शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पोलीस बंदोबस्तात साखर कारखान्यांचे गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 01:06 IST

कोल्हापूर : ‘एफआरपी’चे तुकडे पाडल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, त्यांनी कारखान्यांची शेती कार्यालये लक्ष्य केली आहेत. या ...

कोल्हापूर : ‘एफआरपी’चे तुकडे पाडल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, त्यांनी कारखान्यांची शेती कार्यालये लक्ष्य केली आहेत. या कार्यालयांची फोडाफोडी सुरू असल्याने, कारखान्यांनी पोलीस बंदोबस्तात गाळप सुरू केल्याने कारखान्यांना पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.साखरेचे दर आणि देय एफआरपी यांचा ताळमेळ बसत नाही. त्यात सरकारने मदतीसाठी हात वर केल्याने शुक्रवार (दि. ११) पासून कारखानदारांनी प्रतिटन २३०० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यास सुरुवात केली. त्यानंतर एकरकमी ‘एफआरपी’साठी आग्रही असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आणि आंदोलनाने पेट घेतला. संघटनेने शनिवारी दिवसभर शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील विविध कारखान्यांच्या शेती कार्यालयांची तोडफोड व पेटवापेटवी सुरू केली. आंदोलन अधिक तीव्र करण्याचा संघटनेने इशारा दिल्याने रविवारी साखर कारखान्यांनी पोलीस बंदोबस्ताची ाागणी केली. त्यानुसार जिथे ‘स्वाभिमानी’चे प्रभावक्षेत्र आहे, तेथील कारखान्यांवर रविवारी सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक, दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पाच पोलीस उपअधीक्षक व कारखाना कार्यक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी ‘स्वाभिमानी’च्या आंदोलनावर लक्ष ठेवून आहेत. वायरलेसच्या माध्यमातून पोलीस यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले आहेत. पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील हे पोलीस कर्मचाºयांसह आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दालमिया शुगर्स येथे बंदोबस्तासाठी होते.तुटलेल्या उसाचे गाळप कराशेतकºयांसाठी आंदोलन सुरू असताना त्याचा फटका शेतकºयांनाच होऊ नये, याबाबत ‘स्वाभिमानी’ दक्ष आहे. तुटलेला ऊस शेतात पडून वाळू नये, त्याचे गाळप करू द्या, अशा सूचना संघटनेच्या वतीने कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.