शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
4
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
5
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
6
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
7
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
8
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
9
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
10
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
11
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
12
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
13
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
14
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
15
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
16
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
17
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
18
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
19
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

उत्तुरात विद्यार्थी देणार ग्रामस्थांना स्वच्छतेचे धडे

By admin | Updated: December 19, 2014 23:35 IST

१५०० विद्यार्थ्यांचा सहभाग : ग्रामपंचायत करणार विद्यार्थ्यांना मदत; प्रभागनिहाय स्वच्छतेचा मंत्र

रवींद्र येसादे - उत्तूर -माझं गाव स्वच्छ अन् सुंदर दिसण्यासाठी उत्तुरातील सर्व शाळा व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने १५०० विद्यार्थी स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत. ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी रॅली काढून प्रबोधन करण्यात येणार आहे.ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अनंतराव आजगावकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्तूर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, डॉ. जे. पी. नाईक महाविद्यालय, अरविंद विद्यामंदिर, पार्वती शंकर विद्यालय, कुमार व कन्या विद्यामंदिर, नवजीवन विद्यालय व वसंतरावदादा पाटील येथे शिक्षकांची बैठक घेऊन स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय झाला. सध्या ‘स्वच्छ भारत-सुंदर भारत’ या संकल्पनेनुसार गाव स्वच्छ असावे, ही संकल्पना विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांसमोर मांडण्यात येऊन कचरा उठावाचे सातत्य ग्रामस्थांनी राखावे. स्वच्छता मोहिमेबाबत सरपंच सुप्रिया पाटील, उपसरपंच संजय उत्तूरकर, ग्रामसेवक राजेंद्र नुल्ले, सदस्य महेश करंबळी यांची बैठक होऊन कचरा उठावाबाबत चर्चा झाली.ग्रामस्थांनी सातत्य राखावेदोन टप्प्यात गाव स्वच्छ ठेवण्याचे शाळांनी ठरवले आहे. कचरा उठाव केल्यानंतर पुन्हा कचरा होऊ नये म्हणून पालक, ग्रामस्थ, व्यापारी, हॉटेल मालक यांनी काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी केलेल्या स्वच्छतेमध्ये ग्रामस्थांनी सातत्य राखावे, अशी मागणीही शाळांनी केली.बांधकाम परवानाबाबत ग्रा.पं.ने काळजी घ्यावीघराच्या पाठीमागे असणारी परडी रिकामी न ठेवता बांधकामे होत आहेत. पूर्वी कचरा परड्यात कुजून तो शेताकडे खत म्हणून वापरला जायचा. ते आता बंद होऊन कचरा रस्त्यावर येऊन उकिरडे तयार होत आहेत. याकडेही ग्रा.पं.ने लक्ष द्यावे.केवळ कर्मचारी म्हणूनच सोसतात...कचरा उठावासाठी असणारे ग्रा.पं.चे कर्मचारी हतबल झाले आहेत. ओल्या, सुक्या कचऱ्याबरोबर चुलीतील राख, जुनी कपडे, प्लास्टिक, शेळ्या-मेंढ्यानी खाल्लेली ओली लाकडे आदी कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. केवळ कर्मचारी म्हणूनच हा प्रकार सोसत आहेत. ग्रामस्थांनी किमान कचरा टाकताना विचार करावा.शाळांच्या निर्णयाचे स्वागतस्वच्छता करण्याच्या निर्णयाचे ग्रा.पं.ने सर्व शाळांचे स्वागत केले. स्वच्छतेत सातत्य टिकवण्यासाठी ग्रा.पं.चे सहकार्य असून, स्पर्धा राबवण्याचा निर्णय घेतला असून २६ जानेवारी अथवा १५ आॅगस्टला विद्यार्थ्यांना यथोचितपणे गौरविले जाईल, असे ग्रामपंचायतीने सांगितले.