शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

लाडूचा प्रसाद बंद करा

By admin | Updated: March 2, 2016 00:44 IST

शिवसेनेची मागणी : विनाकारण चर्चा थांबविण्याचे आवाहन

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या लाडवाच्या प्रसादावरून सध्या चर्चेला उधाण आले असून प्रसाद करण्यामागे सात्त्विकता, सेवेच्या नावाखाली बुंदी लाडू कुणी वळायचा, या मुद्द्यावरून प्रसिद्धी मिळविण्यासाठी सुरू असलेली धडपड ही देवीच्या प्रसादाच्या बाबतची नामुष्कीजनक बाब आहे. त्यामुळे हा लाडवाचा प्रसाद बंद करा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.खरंतर पुरातन काळापासून फुटाणे व खडी-साखर हा श्री अंबाबाईचा पारंपरिक प्रसाद असताना त्यामध्ये बदल करून कुणाच्या तरी सोयीसाठी जाणीवपूर्वक या पारंपरिक प्रसादाला फाटा देत लाडूचा प्रसाद ठरविण्याचा अट्टाहास कशासाठी. म्हणूनच सर्वप्रथम प्रसाद म्हणून लाडू हा बंद करावा, अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्यामुळे श्री अंबाबाईच्या नावाखाली सुरू असलेली स्वत:चा स्वार्थ साधणारी दुकानदारी आपोआपच बंद होईल.ऊठसूट कुणीही श्री अंबाबाईसंदर्भात विषय घ्यावयाचा पुढे १५ दिवस विनाकारण त्यावर चर्चा करायची थांबविली पाहिजे. कारण साधून कोल्हापूरची बदनामी होत आहे. वास्तविक, श्री अंबाबाई मंदिर व परिसरातील विकासाबाबत केवळ चर्चा करण्यापेक्षा त्यावर ठोस निर्णय होऊन त्याची त्वरित अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. मंदिर विकासाबाबत वर्षानुवर्षे सुरू असलेले हे चर्चेचे गुऱ्हाळ न थांबण्यास त्याची पूर्तता हे केवळ कोल्हापूरचे स्वप्नच बनत चालले आहे. हे स्वप्न सत्यात आणणे ही सर्व कोल्हापूरची गरज आहे.याचबरोबर मंदिर परिसरातील सुविधांमध्ये वाद व सुधारणा करणे जास्त गरजेचे आहे. मंदिर पावित्र्याच्या दृष्टिकोनातून मंदिराच्या तटबंदीला लागून असलेले चप्पल स्टँड अन्य ठिकाणी हलविणे गरजेचे आहे. मंदिरातील सुरक्षा व्यवस्थेचा उडालेला बोजवारा, मंदिर व परिसरात झालेले अतिक्रमण, भिकाऱ्यांचा परिसरातील सुरू असलेला उपद्रव याबाबतीत सर्वप्रथम प्राधान्याने सुधारणा करणे गरजेचे आहे.सुविधांची वानवापरिसरात सुविधांची वानवा असून त्या सुधारणा करणे गरजेचे आहे. कोणत्याही विषयावर वाद निर्माण न करता सुविधांबाबत आग्रही राहावे, अशी अपेक्षा शिवसेने व्यक्त केली आहे.