शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

स्वच्छतेची लोकचळवळ अधिक गतिमान व्हावी : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 13:49 IST

कोल्हापूर दि. 2 : स्वच्छतेत सातत्य ठेवून, स्वच्छता अभियानाची ही लोकचळवळ अधिक गतिमान व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वच्छ भारत अभियानांतर्गत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने हाती घेतलेली स्वच्छतेची मोहिम अतिशय उपयुक्त असून, यापुढील काळात प्रतिष्ठानच्यावतीने कचरा गोळा करण्याबरोबरच ओल्या आणि सुक्या कचऱ्याची निर्गती करण्यात पुढाकार घ्यावा.राष्ट्रपिता ...

ठळक मुद्देकचरा गोळा करण्याबरोबरच ओल्या आणि सुक्या कचऱ्याची निर्गती करण्यात पुढाकार घ्याराष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छ भारत अभियानांतर्गत मोहिम देशभर स्वच्छता अभियान हाती घेतल्याबद्दल डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानबद्दल समाधानमोहिमेत प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य, शासकीय अधिकारी, कर्मचारी सक्रीय

कोल्हापूर दि. 2 : स्वच्छतेत सातत्य ठेवून, स्वच्छता अभियानाची ही लोकचळवळ अधिक गतिमान व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वच्छ भारत अभियानांतर्गत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने हाती घेतलेली स्वच्छतेची मोहिम अतिशय उपयुक्त असून, यापुढील काळात प्रतिष्ठानच्यावतीने कचरा गोळा करण्याबरोबरच ओल्या आणि सुक्या कचऱ्याची निर्गती करण्यात पुढाकार घ्यावा.

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छ भारत अभियानांतर्गत रेवदंडा, जिल्हा अलिबाग येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्यावतीने आज कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात स्वच्छता मोहिम हाती घेवून कित्येक टन कचऱ्याची निर्गती करण्यात आली.

कोल्हापूरात या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर स्वच्छता मोहिम राबवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात या मोहिमेत निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी सचिन इथापे, डॉ. भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाचे प्रमुख राहुल चिकोडे, विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य, शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षापूर्वी स्वच्छ भारताचा संकल्प करुन संपूर्ण देशभर स्वच्छ भारत अभियान सुरु केले. या अभियानास देशवासियांचा उर्स्फुत प्रतिसाद लाभला असून, आज स्वच्छतेची ही व्यापक लोकचळवळ निर्माण झाली आहे.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने देशभर आज स्वच्छता अभियान हाती घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वच्छतेची संपूर्ण राज्यात लोकचळवळ बनली असून, या स्वच्छता अभियानात यापुढील काळातही सातत्य ठेवून, स्वच्छ महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यास सर्वांनी सक्रीय व्हावे. वैयक्तिक तसेच सार्वजनिक पातळीवरही स्वच्छतेमध्ये सर्वांनी पुढाकार घेवून स्वच्छतेची दीर्घकालीन मोहिम हाती घ्यावी.