शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयाची स्वच्छता सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:26 IST

कोल्हापूर : गेले तीन दिवस पुराच्या पाण्याने वेढलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील पाणी आता ओसरले आहे. सध्या येथील साफसफाई सुरू असून, ...

कोल्हापूर : गेले तीन दिवस पुराच्या पाण्याने वेढलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील पाणी आता ओसरले आहे. सध्या येथील साफसफाई सुरू असून, कार्यालयातून कामकाज सुरू व्हायला आणखी तीन-चार दिवस लागणार आहेत.

अवघ्या जिल्ह्याचा कारभार ज्या कार्यालयातून चालतो ते नागाळा पार्क येथील जिल्हाधिकारी कार्यालयच पुराच्या पाण्याने वेढले होते. मात्र, यंदाची परिस्थिती २०१९पेक्षा बरीच होती. त्यावेळी पुराचे एवढे पाणी येईल, याचा अंदाज नसल्याने सगळे दफ्तर पाण्याने भिजले होते. कार्यालयातील फर्निचरपासून सगळ्या साहित्याची दैना झाली होती. यावेळी दोन वर्षांपूर्वीचा अनुभव गाठीशी होता, त्यामुळे शुक्रवारी कर्मचाऱ्यांनी सर्व दफ्तर वरच्या मजल्यावर नेवून ठेवले. हा पसारा आवरेपर्यंत पाण्याची पातळी वाढली आणि कर्मचाऱ्यांना बोटीतून बाहेर आणावे लागले. महत्त्वाची कागदपत्रं, संगणक यासह शासकीय कामकाजासाठी लागणारे साहित्य जिल्हा परिषदेत हलवावे लागले. पुराच्या काळात आणि अजूनही जिल्हाधिकारी हे जिल्हा परिषदेतून कामकाज करत आहेत तर कर्मचारी त्या-त्या दिवशी महत्त्वाचे काम करायला येथे येत आहेत.

रविवारी कार्यालयातील पुराचे पाणी ओसरल्याने सोमवारपासून साफसफाईला सुरुवात झाली आहे. पण अजून वीज नाही, कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी लागणारी यंत्रणा, फर्निचर या सगळ्या बाबींची पूर्तता होईपर्यंत आणखी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतरच येथील स्थिती पूर्ववत होऊन कामकाजाला सुरुवात होईल.

----