शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

महाआघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटला

By admin | Updated: November 17, 2016 00:01 IST

निमित्त वाढदिवसाचे : रणशिंग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे

ज्योतीप्रसाद सावंत --आजरा --अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांचा वाढदिवस दणक्यात साजरा झाला. निमित्त वाढदिवसाचे असले तरी अशोकअण्णांसह व्यासपीठावरील मंडळींची भाषणे पाहिली असता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रचाराचा प्रारंभ झाला असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.गतसाली आजरा कारखान्याच्या जोडण्यांना अण्णांच्या वाढदिवसानेच सुरुवात झाली होती. यावर्षी समोर जि.प. व पं. स. निवडणूक आहे एवढाच फरक . जिल्हा बँक, आजरा कारखान्यातील यशानंतर महाआघाडीत चांगलेच चैतन्याचे वातावरण आहे. एकीकडे महाआघाडी जोरदार टक्कर देण्याच्या तयारीत असताना आजरा कारखान्याची सत्ता गेल्यामुळे विरोधक थोडेसे बॅकफूटवर आले आहेत. वास्तविक, साखर कारखाना निवडणूक व जि. प. व पं. स. निवडणुका यामध्ये बराच फरक आहे. सहकार आणि स्थानिक स्वराज्यचे मतदारही वेगळी गणिते; परंतु तीन महिन्यांपूर्वीच अशोकअण्णांनी जि. प. व पं. स. निवडणुकांचे रणशिंग फुंकून विरोधकांना इशारा दिला आहे. प्रचंड शक्तिप्रदर्शनाने आता इच्छुकांची संख्या वाढणार हे स्पष्ट आहे. महाआघाडीची सर्वपक्षीय मोट भक्कम झाली असताना राष्ट्रीय काँगे्रसची मात्र पडझड झाली आहे. राष्ट्रीय काँगे्रसमधील प्रमुख मंडळी ऐन निवडणुकीत व पक्षाच्या गरजेच्या वेळी पक्षविरोधकांच्या छावणीत दाखल होताना दिसतात. त्यामुळे पक्षाचे अधिकृत उमेदवारांची चांगलीच दमछाक होताना पहावयास मिळते. राष्ट्रवादीकडे बऱ्यापैकी सत्तास्थाने आहेत, पण कारखाना निवडणुकीनंतर या पक्षाचे वरिष्ठ प्रतिनिधी नेते तालुक्यात फिरकलेलेच नाहीत.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांपूर्वी काँगे्रस-राष्ट्रवादीने मरगळ झटकून नव्या जोमाने कामाला लागण्याची गरज आहे. अन्यथा आगामी निवडणुकांत उमेदवारीसाठी उमेदवार मिळतानाही अडचणी होणार आहेत. राष्ट्रवादीच्या जिल्हास्तरीय नेत्यांना पुन्हा एकवेळ अशोकअण्णांनी थेट आव्हान देण्यास सुरुवात केली आहे.माजी आमदार महादेवराव महाडिक, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, खासदार राजू शेट्टी, आदींनी त्यांना रसद पुरविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एकंदरच महाआघाडीच्या मागे मोठी ताकद उभी राहणार आहे. सर्व चित्र समोर असतानाही विरोधक याकडे सहज पाहत असतील तर तो केवळ आत्मघातकी निर्णय ठरल्याशिवाय राहणार नाही. कारखान्याची पुनरावृत्ती होणार की यावेळी काँगे्रस राष्ट्रवादी नव्याने राजकीय डावपेच आखणार यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून राहणार आहेत.