शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

स्वच्छतेची लोकचळवळ अधिक गतिमान व्हावी : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 13:49 IST

कोल्हापूर दि. 2 : स्वच्छतेत सातत्य ठेवून, स्वच्छता अभियानाची ही लोकचळवळ अधिक गतिमान व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वच्छ भारत अभियानांतर्गत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने हाती घेतलेली स्वच्छतेची मोहिम अतिशय उपयुक्त असून, यापुढील काळात प्रतिष्ठानच्यावतीने कचरा गोळा करण्याबरोबरच ओल्या आणि सुक्या कचऱ्याची निर्गती करण्यात पुढाकार घ्यावा.राष्ट्रपिता ...

ठळक मुद्देकचरा गोळा करण्याबरोबरच ओल्या आणि सुक्या कचऱ्याची निर्गती करण्यात पुढाकार घ्याराष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छ भारत अभियानांतर्गत मोहिम देशभर स्वच्छता अभियान हाती घेतल्याबद्दल डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानबद्दल समाधानमोहिमेत प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य, शासकीय अधिकारी, कर्मचारी सक्रीय

कोल्हापूर दि. 2 : स्वच्छतेत सातत्य ठेवून, स्वच्छता अभियानाची ही लोकचळवळ अधिक गतिमान व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वच्छ भारत अभियानांतर्गत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने हाती घेतलेली स्वच्छतेची मोहिम अतिशय उपयुक्त असून, यापुढील काळात प्रतिष्ठानच्यावतीने कचरा गोळा करण्याबरोबरच ओल्या आणि सुक्या कचऱ्याची निर्गती करण्यात पुढाकार घ्यावा.

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छ भारत अभियानांतर्गत रेवदंडा, जिल्हा अलिबाग येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्यावतीने आज कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात स्वच्छता मोहिम हाती घेवून कित्येक टन कचऱ्याची निर्गती करण्यात आली.

कोल्हापूरात या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर स्वच्छता मोहिम राबवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात या मोहिमेत निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी सचिन इथापे, डॉ. भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाचे प्रमुख राहुल चिकोडे, विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य, शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षापूर्वी स्वच्छ भारताचा संकल्प करुन संपूर्ण देशभर स्वच्छ भारत अभियान सुरु केले. या अभियानास देशवासियांचा उर्स्फुत प्रतिसाद लाभला असून, आज स्वच्छतेची ही व्यापक लोकचळवळ निर्माण झाली आहे.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने देशभर आज स्वच्छता अभियान हाती घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वच्छतेची संपूर्ण राज्यात लोकचळवळ बनली असून, या स्वच्छता अभियानात यापुढील काळातही सातत्य ठेवून, स्वच्छ महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यास सर्वांनी सक्रीय व्हावे. वैयक्तिक तसेच सार्वजनिक पातळीवरही स्वच्छतेमध्ये सर्वांनी पुढाकार घेवून स्वच्छतेची दीर्घकालीन मोहिम हाती घ्यावी.