शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

स्वच्छतेची लोकचळवळ अधिक गतिमान व्हावी : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 13:49 IST

कोल्हापूर दि. 2 : स्वच्छतेत सातत्य ठेवून, स्वच्छता अभियानाची ही लोकचळवळ अधिक गतिमान व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वच्छ भारत अभियानांतर्गत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने हाती घेतलेली स्वच्छतेची मोहिम अतिशय उपयुक्त असून, यापुढील काळात प्रतिष्ठानच्यावतीने कचरा गोळा करण्याबरोबरच ओल्या आणि सुक्या कचऱ्याची निर्गती करण्यात पुढाकार घ्यावा.राष्ट्रपिता ...

ठळक मुद्देकचरा गोळा करण्याबरोबरच ओल्या आणि सुक्या कचऱ्याची निर्गती करण्यात पुढाकार घ्याराष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छ भारत अभियानांतर्गत मोहिम देशभर स्वच्छता अभियान हाती घेतल्याबद्दल डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानबद्दल समाधानमोहिमेत प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य, शासकीय अधिकारी, कर्मचारी सक्रीय

कोल्हापूर दि. 2 : स्वच्छतेत सातत्य ठेवून, स्वच्छता अभियानाची ही लोकचळवळ अधिक गतिमान व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वच्छ भारत अभियानांतर्गत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने हाती घेतलेली स्वच्छतेची मोहिम अतिशय उपयुक्त असून, यापुढील काळात प्रतिष्ठानच्यावतीने कचरा गोळा करण्याबरोबरच ओल्या आणि सुक्या कचऱ्याची निर्गती करण्यात पुढाकार घ्यावा.

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छ भारत अभियानांतर्गत रेवदंडा, जिल्हा अलिबाग येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्यावतीने आज कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात स्वच्छता मोहिम हाती घेवून कित्येक टन कचऱ्याची निर्गती करण्यात आली.

कोल्हापूरात या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर स्वच्छता मोहिम राबवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात या मोहिमेत निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी सचिन इथापे, डॉ. भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाचे प्रमुख राहुल चिकोडे, विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य, शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षापूर्वी स्वच्छ भारताचा संकल्प करुन संपूर्ण देशभर स्वच्छ भारत अभियान सुरु केले. या अभियानास देशवासियांचा उर्स्फुत प्रतिसाद लाभला असून, आज स्वच्छतेची ही व्यापक लोकचळवळ निर्माण झाली आहे.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने देशभर आज स्वच्छता अभियान हाती घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वच्छतेची संपूर्ण राज्यात लोकचळवळ बनली असून, या स्वच्छता अभियानात यापुढील काळातही सातत्य ठेवून, स्वच्छ महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यास सर्वांनी सक्रीय व्हावे. वैयक्तिक तसेच सार्वजनिक पातळीवरही स्वच्छतेमध्ये सर्वांनी पुढाकार घेवून स्वच्छतेची दीर्घकालीन मोहिम हाती घ्यावी.