोबस्तासाठी होते.तुटलेल्या उसाचे गाळप कराशेतकºयांसाठी आंदोलन सुरू असताना त्याचा फटका शेतकºयांनाच होऊ नये, याबाबत ‘स्वाभिमानी’ दक्ष आहे. तुटलेला ऊस शेतात पडून वाळू नये, त्याचे गाळप करू द्या, अशा सूचना संघटनेच्या वतीने कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.