शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

‘आदर्श ग्राम’साठी जिल्ह्यातील आमदारांचा थंडा प्रतिसाद

By admin | Updated: September 12, 2015 00:50 IST

निम्म्या आमदारांनीच कळवली यादी : मुंबईच्या लटकेंकडून येळवण जुगाई दत्तक

प्रवीण देसाई -- कोल्हापूर  --केंद्र सरकारच्या ‘सांसद आदर्श ग्राम योजने’च्या धर्तीवर राज्यात ‘आमदार आदर्श ग्राम योजना’ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेला जिल्ह्यातील आमदारांकडून थंडा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. निम्म्या आमदारांनीच गावांची नावे कळविली आहेत. त्यातही काहींनी सर्व, तर काहींनी एकाच गावाचे नाव कळविले आहे.सांसद आदर्श ग्राम योजनेप्रमाणे राज्यात ‘आमदार आदर्श ग्राम योजना’ राबविण्यासंदर्भात शासनाने २० मे २०१५ ला अध्यादेश काढला. राज्याच्या ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांनी याबाबत संबंधितांना सूचनाही दिल्या आहेत. त्यानुसार १५ आॅगस्टपूर्वी आमदारांनी तीन गावांची नावे कळविणे अपेक्षित होते. याबाबत काहीच हालचाल न झाल्यामुळे आठवड्यापूर्वी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठक घेऊन यासंदर्भात उपस्थित आमदारांना आवाहन केले होते. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनीही गावांची नावे लवकरात लवकर कळविण्याची विनंती केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील सहा आमदारांनीच नावे कळविली आहेत. मुंबईचे शिवसेनेचे आमदार व शाहूवाडीचे सुपुत्र रमेश लटके यांनी शाहूवाडी तालुक्यातील येळवण जुगाई हे गाव निवडले आहे. त्यासंदर्भात जिल्हा नियोजन विभागाला त्यांनी पत्राद्वारे कळविले आहे. कोल्हापूर शहरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी हातकणंगले तालुक्यातील तासगावची निवड केली आहे.आमदारांनी एखादे गाव निवडले तर दुसऱ्या गावातील कार्यकर्ता आमचे गाव का निवडले नाही? अशी विचारणा करतो. त्यामुळे कुणाला सांभाळायचे आणि कुणाला दुखवायचे, अशी पंचाईत होते. कारण दोन महिन्यांहून अधिक काळ उलटला तरी जिल्ह्यातील निम्म्या आमदारांनीच जिल्हा नियोजन समितीकडे पत्राद्वारे त्यांनी निवडलेल्या गावांची नावे कळविली आहेत. त्यालाही पालकमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतरच गती आली आहे. आतापर्यंत सात आमदारांनी कळविलेल्या गावांची नावे नियोजन समितीकडून राज्याच्या ग्रामविकास विभागाला कळविल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. आमदारांनी निवडलेली गावेशिरोळचे आमदार उल्हास पाटील यांनी शिरोळ तालुक्यातील निमशिरगांव, बुबनाळ, घालवाड ही गावे निवडली आहेत. इचलकरंजीचे आ. सुरेश हाळवणकर यांनी चंदूर (ता. हातकणंगले), गडहिंग्लजच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी तेरणी (ता. गडहिंग्लज), कुरणी (ता. चंदगड), हत्तीवडे (ता. आजरा), हातकणंगलेचे आ. डॉ. सुजित मिणचेकर यांनी किणी, लक्ष्मीवाडी व माणगाव (ता. हातकणंगले), कोल्हापूर उत्तरचे आ. राजेश क्षीरसागर यांनी तासगाव (ता. हातकणंगले), राधानगरी-भुदरगडचे आ. प्रकाश आबिटकर यांनी धामोड (ता. राधानगरी), मुंबईचे आ. रमेश लटके यांनी येळवण जुगाई (ता. शाहूवाडी). आमदारांकडून सावध पावले...एका बाजूला विधानसभा मतदारसंघातील गावांची संख्या जास्त, त्यातील तीनच गावे निवडायची आणि त्याचा विकासही या योजनेसाठी कोणताही स्वतंत्र निधी नसल्याने आपल्याला मिळणाऱ्या आमदार निधीतूनच करायचा. त्यामुळे ही गावे निवडताना ती अनिच्छेनेच निवडली आहेत काय? असे एकंदरीत परिस्थितीवरून दिसत आहे. गाव निवडताना समतोल राखताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. एखादे गाव निवडले तर दुसऱ्या गावातील कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमदारांकडून सावध पावले उचलली जात असल्याचे दिसत आहे.