शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘आदर्श ग्राम’साठी जिल्ह्यातील आमदारांचा थंडा प्रतिसाद

By admin | Updated: September 12, 2015 00:50 IST

निम्म्या आमदारांनीच कळवली यादी : मुंबईच्या लटकेंकडून येळवण जुगाई दत्तक

प्रवीण देसाई -- कोल्हापूर  --केंद्र सरकारच्या ‘सांसद आदर्श ग्राम योजने’च्या धर्तीवर राज्यात ‘आमदार आदर्श ग्राम योजना’ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेला जिल्ह्यातील आमदारांकडून थंडा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. निम्म्या आमदारांनीच गावांची नावे कळविली आहेत. त्यातही काहींनी सर्व, तर काहींनी एकाच गावाचे नाव कळविले आहे.सांसद आदर्श ग्राम योजनेप्रमाणे राज्यात ‘आमदार आदर्श ग्राम योजना’ राबविण्यासंदर्भात शासनाने २० मे २०१५ ला अध्यादेश काढला. राज्याच्या ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांनी याबाबत संबंधितांना सूचनाही दिल्या आहेत. त्यानुसार १५ आॅगस्टपूर्वी आमदारांनी तीन गावांची नावे कळविणे अपेक्षित होते. याबाबत काहीच हालचाल न झाल्यामुळे आठवड्यापूर्वी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठक घेऊन यासंदर्भात उपस्थित आमदारांना आवाहन केले होते. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनीही गावांची नावे लवकरात लवकर कळविण्याची विनंती केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील सहा आमदारांनीच नावे कळविली आहेत. मुंबईचे शिवसेनेचे आमदार व शाहूवाडीचे सुपुत्र रमेश लटके यांनी शाहूवाडी तालुक्यातील येळवण जुगाई हे गाव निवडले आहे. त्यासंदर्भात जिल्हा नियोजन विभागाला त्यांनी पत्राद्वारे कळविले आहे. कोल्हापूर शहरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी हातकणंगले तालुक्यातील तासगावची निवड केली आहे.आमदारांनी एखादे गाव निवडले तर दुसऱ्या गावातील कार्यकर्ता आमचे गाव का निवडले नाही? अशी विचारणा करतो. त्यामुळे कुणाला सांभाळायचे आणि कुणाला दुखवायचे, अशी पंचाईत होते. कारण दोन महिन्यांहून अधिक काळ उलटला तरी जिल्ह्यातील निम्म्या आमदारांनीच जिल्हा नियोजन समितीकडे पत्राद्वारे त्यांनी निवडलेल्या गावांची नावे कळविली आहेत. त्यालाही पालकमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतरच गती आली आहे. आतापर्यंत सात आमदारांनी कळविलेल्या गावांची नावे नियोजन समितीकडून राज्याच्या ग्रामविकास विभागाला कळविल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. आमदारांनी निवडलेली गावेशिरोळचे आमदार उल्हास पाटील यांनी शिरोळ तालुक्यातील निमशिरगांव, बुबनाळ, घालवाड ही गावे निवडली आहेत. इचलकरंजीचे आ. सुरेश हाळवणकर यांनी चंदूर (ता. हातकणंगले), गडहिंग्लजच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी तेरणी (ता. गडहिंग्लज), कुरणी (ता. चंदगड), हत्तीवडे (ता. आजरा), हातकणंगलेचे आ. डॉ. सुजित मिणचेकर यांनी किणी, लक्ष्मीवाडी व माणगाव (ता. हातकणंगले), कोल्हापूर उत्तरचे आ. राजेश क्षीरसागर यांनी तासगाव (ता. हातकणंगले), राधानगरी-भुदरगडचे आ. प्रकाश आबिटकर यांनी धामोड (ता. राधानगरी), मुंबईचे आ. रमेश लटके यांनी येळवण जुगाई (ता. शाहूवाडी). आमदारांकडून सावध पावले...एका बाजूला विधानसभा मतदारसंघातील गावांची संख्या जास्त, त्यातील तीनच गावे निवडायची आणि त्याचा विकासही या योजनेसाठी कोणताही स्वतंत्र निधी नसल्याने आपल्याला मिळणाऱ्या आमदार निधीतूनच करायचा. त्यामुळे ही गावे निवडताना ती अनिच्छेनेच निवडली आहेत काय? असे एकंदरीत परिस्थितीवरून दिसत आहे. गाव निवडताना समतोल राखताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. एखादे गाव निवडले तर दुसऱ्या गावातील कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमदारांकडून सावध पावले उचलली जात असल्याचे दिसत आहे.