शहरं
Join us  
Trending Stories
1
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
2
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
3
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
4
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
5
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
6
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
7
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
8
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
9
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
10
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
11
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
12
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
13
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
14
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
15
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
16
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
17
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

पन्नास मतदारसंघांतून ‘घड्याळ’ गायब होणार--

By admin | Updated: January 22, 2017 00:38 IST

जिल्हा परिषद निवडणूक रणांगण--आघाडीच्या राजकारणाचा फटका--वीस ठिकाणी एकच इच्छुक--नेत्यांची सोय, पक्षाची गैरसोय

कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने स्वबळापेक्षा बहुतांश तालुक्यांत आघाडीच करण्याचा निर्णय घेतल्याने किमान ५० जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ चिन्ह गायब होणार आहे. आघाड्यांमुळे नेत्यांची सोय होणार असली तरी यात पक्षाचे मात्र नुकसान होणार आहे. निवडणुकीआधी तीन-चार महिने नेत्यांनी स्वबळाच्या कितीही डरकाळ्या फोडल्या तरी निवडणुकीच्या मैदानात खरे ‘बळ’ दिसत आहे. प्रत्यक्ष लढायचे झाल्यानंतर कागल, राधानगरी, भुदरगड वगळता नऊ तालुक्यांत दुसऱ्या पक्षाचा आधार घेतल्याशिवाय लढता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. शाहूवाडीत शिवसेनेशी, गगनबावड्यात कॉँग्रेससोबत, पन्हाळ्यात जनसुराज्य वगळून सगळ्यांशी, करवीरमध्ये शिवसेनेशी, हातकणंगलेत आवाडे गट व स्वाभिमानी सोडून, शिरोळमध्ये कॉँग्रेससोबत, गडहिंग्लज-चंदगडमध्ये भाजप, तर आजऱ्यामध्ये कॉँग्रेसशी आघाडी होणार, हे जवळपास निश्चित आहे. आघाडीच्या तडजोडीत जेवढ्या जागा पदरात पडणार तिथे पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभे करता आले असते; पण पक्षाच्या निरीक्षकांनीच आघाड्या केल्या तर ‘घड्याळ’ चिन्ह वापरता येणार नसल्याचा फतवा काढल्याने या नेत्यांना चांगलीच मोकळीक मिळाली आहे. कागल, भुदरगड, राधानगरी तालुक्यांत जिल्हा परिषदेचे १४ मतदारसंघ येतात. येथेच पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभे राहणार आहेत. त्याशिवाय इतर ठिकाणी तीन-चार उभे राहिले, तर १७ ते १८ पेक्षा अधिक ठिंकाणी पक्षाचे चिन्ह दिसणार नाही. त्यात पक्षाकडे मागणी केलेल्या इच्छुकांची संख्या पाहिली तर तब्बल २० जिल्हा परिषद मतदारसंघांत केवळ एक-एकच इच्छुक आहेत. सात ठिकाणी दोघा-दोघांनी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)एकच इच्छुक असलेले मतदारसंघचिखली - अर्चना विकास पाटील, गडमुडशिंगी - अश्विनी राजेंद्र वळिवडे, उजळाईवाडी - अरुणिमा सुनील माने, पाचगाव- सुरेखा शंकर सातपुते, सांगरूळ - अशोक घाडगे, तिसंगी - दिलीप पाटील, असळज- प्रकाश पाटील, कौलव- संजय कलिकते, राधानगरी- सविता राजाराम भाटले, कडगाव- सुनीता धनाजीराव देसाई, उत्तूर - वसंतराव धुरे, आजरा- जयवंत शिंपी, नेसरी - दीपक जाधव, तुर्केवाडी- रामराव गुडाजी, शित्तूर तर्फ वारुण- रणवीर गायकवाड, पिशवी- विजय बोरगे, रुकडी- वेदांतिका धैर्यशील माने, दानोळी- बेबीताई रावसाहेब भिलवडे, अब्दुललाट - मिथुन कोळी, यवलूज- सुप्रिया महेश पाटील. सिद्धनेर्ली, बड्याचीवाडीत मांदियाळी!कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली व गडहिंग्लजमधील बड्याचीवाडीतून प्रत्येकी आठजणांनी मागणी केली आहे. करवीरमधील परितेमधून तब्बल सहाजणांची मागणी आहे.