शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

साखरेच्या निर्यातीमध्ये सहकारी कारखान्यांची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:24 IST

नवी दिल्ली : देशात आतापर्यंत ४३ लाख टन साखर निर्यातीचे करार झाले असून यामध्ये सहकारी साखर कारखान्यांनी आघाडी ...

नवी दिल्ली : देशात आतापर्यंत ४३ लाख टन साखर निर्यातीचे करार झाले असून यामध्ये सहकारी साखर कारखान्यांनी आघाडी घेतली आहे. सहकारी साखर कारखान्यांकडून २२ लाख टन साखरेचे करार केल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली. यामध्ये विशेषतः महाराष्ट्रासह गुजरात व कर्नाटकातील सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे.

देशातील साखरेचा खप प्रतिवर्षी २५० ते २६० लाख टन इतका असतो आणि त्यात वार्षिक ४.१ टक्क्यांनी पूर्वी वाढ व्हायची; पण ती वाढ आता जवळपास शून्य टक्क्यावर आली आहे. गेल्यावर्षी ६ ते ८ लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी वळविण्यात आली तर यावर्षी त्याचे प्रमाण २० ते २५ लाख टन होणे अपेक्षित आहे. यासाठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या स्तरावर संबंधित केंद्रीय मंत्रालयाशी सतत पाठपुरावा करत आहे. केंद्र सरकारने ६० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्यावर सहा रुपये प्रति किलो निर्यात अनुदानही जाहीर करण्यात आले आहे.

साखरेच्या निर्यातीला आणखीन चालना देण्यासाठी देशाच्या पातळीवर २० लाख टनांचा अतिरिक्त कोटा दोन भागांत देण्याबाबत विचार सुरू असून तसे झाल्यास निर्यातीचा उच्चांक होईल, अशी आशा दांडेगावकर यांनी व्यक्त केली. मागणी नसल्याने कारखान्यांची गोदामे संख्येने तुडुंब भरली आहेत आणि त्यात अडकलेल्या रकमा व त्यावरील बँकांचे व्याज याच्या दुष्टचक्रात कारखानदारी अडकली आहे. हे चक्र मोडायचे असेल तर साखर निर्यात व इथेनॉल उत्पादन वाढविल्याशिवाय पर्याय नाही, याकडे दांडेगावकर यांनी लक्ष वेधले.