शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘आदर्श ग्राम’साठी जिल्ह्यातील आमदारांचा थंडा प्रतिसाद

By admin | Updated: September 12, 2015 00:50 IST

निम्म्या आमदारांनीच कळवली यादी : मुंबईच्या लटकेंकडून येळवण जुगाई दत्तक

प्रवीण देसाई -- कोल्हापूर  --केंद्र सरकारच्या ‘सांसद आदर्श ग्राम योजने’च्या धर्तीवर राज्यात ‘आमदार आदर्श ग्राम योजना’ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेला जिल्ह्यातील आमदारांकडून थंडा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. निम्म्या आमदारांनीच गावांची नावे कळविली आहेत. त्यातही काहींनी सर्व, तर काहींनी एकाच गावाचे नाव कळविले आहे.सांसद आदर्श ग्राम योजनेप्रमाणे राज्यात ‘आमदार आदर्श ग्राम योजना’ राबविण्यासंदर्भात शासनाने २० मे २०१५ ला अध्यादेश काढला. राज्याच्या ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांनी याबाबत संबंधितांना सूचनाही दिल्या आहेत. त्यानुसार १५ आॅगस्टपूर्वी आमदारांनी तीन गावांची नावे कळविणे अपेक्षित होते. याबाबत काहीच हालचाल न झाल्यामुळे आठवड्यापूर्वी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठक घेऊन यासंदर्भात उपस्थित आमदारांना आवाहन केले होते. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनीही गावांची नावे लवकरात लवकर कळविण्याची विनंती केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील सहा आमदारांनीच नावे कळविली आहेत. मुंबईचे शिवसेनेचे आमदार व शाहूवाडीचे सुपुत्र रमेश लटके यांनी शाहूवाडी तालुक्यातील येळवण जुगाई हे गाव निवडले आहे. त्यासंदर्भात जिल्हा नियोजन विभागाला त्यांनी पत्राद्वारे कळविले आहे. कोल्हापूर शहरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी हातकणंगले तालुक्यातील तासगावची निवड केली आहे.आमदारांनी एखादे गाव निवडले तर दुसऱ्या गावातील कार्यकर्ता आमचे गाव का निवडले नाही? अशी विचारणा करतो. त्यामुळे कुणाला सांभाळायचे आणि कुणाला दुखवायचे, अशी पंचाईत होते. कारण दोन महिन्यांहून अधिक काळ उलटला तरी जिल्ह्यातील निम्म्या आमदारांनीच जिल्हा नियोजन समितीकडे पत्राद्वारे त्यांनी निवडलेल्या गावांची नावे कळविली आहेत. त्यालाही पालकमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतरच गती आली आहे. आतापर्यंत सात आमदारांनी कळविलेल्या गावांची नावे नियोजन समितीकडून राज्याच्या ग्रामविकास विभागाला कळविल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. आमदारांनी निवडलेली गावेशिरोळचे आमदार उल्हास पाटील यांनी शिरोळ तालुक्यातील निमशिरगांव, बुबनाळ, घालवाड ही गावे निवडली आहेत. इचलकरंजीचे आ. सुरेश हाळवणकर यांनी चंदूर (ता. हातकणंगले), गडहिंग्लजच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी तेरणी (ता. गडहिंग्लज), कुरणी (ता. चंदगड), हत्तीवडे (ता. आजरा), हातकणंगलेचे आ. डॉ. सुजित मिणचेकर यांनी किणी, लक्ष्मीवाडी व माणगाव (ता. हातकणंगले), कोल्हापूर उत्तरचे आ. राजेश क्षीरसागर यांनी तासगाव (ता. हातकणंगले), राधानगरी-भुदरगडचे आ. प्रकाश आबिटकर यांनी धामोड (ता. राधानगरी), मुंबईचे आ. रमेश लटके यांनी येळवण जुगाई (ता. शाहूवाडी). आमदारांकडून सावध पावले...एका बाजूला विधानसभा मतदारसंघातील गावांची संख्या जास्त, त्यातील तीनच गावे निवडायची आणि त्याचा विकासही या योजनेसाठी कोणताही स्वतंत्र निधी नसल्याने आपल्याला मिळणाऱ्या आमदार निधीतूनच करायचा. त्यामुळे ही गावे निवडताना ती अनिच्छेनेच निवडली आहेत काय? असे एकंदरीत परिस्थितीवरून दिसत आहे. गाव निवडताना समतोल राखताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. एखादे गाव निवडले तर दुसऱ्या गावातील कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमदारांकडून सावध पावले उचलली जात असल्याचे दिसत आहे.