शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘आदर्श ग्राम’साठी जिल्ह्यातील आमदारांचा थंडा प्रतिसाद

By admin | Updated: September 12, 2015 00:50 IST

निम्म्या आमदारांनीच कळवली यादी : मुंबईच्या लटकेंकडून येळवण जुगाई दत्तक

प्रवीण देसाई -- कोल्हापूर  --केंद्र सरकारच्या ‘सांसद आदर्श ग्राम योजने’च्या धर्तीवर राज्यात ‘आमदार आदर्श ग्राम योजना’ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेला जिल्ह्यातील आमदारांकडून थंडा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. निम्म्या आमदारांनीच गावांची नावे कळविली आहेत. त्यातही काहींनी सर्व, तर काहींनी एकाच गावाचे नाव कळविले आहे.सांसद आदर्श ग्राम योजनेप्रमाणे राज्यात ‘आमदार आदर्श ग्राम योजना’ राबविण्यासंदर्भात शासनाने २० मे २०१५ ला अध्यादेश काढला. राज्याच्या ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांनी याबाबत संबंधितांना सूचनाही दिल्या आहेत. त्यानुसार १५ आॅगस्टपूर्वी आमदारांनी तीन गावांची नावे कळविणे अपेक्षित होते. याबाबत काहीच हालचाल न झाल्यामुळे आठवड्यापूर्वी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठक घेऊन यासंदर्भात उपस्थित आमदारांना आवाहन केले होते. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनीही गावांची नावे लवकरात लवकर कळविण्याची विनंती केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील सहा आमदारांनीच नावे कळविली आहेत. मुंबईचे शिवसेनेचे आमदार व शाहूवाडीचे सुपुत्र रमेश लटके यांनी शाहूवाडी तालुक्यातील येळवण जुगाई हे गाव निवडले आहे. त्यासंदर्भात जिल्हा नियोजन विभागाला त्यांनी पत्राद्वारे कळविले आहे. कोल्हापूर शहरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी हातकणंगले तालुक्यातील तासगावची निवड केली आहे.आमदारांनी एखादे गाव निवडले तर दुसऱ्या गावातील कार्यकर्ता आमचे गाव का निवडले नाही? अशी विचारणा करतो. त्यामुळे कुणाला सांभाळायचे आणि कुणाला दुखवायचे, अशी पंचाईत होते. कारण दोन महिन्यांहून अधिक काळ उलटला तरी जिल्ह्यातील निम्म्या आमदारांनीच जिल्हा नियोजन समितीकडे पत्राद्वारे त्यांनी निवडलेल्या गावांची नावे कळविली आहेत. त्यालाही पालकमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतरच गती आली आहे. आतापर्यंत सात आमदारांनी कळविलेल्या गावांची नावे नियोजन समितीकडून राज्याच्या ग्रामविकास विभागाला कळविल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. आमदारांनी निवडलेली गावेशिरोळचे आमदार उल्हास पाटील यांनी शिरोळ तालुक्यातील निमशिरगांव, बुबनाळ, घालवाड ही गावे निवडली आहेत. इचलकरंजीचे आ. सुरेश हाळवणकर यांनी चंदूर (ता. हातकणंगले), गडहिंग्लजच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी तेरणी (ता. गडहिंग्लज), कुरणी (ता. चंदगड), हत्तीवडे (ता. आजरा), हातकणंगलेचे आ. डॉ. सुजित मिणचेकर यांनी किणी, लक्ष्मीवाडी व माणगाव (ता. हातकणंगले), कोल्हापूर उत्तरचे आ. राजेश क्षीरसागर यांनी तासगाव (ता. हातकणंगले), राधानगरी-भुदरगडचे आ. प्रकाश आबिटकर यांनी धामोड (ता. राधानगरी), मुंबईचे आ. रमेश लटके यांनी येळवण जुगाई (ता. शाहूवाडी). आमदारांकडून सावध पावले...एका बाजूला विधानसभा मतदारसंघातील गावांची संख्या जास्त, त्यातील तीनच गावे निवडायची आणि त्याचा विकासही या योजनेसाठी कोणताही स्वतंत्र निधी नसल्याने आपल्याला मिळणाऱ्या आमदार निधीतूनच करायचा. त्यामुळे ही गावे निवडताना ती अनिच्छेनेच निवडली आहेत काय? असे एकंदरीत परिस्थितीवरून दिसत आहे. गाव निवडताना समतोल राखताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. एखादे गाव निवडले तर दुसऱ्या गावातील कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमदारांकडून सावध पावले उचलली जात असल्याचे दिसत आहे.