शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

थंडी होणार गायब, पुन्हा बरसणार पावसाच्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2021 14:29 IST

दिवाळीनंतर आला थंडीचा महिना म्हणत भरलेली हुडहुडी कोल्हापूरकरांसाठी ठरली क्षणिक. शनिवारपासून पावसाचा अंदाज

कोल्हापूर : दिवाळीनंतर आला थंडीचा महिना म्हणत भरलेली हुडहुडी कोल्हापूरकरांसाठी क्षणिक ठरली आहे. दोन दिवस थंडीचा अनुभव घेत नाही, तोवर पुन्हा एकदा पावसाचे ढग दाटू लागले आहेत. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या चक्रीवादळामुळे दक्षिण भारतात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून, कोल्हापुरातही शनिवारपासून (दि. १३) आठवडाभर पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

गेल्या चार दिवसांपासून थंडीचे आगमन झाले आहे. मध्यरात्री तापमान खाली जात असून, पहाटे तर चांगलीच हुडहुडी भरत आहे. दोन दिवसापासून तर कडाका जास्तच वाढला होता. दिवसभर अंगातील थंडीही जात नव्हती. गुरुवारी सकाळीही अशीच परिस्थिती होती; पण दुपारनंतर वातावरण एकदम पालटण्यास सुरुवात झाली. आभाळात ढगांची दाटी सुरू झाली. उन्हाचा तडाखा नसला तरी त्यात गारवाही नव्हता. दमट वातावरणाचा अनुभव येत हाेता. दिवसाचे कमाल तापमानही ३० ते ३१ अंशावर गेले होते. रात्रीचे तापमान २० ते २१ अंश सेल्सिअसवर गेले. त्यामुळे थाेडी थंडी थोडा उष्मा असा संमिश्र अनुभव येत आहे.

दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उद्यापासूनच संपूर्ण आठवडा हा बऱ्यापैकी पावसाचाच असणार आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाले असल्याने परतीच्या पावसाने तडाखा देण्यास सुरुवात केली आहे. त्याचा फटका कोल्हापूरलाही बसणार आहे. आता गळीत हंगामाने जोर धरला आहे. त्यात पावसाने व्यत्यय आणला तर तोडणी कामावर परिणाम होणार आहे. सध्या खरिपातील भाताची काढणी अंतिम टप्प्यात आहे. हा पाऊस तसा नुकसानकारक असला तरी रब्बी पिकांसाठी मात्र महत्त्वाचा ठरणार आहे. जिरायती क्षेत्रावरील हरभरा, ज्वारीच्या पिकासाठी पावसाची नितांत गरज आहे. आडसाली ऊस लागवडीच्या वाढीसाठीदेखील हा पाऊस पोषक ठरणार आहे.