शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कोयना जलविद्युतचे पाणी दुष्काळी भागात वळवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 00:49 IST

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोयना जलविद्युत प्रकल्प व टाटा जलविद्युत प्रकल्प समूहातून वीज निर्मितीसाठी कृष्णा खोऱ्यातून विपुलतेच्या खोºयात म्हणजेच कोकणात वळविण्यात येणारे पाणी टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा शासन गांभीर्याने विचार करत आहे. हे पाणी पूर्वेकडील कृष्णा आणि भीमा खोºयातील दुष्काळी भागाकडे वळविण्यात येणार आहे.यासाठी उच्चस्तरीय अभ्यासगटाची जलसंपदा विभागाने गुरुवारी ...

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोयना जलविद्युत प्रकल्प व टाटा जलविद्युत प्रकल्प समूहातून वीज निर्मितीसाठी कृष्णा खोऱ्यातून विपुलतेच्या खोºयात म्हणजेच कोकणात वळविण्यात येणारे पाणी टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा शासन गांभीर्याने विचार करत आहे. हे पाणी पूर्वेकडील कृष्णा आणि भीमा खोºयातील दुष्काळी भागाकडे वळविण्यात येणार आहे.यासाठी उच्चस्तरीय अभ्यासगटाची जलसंपदा विभागाने गुरुवारी नियुक्ती केली. जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव अ. पां. भावे या अभ्यासगटाचे अध्यक्ष आहेत. या अभ्यासगटाने तीन महिन्यांत अहवाल द्यायचा आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पाद्वारे ६७.५ अघफू व टाटा जलविद्युत प्रकल्पाद्वारे सरासरी ४२.५० अब्ज घनफूट (अघफू) कृष्णा खोºयातील अनुक्रमे ऊर्ध्व कृष्णा व ऊर्ध्व भीमा या उपखोºयातील पाणी विद्युत निर्मिती करून पश्चिमेकडे कोकणात वळविण्यात येते. कृष्णा पाणी तंटा लवादाने प्रति जलवर्षाकरिता खोºयाबाहेर पाणी वळविण्यासाठी सरासरी व महत्तम मर्यादा ठरवून दिली आहे. राज्य जलनीतीनुसार पिण्याचे पाणी व सिंचनाबाबत पाणी वापराचा प्राधान्यक्रम जलविद्युतच्या वर आहे. शिवाय अन्य विविध पर्यायांद्वारे वीज उपलब्ध करणे शक्य असल्याने कृष्णा खोºयातील पाण्याची वाढती मागणी विचारात घेता कोकणाकडे वळविलेल्या पाण्याबाबत फेरअभ्यास करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.विशेषत : टाटा जलविद्युत प्रकल्पातून वळविण्यात येणारे पाणी भीमा या तुटीच्या खोºयातील असून या खोºयातील बहुतांशी भाग अवर्षणग्रस्त आहे. वाढत्या शहरीकरणामुळे व औद्योगिकीकरणामुळे, पिण्याच्या व औद्योगिक वापरासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची मागणी आहे. सिंचनासाठीही या प्रदेशात पाण्याची गरज आहे.असा आहे अभ्यासगटजलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव अ. पां. भावे हे या अभ्यासगटाचे अध्यक्ष असतील. सदस्यांमध्ये जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव श्रीकांत हुद्दार, निवृत्त सहसंचालक दि.मा.मोरे, जलविद्युत प्रकल्प व गुणनियंत्रण पुणेचे मुख्य अभियंता, पुणे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, कोकण प्रदेशचे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांनी नियुक्त केलेला महाजनकोचा प्रतिनिधी, टाटा पॉवर कंपनीने नियुक्त केलेला प्रतिनिधी यांचा समावेश आहे. या गटाचे सदस्य सचिव म्हणून पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता हे काम पाहतील.अभ्यास गटाची कार्यकक्षा१) टाटा जलविद्युत प्रकल्पासाठी गेल्या ९० वर्षापासून मुळशी व इतर धरणांतून भीमा उपखोºयातील दरवर्षी अंदाजे ४२.५० टीएमएसी पाणी पश्चिमेकडे वीजनिर्मितीसाठी वळविण्यात येते.२) ऊर्ध्व भीमा हे तुटीचे उपखोरे असून बहुतांश भाग दुष्काळग्रस्त आहे. टाटा प्रकल्पासाठी वीज निर्मितीसाठी वळविण्यात येणारे पाणी कमी करून पूर्वेकडे मूळ ऊर्ध्व भीमा उपखोºयातच वळविण्याकरिता वर्षनिहाय टप्पे ठरविण्यात येणार आहेत.३) वीजनिर्मितीचे पाणी कमी करताना वीजनिर्मितीसाठी सध्याची निर्माण केलेली व्यवस्था जास्तीत जास्त कार्यक्षमतेने उपयोगात आणण्यासाठी काय बदल करावे लागतील याबाबत उपाययोजना सूचविणे४) या जलविद्युत प्रकल्पातील पाणी कोकणांत सिंचन, पिण्यासाठी व औद्योगिकरणासाठी वापरले जाते. हे पाणी कमी केल्यावर त्या प्रदेशात अडचण होऊ नये यासाठी उपाययोजना सुचविणे.५) या निर्णयामुळे काही कायदेशीर बाबी निर्माण होऊ शकतात का याविषयीचा अभ्यास करणे.