शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘रोड सेफ्टी बिला’च्या विरोधात आज बंद

By admin | Updated: April 30, 2015 00:22 IST

एक एस.टी. संघटना सहभागी : दोन संघटना कामावर; आठ रिक्षा संघटना निषेध करणार

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या ‘रोड ट्रान्स्पोर्ट आणि सेफ्टी बिल २०१४’ या नव्या कायद्याविरोधात आज, गुरुवारी एकदिवसीय देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. राज्यातील एस.टी. कामगार संघटनांनी या बंदमध्ये सहभाग घेतला आहे; तर राष्ट्रवादी एस. टी. कामगार, काँग्रेस व मनसे परिवहन सेनेच्यावतीने बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एक संघटना बंदमध्ये, तर दोन संघटना कामावर, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एस.टी. कामगार संघटना हा बंद आमचा संघटनेच्या कामगारांच्या पगारवाढीसाठी नाही, तर एस.टी. वाचविण्यासाठी आहे. रोड सेफ्टी बिलामुळे एस.टी.चे खासगीकरण होणार आहे. याचा फटका सामान्य जनतेला होणार आहे. याबाबत सामान्य लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा एकदिवसीय बंद पुकारलेला आहे. त्या ‘बंद’मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तीन हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे हा बंद यशस्वी करावा, असे आवाहन विभागीय अध्यक्ष उत्तम पाटील यांनी केले आहे. राष्ट्रवादी एस.टी. कामगार कॉँग्रेस संघटना केंद्र सरकारच्या प्रस्तावित वाहतूक धोरणाला आमचा विरोध आहे. मात्र, आज होणाऱ्या देशव्यापी संपामध्ये राष्ट्रवादी एस. टी. कामगार काँग्रेस संघटना सहभागी होणार नाही. प्रस्तावित वाहतूक धोरणाबाबत आम्ही पूर्वीच तीव्र विरोध दर्शविला आहे. मात्र, सध्या एस. टी. महामंडळाचा गर्दीचा हंगाम सुरू आहे. तरी संघटनेचे सर्व पदाधिकारी व सभासदांनी संपात सहभागी न होता प्रशासनास सर्वतोपरी मदत करावी, असे आवाहन राष्ट्रवादी एस. टी. कामगार काँग्रेसचे सचिव संजीव चिकुर्डेकर यांनी केले आहे. मनसे परिवहन सेना प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आम्ही संपात सहभागी होणार नाही. प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी ‘मनसे’च्या सर्व पदाधिकारी व सभासदांनी संपात सहभागी होऊ नये, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विजय करजगार यांनी केले आहे. (प्रतिनिधी)आठ रिक्षा संघटना बंदमध्ये नाहीतआज होणाऱ्या राज्यव्यापी रिक्षा, टॅक्सी बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय कोल्हापुरातील आठ रिक्षा संघटनांनी घेतला असून, केवळ केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटनासाठी देशभरातून दररोज हजारो प्रवासी कोल्हापुरात येतात. त्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये व रिक्षाचालकांचा व्यवसाय फक्त दोन महिनेच होतो. त्यामुळे चालकांचे आर्थिक नुकसान होऊ नये, याकरिता केवळ निषेध व्यक्त केला जाणार आहे, असे पत्रक कोल्हापूर जिल्हा आॅटो रिक्षा संघर्ष समितीच्यावतीने सुभाष शेटे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.