शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

उत्तुरात विद्यार्थी देणार ग्रामस्थांना स्वच्छतेचे धडे

By admin | Updated: December 19, 2014 23:35 IST

१५०० विद्यार्थ्यांचा सहभाग : ग्रामपंचायत करणार विद्यार्थ्यांना मदत; प्रभागनिहाय स्वच्छतेचा मंत्र

रवींद्र येसादे - उत्तूर -माझं गाव स्वच्छ अन् सुंदर दिसण्यासाठी उत्तुरातील सर्व शाळा व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने १५०० विद्यार्थी स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत. ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी रॅली काढून प्रबोधन करण्यात येणार आहे.ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अनंतराव आजगावकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्तूर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, डॉ. जे. पी. नाईक महाविद्यालय, अरविंद विद्यामंदिर, पार्वती शंकर विद्यालय, कुमार व कन्या विद्यामंदिर, नवजीवन विद्यालय व वसंतरावदादा पाटील येथे शिक्षकांची बैठक घेऊन स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय झाला. सध्या ‘स्वच्छ भारत-सुंदर भारत’ या संकल्पनेनुसार गाव स्वच्छ असावे, ही संकल्पना विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांसमोर मांडण्यात येऊन कचरा उठावाचे सातत्य ग्रामस्थांनी राखावे. स्वच्छता मोहिमेबाबत सरपंच सुप्रिया पाटील, उपसरपंच संजय उत्तूरकर, ग्रामसेवक राजेंद्र नुल्ले, सदस्य महेश करंबळी यांची बैठक होऊन कचरा उठावाबाबत चर्चा झाली.ग्रामस्थांनी सातत्य राखावेदोन टप्प्यात गाव स्वच्छ ठेवण्याचे शाळांनी ठरवले आहे. कचरा उठाव केल्यानंतर पुन्हा कचरा होऊ नये म्हणून पालक, ग्रामस्थ, व्यापारी, हॉटेल मालक यांनी काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी केलेल्या स्वच्छतेमध्ये ग्रामस्थांनी सातत्य राखावे, अशी मागणीही शाळांनी केली.बांधकाम परवानाबाबत ग्रा.पं.ने काळजी घ्यावीघराच्या पाठीमागे असणारी परडी रिकामी न ठेवता बांधकामे होत आहेत. पूर्वी कचरा परड्यात कुजून तो शेताकडे खत म्हणून वापरला जायचा. ते आता बंद होऊन कचरा रस्त्यावर येऊन उकिरडे तयार होत आहेत. याकडेही ग्रा.पं.ने लक्ष द्यावे.केवळ कर्मचारी म्हणूनच सोसतात...कचरा उठावासाठी असणारे ग्रा.पं.चे कर्मचारी हतबल झाले आहेत. ओल्या, सुक्या कचऱ्याबरोबर चुलीतील राख, जुनी कपडे, प्लास्टिक, शेळ्या-मेंढ्यानी खाल्लेली ओली लाकडे आदी कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. केवळ कर्मचारी म्हणूनच हा प्रकार सोसत आहेत. ग्रामस्थांनी किमान कचरा टाकताना विचार करावा.शाळांच्या निर्णयाचे स्वागतस्वच्छता करण्याच्या निर्णयाचे ग्रा.पं.ने सर्व शाळांचे स्वागत केले. स्वच्छतेत सातत्य टिकवण्यासाठी ग्रा.पं.चे सहकार्य असून, स्पर्धा राबवण्याचा निर्णय घेतला असून २६ जानेवारी अथवा १५ आॅगस्टला विद्यार्थ्यांना यथोचितपणे गौरविले जाईल, असे ग्रामपंचायतीने सांगितले.